शहरं
Join us  
Trending Stories
1
“आता गृह मंत्रालय घेतले, पुढे भाजपावाले नितीश कुमारांचे CM पद काढून घेतील”; कुणाचा दावा?
2
सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करा, 5 वर्षांची कर सूट मिळवा; अफगाणिस्तानची भारताला मोठी ऑफर
3
“भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न”; राज ठाकरेंच्या विधानावर भाजपाचे उत्तर
4
जुना, वापरलेला फोन खरेदी करताय? थांबा! एका चुकीमुळे होऊ शकते हजारोंचे नुकसान, आताच जाणून घ्या..
5
रिलायन्स जिओला ग्राहक वैतागले! कॉलवेळी ऐकायलाच येत नाहीय..., प्रचंड समस्या, बीएसएनएल परवडले...
6
मोठा पेच...! धर्मेंद्र यांच्या ४५० कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण? दोन पत्नी, ६ मुले... 
7
Dharmendra Last Rites: देओल कुटुंबीयांचा आधार हरपला; अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन, सनी देओलने दिला मुखाग्नी
8
"सरकारनं माझं ऐकलं नाही तर संसदेच्या छतावरून उडी मारेन"; जेव्हा राजकारणात दिसली धर्मेंद्र यांची 'शोले स्टाईल'
9
Women’s Kabaddi World Cup 2025: कबड्डीतही भारताच्या लेकी जगात भारी! सलग दुसऱ्यांदा जिंकली वर्ल्ड कप स्पर्धा
10
आधी कारने धडक, मग १९ सेकंदात १९ कुऱ्हाडीचे घाव; गुरुग्राममध्ये डिलिव्हरी बॉयवर जीवघेणा हल्ला!
11
आधुनिक तंत्रज्ञान, पूर्णपणे मेड इन इंडिया; भारतीय नौदलात ‘INS माहे’ची धमाकेदार एन्ट्री...
12
प्रेमात धोका! मिस कॉलने जोडले नाते, प्रियकराने तोडले! गर्भवती प्रेयसीचा गर्भपात करून स्टेशनवर सोडून पळाला
13
डॉ. गौरी गर्जे यांचा मृत्यू अनैसर्गिक; डॉक्टरांच्या खुलाशाने खळबळ, शवविच्छेदन अहवालात कोणत्या नोंदी?
14
"विश्वास ठेवा, दुसरा कुठलाही हेतू नाही" माओवाद्यांनी आत्मसमर्पणासाठी मागितली १५ फेब्रुवारीपर्यंतची वेळ
15
IND vs SA: टीम इंडियाच्या फलंदाजांची घसरगुंडी, दुसरीकडे करूण नायरची सूचक पोस्ट, म्हणाला...
16
गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पती अनंत गर्जेंना २७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी, काल झालेली अटक
17
'३० कॉटेजचे एक आलिशान रिसॉर्ट बांधायचेच राहिले...'; बिझनेसमन धर्मेंद्रची शेवटची इच्छा होती...
18
महिंद्रा-टाटासह 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले! बाजारात अचानक का वाढला विक्रीचा दबाव?
19
दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला; अफगाणिस्तानातून आलेल्या विमानाची चुकीच्या रनवेवर लँडिंग
20
IND vs SA 2nd Test Day 3 Stumps : बावुमानं टीम इंडियाला फॉलोऑन देणं टाळलं; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विभागातील धडक सिंचन विहिरींना मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 15:55 IST

वाशिम: धडक सिंचन योजनेंतर्गत रद्द करण्यात आलेल्या अमरावती विभागातील शेतकऱ्यांच्या विहिरी पुनर्जिवित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यात वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेकडो विहिरींचा समावेश आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: धडक सिंचन योजनेंतर्गत रद्द करण्यात आलेल्या अमरावती विभागातील शेतकऱ्यांच्या विहिरी पुनर्जिवित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यात वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेकडो विहिरींचा समावेश आहे. या संदर्भात शिवसंग्रामचे नेते तथा आमदार विनायकराव मेटे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून विहिरींना मुदतवाढ देण्याची मागणी केली होती.धडक सिंचन योजनेंतर्गत अमरावती विभागातील ८००७ सिंचन विहिरी पुनर्जिवित करण्यासाठी शासनाकडून मान्यता देण्यात आली होती. त्यातील बहुतांश विहिरी विविध कारणांमुळे रद्द करण्यात आल्या होत्या. सदरच्या रद्द केलेल्या विहिरी पुनर्जिवित करण्यासाठी नव्याने लक्षांक देण्याबाबत लोकप्रतिनिधींकडून शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत होता. यात शिवसंग्रामचे नेते तथा आमदार विनायकराव मेटे यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून या विहिरी पुनर्जिवित करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी ११ डिसेंबर रोजी पत्र पाठवून केली होती. त्याची दखल घेऊन अमरावती विभागातील धडक सिंचन योजनेंतर्गत रद्द झालेल्या विहिरी पुनर्जिवित करण्याबाबत जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीसह प्रस्ताव सादर करण्याचे आदेश शासनाकडून विभागस्तरावर देण्यात आले. यात वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेकडो विहिरींचा समावेश होता. या संदर्भात विभागीय आयुक्तांनी वाशिम जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून जिल्ह्यातील किती विहिरी रद्द झाल्या आहेत आणि त्यापैकी किती पुनर्जिवित करावयाच्या आहेत. याबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या होत्या. त्यामुळे आता धडक सिंचन योजनेतील रद्द झालेल्या विहिरी पुनर्जिवित होणार आहेत.

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजना