शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

फळे, भाजीपाला पिकावरील जादा फवारणी ठरतेय आरोग्यास अपायकारक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:40 IST

ताजी फळे व भाजीपाल्याचा आहारात समावेश असणे हे आरोग्यदायी मानले जाते; परंतु विषारी रासायनिक कीडनाशकांचा अमर्याद वापर या फळावर ...

ताजी फळे व भाजीपाल्याचा आहारात समावेश असणे हे आरोग्यदायी मानले जाते; परंतु विषारी रासायनिक कीडनाशकांचा अमर्याद वापर या फळावर व भाजीपाल्याच्या पिकावर झाला असेल व विशेषत: या फळ व भाजीपाला पिकावर पीक काढणीच्या वेळी या रासायनिक कीडनाशकांचे अंश हे कीडनाशक अवशेषांच्या कमाल अवशेष मर्यादेच्या बाहेर (एम.आर.एल.) शिल्लक राहिल्यास हा भाजीपाला व फळे खाणे मानवी आरोग्यास अपायकारक ठरू शकतो. हे टाळण्यासाठी, सुरक्षित अन्नासाठी कीडनाशक वापरानंतर कमाल अवशेष मर्यादेपर्यंत पोहोचून पीक काढणीसाठी प्रतीक्षा कालावधी कीटकशास्त्रज्ञांनी काढून दिलेला आहे. रासायनिक कीडनाशकांच्या फवारण्यानंतर संबंधित पिकात संबंधित कीडनाशक फवारल्यानंतर पाळावयाचा प्रतीक्षा कालावधी साधारणपणे संबंधित कीडनाशकाच्या लेबलवर अथवा माहिती पत्रिकेवर दिलेला असतो. पीकवार कीडनाशकाच्या वापरानंतर कमाल अवशेष मर्यादा व पीक काढणीसाठीचा प्रतीक्षा कालावधी याचा शेतकऱ्यांनी गरजेनुसार संदर्भ घ्यावा व आपल्या आहारात जाणाऱ्या विविध फळे व भाजीपाला पिकात कीडनाशकांचे कमीत कमी अंश राहतील याची काळजी घ्यावी, असा सल्ला डवरे यांनी दिला.

बॉक्स

कीडनाशकांचे कमीत कमी अंश राहतील या दृष्टिकोनातून घ्यावयाची काळजी

१) कीडनाशकाचा वापर संबंधित पिकातील संबंधित किडीचे योग्य निदान करून अधिकृत केंद्रीय कीडनाशक मंडळ व नोंदणी समिती यांच्या शिफारशीनुसारच व कीडनाशक उत्पादनाचे लेबल क्लेम काळजीपूर्वक वाचूनच करावा.

२) रासायनिक कीडनाशके फवारल्यानंतर संबंधित पिकातील शिफारस केलेला काढणीपूर्व कालावधी उलटल्यानंतरच त्याची काढणी करावी.

३) शक्यतोवर रासायनिक कीडनाशकांचा वापर पिकाच्या वाढीच्या सुरुवातीच्या काळात करावा आणि पीक काढणीच्या काळात जैविक किंवा वनस्पतीजन्य कीडनाशकाला प्राधान्य द्यावे.

४) फळे व भाजीपाला पिके काढणीयोग्य झाल्यावर काढणीपूर्वी एक ते दीड महिना अगोदर रासायनिक कीडनाशकांच्या ऐवजी वनस्पतीजन्य व जैविक कीडनाशके यांचा वापर करणे योग्य; परंतु रासायनिक कीडनाशके वापरायचे झाल्यास पीक काढणीपूर्व प्रतीक्षा कालावधी लक्षात घ्यावा व लेबल क्‍लेम शिफारशीप्रमाणे कीडनाशके वापरावी.

५) रासायनिक कीडनाशके वापरताना ज्या कीडनाशकाच्या वापरावर बंदी आहे, ती कीडनाशके वापरू नयेत तसेच मानवी आरोग्यास व पर्यावरणास कमी हानिकारक असलेली, कमी मात्रेमध्ये लागणारी व अद्ययावत लेबल क्‍लेम शिफारस असलेली परिणामकारक कीडनाशके योग्य प्रमाणात, योग्य वेळी प्रत्यक्ष तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वापरावी.

६) शेतकऱ्यांनी आपल्या घरी फळे व भाजीपाला आणल्यानंतर साधारणत: एक ते दोन टक्के मिठाचे द्रावण तयार करून त्या द्रावणात फळे व भाजीपाला टाकून नंतर स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावा. त्यामुळे रासायनिक कीडनाशकांचे अवशेष कमी होण्यास मदत होते.