शहरं
Join us  
Trending Stories
1
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
2
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
3
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
4
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
5
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
6
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
7
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
8
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
9
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
10
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
11
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
12
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
13
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
14
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
15
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
16
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
17
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
18
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
19
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
20
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!

जलसंधारणच्या कार्यकारी अभियंत्याला ‘शो-कॉज’

By admin | Updated: February 25, 2016 01:50 IST

गैरहजर असल्याचा ठपका; कामे खोळंबली.

वाशिम : जलसंधारणाच्या कामांना जलद गतीने पार न पाडणे आणि वारंवार गैरहजर राहिल्याच्या कारणावरून लघू सिंचन जलसंधारणच्या कार्यकारी अभियंत्याला अमरावती मंडळाच्या सहायक अधीक्षक अभियंत्यांनी शनिवारी कारणे दाखवा नोटीस बजावली. लघू सिंचन जलसंधारण विभागातर्फे विविध कामे केली जातात. तसेच लघू सिंचन प्रकल्पांना तांत्रिक मान्यता देण्याचे अधिकार जलसंधारणच्या कार्यकारी अभियंत्यांकडे सोपविले आहेत. या विभागाचे कार्यकारी अभियंता म्हणून एस.एस. धनशेट्टी कार्यरत आहेत. जिल्हा परिषदेच्या लघू सिंचन विभागाने सहा लघू सिंचन प्रकल्पांचे प्रस्ताव तांत्रिक मान्यतेसाठी धनशेट्टी यांच्या दरबारात २५ दिवसांपूर्वी ठेवले होते. या कामांवर मार्च २0१६ पर्यंत प्रस्तावित निधी खर्च करावयाचा असल्यामुळे तांत्रिक मान्यता मिळणे आवश्यक आहे. तांत्रिक मान्यतेस विलंब होत असल्याचे पाहून जिल्हा परिषद अध्यक्ष जोगदंड यांनी धनशेट्टी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, भ्रमणध्वनी बंद असल्याचे समजले. त्यानंतर कार्यालयातही ते आढळून आले नाहीत. जिल्हाधिकार्‍यांनीदेखील यापूर्वी धनशेट्टी यांच्याशी संपर्क साधला असता, ते उपलब्ध झाले नाहीत. या प्रकाराची जिल्हा परिषद अध्यक्षांनी अमरावती मंडळाच्या सहायक अधीक्षक अभियंत्यांकडे तक्रार केली. या तक्रारीची शहानिशा म्हणून धनशेट्टी यांच्या कार्यालयात संपर्क साधला, ते उपलब्ध झाले नाहीत, तसेच भ्रमणध्वनीद्वारे निम्न स्वाक्षरीतांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, तो बंद असल्याचा संदेश मिळाला. एकंदरित कार्यकारी अभियंता कार्यालयात उपलब्ध नसल्याने कामे ठप्प झाली, तसेच सहा लघू सिंचन प्रकल्पांची तांत्रिक मान्यता रखडल्याचे वरिष्ठांच्या निदर्शनात आले. वरिष्ठांना कल्पना न देता गैरहजर राहणे आणि विविध कामे खोळंबण्यास कारणीभूत ठरल्याच्या कारणावरून अमरावती मंडळाच्या सहायक अधीक्षक अभियंत्यांनी धनशेट्टी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. या नोटीसनुसार, कामांना जलद गतीने पार न पाडल्यामुळे व वारंवार गैरहजर राहिल्यामुळे तसेच कार्यालयीन दूरध्वनी न स्वीकारल्यामुळे शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येवू नये? याबाबत आपले स्पष्टीकरण तीन दिवसांच्या आत सादर करावे, आपले स्पष्टीकरण संयुक्तिक न वाटल्यास नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला. १६ फेब्रुवारी २0१६ पासून गैरहजर असल्यामुळे जलसंधारणाचे व जलयुक्त शिवार या विकास कामांच्या प्रगतीमध्ये खोळंबा निर्माण झालेला असून, अंदाजपत्रकांना मान्यता देणे, तसेच मंत्रालय, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, प्रादेशिक कार्यालय तसेच विभागीय कार्यालय या कार्यालयांचा तातडीचा पत्रव्यवहार न झाल्यामुळे कामे ठप्प झालेली आहेत. त्यामुळे हे पत्र प्राप्त होताच तत्काळ कार्यालयात हजर होऊन तसे मंडळ कार्यालयास अवगत करावे, अशी सूचनाही अमरावती मंडळाच्या सहायक अधीक्षक अभियंत्यांनी दिली आहे.