शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

अमरावती विभागातील धडक सिंचन विहिरींना मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 15:55 IST

वाशिम: धडक सिंचन योजनेंतर्गत रद्द करण्यात आलेल्या अमरावती विभागातील शेतकऱ्यांच्या विहिरी पुनर्जिवित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यात वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेकडो विहिरींचा समावेश आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: धडक सिंचन योजनेंतर्गत रद्द करण्यात आलेल्या अमरावती विभागातील शेतकऱ्यांच्या विहिरी पुनर्जिवित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यात वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेकडो विहिरींचा समावेश आहे. या संदर्भात शिवसंग्रामचे नेते तथा आमदार विनायकराव मेटे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून विहिरींना मुदतवाढ देण्याची मागणी केली होती.धडक सिंचन योजनेंतर्गत अमरावती विभागातील ८००७ सिंचन विहिरी पुनर्जिवित करण्यासाठी शासनाकडून मान्यता देण्यात आली होती. त्यातील बहुतांश विहिरी विविध कारणांमुळे रद्द करण्यात आल्या होत्या. सदरच्या रद्द केलेल्या विहिरी पुनर्जिवित करण्यासाठी नव्याने लक्षांक देण्याबाबत लोकप्रतिनिधींकडून शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत होता. यात शिवसंग्रामचे नेते तथा आमदार विनायकराव मेटे यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून या विहिरी पुनर्जिवित करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी ११ डिसेंबर रोजी पत्र पाठवून केली होती. त्याची दखल घेऊन अमरावती विभागातील धडक सिंचन योजनेंतर्गत रद्द झालेल्या विहिरी पुनर्जिवित करण्याबाबत जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीसह प्रस्ताव सादर करण्याचे आदेश शासनाकडून विभागस्तरावर देण्यात आले. यात वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेकडो विहिरींचा समावेश होता. या संदर्भात विभागीय आयुक्तांनी वाशिम जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून जिल्ह्यातील किती विहिरी रद्द झाल्या आहेत आणि त्यापैकी किती पुनर्जिवित करावयाच्या आहेत. याबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या होत्या. त्यामुळे आता धडक सिंचन योजनेतील रद्द झालेल्या विहिरी पुनर्जिवित होणार आहेत.

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजना