शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
2
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
3
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
4
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
5
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
6
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
7
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
8
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
10
चंद्रपुरात भीषण अपघात! चालकाला लागलेली एक डुलकी ठरली जीवघेणी; ४ मृत्यू, ५ जण जखमी
11
UPI 'ऑटो-पे'च्या कटकटीतून सुटका! १ जानेवारीपासून लागू होणार ८ मोठे बदल; ग्राहकांचे पूर्ण नियंत्रण
12
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
13
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
14
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
15
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
16
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
17
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
18
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
19
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
20
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

संविधानाप्रती प्रत्येकाने जागरुक असावे - प्रा. मुकूंद खैरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 01:22 IST

मानोरा :  जगात सर्वश्रेष्ठ आणि मजबुत असे संविधान डॉ.बाबासाहेब आांबेडकरांनी दिले. समता,बंधुता, न्याय,मानवता, धर्मनिरपेक्षता, गणराज्य अशी अनेक तत्वे या संविधानात आहे. देशातील  प्रत्येक घटकातील नागरिकांना हक्क देणार्‍या  या संविधानाप्रती प्रत्येकाने जागरुक असले पाहिजे असे प्रतिपादन राज्य घटनेचे  अभ्यासक तथा समाज क्रांती आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मुकूंद खेरे यांनी केले.

ठळक मुद्देसंविधान सन्मान परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा :  जगात सर्वश्रेष्ठ आणि मजबुत असे संविधान डॉ.बाबासाहेब आांबेडकरांनी दिले. समता,बंधुता, न्याय,मानवता, धर्मनिरपेक्षता, गणराज्य अशी अनेक तत्वे या संविधानात आहे. देशातील  प्रत्येक घटकातील नागरिकांना हक्क देणार्‍या  या संविधानाप्रती प्रत्येकाने जागरुक असले पाहिजे असे प्रतिपादन राज्य घटनेचे  अभ्यासक तथा समाज क्रांती आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मुकूंद खेरे यांनी केले.येथील आदिवासी भवनात ४ फेब्रुवारी दुपारी १ वाजता संविधान  सन्मान परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणुन ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  भारिप-बमसंचे  तालुकाअध्यक्ष महादेव भगत होते. प्रमुख अतिथी म्हणुन भारिप बमसंचे जिल्हाध्यक्ष हाजी युसुफ पुंजाणी, सामाजिक कार्यकर्ते हंसराज शेंडे,  विजय मनवर, डॉ.नरेश इंगळे , प्रा.जय चव्हाण, बि.डी.मनवर,  नगरसेवक फैजल नागाणी, मराठा सेवा संघाचे राजेंद्र ठाकरे, माणिक डेरे, जुम्माभाई भगतवाले,  दत्तात्रय रामटेके, चंद्रकांत जांभरुणकर,  युनुस खान आदिंची उपस्थिती होती. यावेळी आपल्या भाषणात प्रा.मुकूंद खैरे यांनी संविधानातील काही महत्वांच्या बाबींची माहिती दिली.यानंतर प्रा.जय चव्हाण, डॉ.नरेश इंगळे, राजेंद्र ठाकरे, विजय मनवर, दत्तात्रय रामटेके, चंद्रकांत जांभरुणकर  यांनी सुध्दा मनोगत व्यक्त केले.  संविधानाचे अभ्यासक हंसराज शेंडे आपल्या भाषणात  म्हणाले की, संविधानाने देशातील प्रत्येक जाती ,धर्माच्या माणसाला अधिकार दिले. मतदानाचा अधिकार सर्वांना दिला त्यामुळे सामान्य माणुस राजकारणात मोठा झाला. संविधानामुळे आपणाला  हक्क कळले. २६ जानेवारी रोजी प्रशासनाने  संविधानाबद्दल जाणिव जागृती करुन कार्यक्रम राबविले पाहिजे, त्यासाठी आपण आग्रह धरणार असेही ते म्हणाले. युसुफ पुंजाणी यांनी संविधानाची महती सांगुन संविधान वाचविण्यासाठी प्रयत्न करणार्‍या बाळासाहेब अांबेडकरांसोबत बहूजन समाजाने राहवे. ८५ टक्के बहूजन एकत्र आले तर संविधानाला विरोध करणार्‍या जातीयवादी शक्तींचा नायनाट होईल. ‘सबका साथ, सबका विकास’ केवळ संविधानामुळेच आहे असेही ते म्हणाले. अध्यक्षीय भाषण महादेव भगत यांनी केले. संचालन  गोपाल शर्मा  यांनी केले. डॉ.सुरेश जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला संविधान प्रेमी नागरिकांची मोठय़ा प्रमाणात उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी भारिप बमसं,  समाजाक्रांती आघाडी, भिमशक्ती  सामाजिक संघटना, भगवान बिरसा मुंडा, संघटना व दिव्यांग आधार संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी योगदान दिले.

टॅग्स :washimवाशिम