शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

पेरणीनंतरही जिल्ह्यातील ३८ हजार शेतकऱ्यांना मिळाले नाही पीककर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 12:38 IST

महिनाभरात पीककर्ज वाटपात केवळ ३.७६ टक्के वाढ होऊ शकली आहे.

वाशिम : यंदाचा खरीप हंगाम अर्धा उलटला असतानाही ३१ जुलैपर्यंत केवळ ५५५ कोटी ४१ लाख ४६ हजार रुपयांच्यो पीककर्जाचे जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना होऊ शकले. त्यातही महिनाभरात पीककर्ज वाटपात केवळ ३.७६ टक्के वाढ होऊ शकली आहे. पीककर्जासाठी पात्र असलेल्या १ लाख १५ हजार १७८ लाभार्थींपैकी ३१ जुलैपर्यंत ७६ हजार ३९७ शेतकºयांना ५५५ कोटी ४१ लाख ४६ हजार रुपयांचे पीककर्ज वितरीत करण्यात आले. अद्यापही जिल्ह्यात ३८ हजार ७८१ शेतकºयांना पीककर्ज मिळू शकले नाही.यंदा ३१ जुलैपर्यंत निर्धारित उद्दिष्टाच्या केवळ ३४.७६ टक्के पीककर्जाचे वितरण होऊ शकले आहे. विशेष म्हणजे गत महिनाभरात केवळ पीककर्ज वाटपात केवळ ३.७६ टक्क्यांची वाढ होऊ शकली आहे. कोरोना संसर्गामुळे उद्भवलेल्या परिस्थितीने शेतकरी अडचणीत असताना पीककर्ज वाटपाला गती देण्यात आलेली नाही. जिल्ह्यात यंदा १६०० कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी जिल्ह्यातील १ लाख १५ हजार १७८ शेतकरी पात्र आहेत. यात महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजनेत पात्र ठरलेल्या शेतकºयांचा समावेश आहे. या योजनेतील शेतकºयांना कर्जमुक्तीच्या लाभासाठी आधार प्रमाणीकरण गरजेचे होते. लॉकडाऊनमुळे ही प्रक्रिया बंद पडली. त्यामुळे पीककर्ज वाटपावरही परिणाम झाला. तथापि, १८ जून रोजी जिल्ह्यात पुन्हा आधार प्रमाणीकरण प्रक्रिय सुरू होऊन हजारो शेतकºयांनी आधार प्रमाणीकरणही केले. त्यामुळे पीककर्ज वाटपाची गती वाढणे अपेक्षीत होते; परंतु ३१ जुलैपर्यंतही निर्धारित उद्दिष्टाच्या तुलनेत केवळ ३४.७१ टक्के पीककर्ज वाटप जिल्ह्यात होऊ शकले आहे. त्यात ७६ हजार ३९७ शेतकºयांच्या खात्यात ५५५ कोटी ४१ लाख रुपयांचे पीककर्ज जमा झाले आहे.

जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार पीककर्ज वितरण वेगाने करण्याबाबत जिल्ह्यातील सर्व बँकांना सुचना देण्यात आल्या आहेत. काही तांत्रिक अडचणींमुळे बँकांना अडचणी येत असल्याने त्यावर मर्यादा येत आहेत. तथापि, शेतकºयांच्या अडचणी लक्षात घेऊन पर्याय शोधून शेतकºयांना पीककर्ज वितरणास वेग देण्यात येईल.

- रवि गडेकर, जिल्हा उपनिबंधक

टॅग्स :Crop Loanपीक कर्जwashimवाशिमFarmerशेतकरी