शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

संविधानाप्रती प्रत्येकाने जागरुक असावे - प्रा. मुकूंद खैरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 01:22 IST

मानोरा :  जगात सर्वश्रेष्ठ आणि मजबुत असे संविधान डॉ.बाबासाहेब आांबेडकरांनी दिले. समता,बंधुता, न्याय,मानवता, धर्मनिरपेक्षता, गणराज्य अशी अनेक तत्वे या संविधानात आहे. देशातील  प्रत्येक घटकातील नागरिकांना हक्क देणार्‍या  या संविधानाप्रती प्रत्येकाने जागरुक असले पाहिजे असे प्रतिपादन राज्य घटनेचे  अभ्यासक तथा समाज क्रांती आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मुकूंद खेरे यांनी केले.

ठळक मुद्देसंविधान सन्मान परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा :  जगात सर्वश्रेष्ठ आणि मजबुत असे संविधान डॉ.बाबासाहेब आांबेडकरांनी दिले. समता,बंधुता, न्याय,मानवता, धर्मनिरपेक्षता, गणराज्य अशी अनेक तत्वे या संविधानात आहे. देशातील  प्रत्येक घटकातील नागरिकांना हक्क देणार्‍या  या संविधानाप्रती प्रत्येकाने जागरुक असले पाहिजे असे प्रतिपादन राज्य घटनेचे  अभ्यासक तथा समाज क्रांती आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मुकूंद खेरे यांनी केले.येथील आदिवासी भवनात ४ फेब्रुवारी दुपारी १ वाजता संविधान  सन्मान परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणुन ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  भारिप-बमसंचे  तालुकाअध्यक्ष महादेव भगत होते. प्रमुख अतिथी म्हणुन भारिप बमसंचे जिल्हाध्यक्ष हाजी युसुफ पुंजाणी, सामाजिक कार्यकर्ते हंसराज शेंडे,  विजय मनवर, डॉ.नरेश इंगळे , प्रा.जय चव्हाण, बि.डी.मनवर,  नगरसेवक फैजल नागाणी, मराठा सेवा संघाचे राजेंद्र ठाकरे, माणिक डेरे, जुम्माभाई भगतवाले,  दत्तात्रय रामटेके, चंद्रकांत जांभरुणकर,  युनुस खान आदिंची उपस्थिती होती. यावेळी आपल्या भाषणात प्रा.मुकूंद खैरे यांनी संविधानातील काही महत्वांच्या बाबींची माहिती दिली.यानंतर प्रा.जय चव्हाण, डॉ.नरेश इंगळे, राजेंद्र ठाकरे, विजय मनवर, दत्तात्रय रामटेके, चंद्रकांत जांभरुणकर  यांनी सुध्दा मनोगत व्यक्त केले.  संविधानाचे अभ्यासक हंसराज शेंडे आपल्या भाषणात  म्हणाले की, संविधानाने देशातील प्रत्येक जाती ,धर्माच्या माणसाला अधिकार दिले. मतदानाचा अधिकार सर्वांना दिला त्यामुळे सामान्य माणुस राजकारणात मोठा झाला. संविधानामुळे आपणाला  हक्क कळले. २६ जानेवारी रोजी प्रशासनाने  संविधानाबद्दल जाणिव जागृती करुन कार्यक्रम राबविले पाहिजे, त्यासाठी आपण आग्रह धरणार असेही ते म्हणाले. युसुफ पुंजाणी यांनी संविधानाची महती सांगुन संविधान वाचविण्यासाठी प्रयत्न करणार्‍या बाळासाहेब अांबेडकरांसोबत बहूजन समाजाने राहवे. ८५ टक्के बहूजन एकत्र आले तर संविधानाला विरोध करणार्‍या जातीयवादी शक्तींचा नायनाट होईल. ‘सबका साथ, सबका विकास’ केवळ संविधानामुळेच आहे असेही ते म्हणाले. अध्यक्षीय भाषण महादेव भगत यांनी केले. संचालन  गोपाल शर्मा  यांनी केले. डॉ.सुरेश जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला संविधान प्रेमी नागरिकांची मोठय़ा प्रमाणात उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी भारिप बमसं,  समाजाक्रांती आघाडी, भिमशक्ती  सामाजिक संघटना, भगवान बिरसा मुंडा, संघटना व दिव्यांग आधार संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी योगदान दिले.

टॅग्स :washimवाशिम