शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

वाशिमच्या शालेय विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरनपुरक होळीचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 15:21 IST

वाशिम  : एस.एम.सी.इंग्लीश स्कुल वाशिमच्या राष्ट्रीय हरित सेना व निसर्ग इकोक्लबच्यावतीने पर्यावरण होळी साजरी करण्याचे आवाहन प्राचार्य मिना उबगडे व राष्ट्रीय हरित सेनेचे शिक्षक  अभिजीत मुकूंदराव जोशी व हरित सेनेच्या चिमुकल्यांनी  केले.

ठळक मुद्दे एस.एम.सी.इंग्लीश स्कुल वाशिमच्या राष्ट्रीय हरित सेना व निसर्ग इकोक्लबच्यावतीने पर्यावरण होळी साजरी करण्याचे आवाहन. पाण्याची बचत करावी असे आवाहन राष्ट्रीय हरित सेनेचे शिक्षक अभिजीत मुकूंदराव जोशी व प्राचार्य मिना उबगडे व राष्ट्रीय हरित सेनेच्या चिमुकल्यांनी केले आहे.

वाशिम  : एस.एम.सी.इंग्लीश स्कुल वाशिमच्या राष्ट्रीय हरित सेना व निसर्ग इकोक्लबच्यावतीने पर्यावरण होळी साजरी करण्याचे आवाहन प्राचार्य मिना उबगडे व राष्ट्रीय हरित सेनेचे शिक्षक  अभिजीत मुकूंदराव जोशी व हरित सेनेच्या चिमुकल्यांनी  केले. दरवर्षी  आपल्या राज्यात होळीचा सण मोठया उत्साहाने साजरा करण्यात येतो. यामुळे  मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होते व विशेषता वनामध्ये  आगी लावुन वन्य प्राण्याची शिकार सुध्दा केली जाते, तसेच होळी जळतांना  त्यासाठी मोठ्या प्रमाणावर हवेतील आॅक्सीजन वापरला जावुन कार्बन वायमुळे  हवेचे प्रदुषण होते. या शिवाय धुळवाडीचा वेळेस  वापरण्यात येणारे रासायनिक रंग माणसासाठी तसेच पर्यावरणासाठी अतिशय घातक असतात, अप प्रवृत्तीचा नाश व्हावा या उद्देशाने होळी हा सण साजरा करण्यात येतो, परंतु हा उद्देश  मागे पडत चाललेला असुन ही होळी पर्यावरणात्मक साजरी करण्यासाठी खेलो होली इको फे्रंडली या संकल्पनेचा पुरस्कार करणे आवश्यक आहे . त्यासाठी  होळीची संख्या कमी करणे व होळीचा   आकार लहान करणे, होळीसाठी  लाकडाचा व गोवºयाचा कमीत कमी वापर करणे, शक्यतोत्तर  प्रतिकात्मक होळी साजरी करणे , होळीमध्ये जाळण्यासाठी  एरंडीचा झाडांची  आवश्यकता असते त्याची ही तोड होते, यासाठी एरंडीच्या बिया गोळा करुन योग्य ओलाव्याच्या जागी लावणे तसेच धुळवाडीच्या वेळी वापरण्यात येणाºया कृत्रीम रंगाचे दुष्परिणाम  जाणवतात. त्यासाठी नैसर्गिक रंगाचा वापर करण्याचे आवाहन केल्या जात आहे.

 

कृत्रिम रंगाचे दुष्परिणाम

काळा रंग - आॅक्साईड मुत्र संस्थेचे कार्य बंद होणे, हिरवा - कॉपर सल्फेट, डोळ्यांना अ‍ॅलर्जी होणे, सुजण. चांदीसारखा रंग -अ‍ॅल्युमिनीयम ब्रोसाईड कॅन्सर  निळा  - पार्शोयन निळा त्वचेचा आजार. लाल  रंग  - मर्क्युअरी सल्फाईड अतिशय विषारी यामुळे  त्वचेचा कॅन्सर होवु शकतो.  वरील दुष्परिणाम  लक्षात घेता आपण नैसर्गीक  रंग घरीच तयार करुन त्याचा वापर करु शकतो.

नैसर्गिक रंग व तयार करण्याची पध्दत

जांभळा रंग - बिट साल किंवा गरापासुन पाण्यात टाकुन ढवळणे.  पिवळा रंग - बेल फळाची साल पाण्यात उकळणे, एक भाग हळद, दोन भाग कोणतेही पिठ तसेच झेंडुच्या फुुलांपासुन पिवळा रंग तयार होतो.   काळारंग - आवळा किस लोखंडी ताव्यावर टाकुन पाणी टाकुन उकळणे.  नारंगी रंग - बेल फळाचा गर पाण्यात टाकुन उकळणे.  लाल रंग - जास्वंद, पळस किंवा गुलाब फुलांचा कुटून लगदा करुन पाण्यात ढवळणे.  हिरवारंग -  गहु, ज्वारी, पालक, किंवा कोणत्याही हिरव्या पानांचा कुटून लगदा करन पाण्यात ढवळणे.  कोरडा रंग : साधारणा कोरडा रंग तयार करण्यासाठी फुलांच्या पाकळ्या सावलीत वाळवाव्यात. त्या कुरकुरीत वाळल्यानंतर त्यात तुरटी मिसळुन  अतिशय बारीक वाटावे . सावलीत वाळविल्याने रंग उडत नाही व तुरटीसह बारीक वाटल्याने तो पावडरीसारखा चांगला चिटकतो.  असे विविध रंग  आपआपल्या घरी तयार करुन   इकोफें्रडली  होळी साजरी करावी . तसेच पाण्याचा  दुष्काळ पाहता पाण्याची बचत करावी असे आवाहन राष्ट्रीय हरित सेनेचे शिक्षक अभिजीत मुकूंदराव जोशी व प्राचार्य मिना उबगडे व राष्ट्रीय हरित सेनेच्या चिमुकल्यांनी केले आहे. सदर उपक्रमाचे अनुकरण करुन पर्यावरणाचे रक्षण करावे असे आवाहन करण्यात आले.

टॅग्स :washimवाशिमHoli 2018होळी २०१८Studentविद्यार्थी