शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
3
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
4
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
5
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
6
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
7
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
8
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
9
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
10
सावधान! 'ही' ५ उपकरणे एक्सटेंशन बोर्डमध्ये लावाल तर होऊ शकतो मोठा स्फोट; जाणून घ्या
11
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
12
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
13
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
14
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
15
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
16
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
17
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
18
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
19
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
20
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका

‘क्वारंटीन’ नागरिक गावात फिरताना दिसल्यास कर्मचारीही येणार अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 11:04 IST

या नागरिकांवर वॉच ठेवण्याची जबाबदारी ग्रामस्तरीय, वार्डस्तरीय समितीच्या सदस्यांवर सोपविली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : परजिल्हा, परराज्यातून जिल्ह्यात आलेल्या जवळपास ३० हजार नागरिकांना होम क्वारंटीन करण्यात आले. तथापि, अनेकजण गावात फिरत असल्याचे निदर्शनात येत आहे. या नागरिकांवर वॉच ठेवण्याची जबाबदारी ग्रामस्तरीय, वार्डस्तरीय समितीच्या सदस्यांवर सोपविली. यापुढे या समितीतील सदस्यांनी हलगर्जी अथवा दुर्लक्ष केल्यास संबंधितांवर कठोर कार्यवाही करण्याचा आदेश जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी २१ मे रोजी दिला. होम क्वारंटीन नागरिकांची चूक ही सरपंच, नगरसेवक, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, कृषि सहाय्यक यांना भोवणार आहे.१५ मे पर्यंत कोरोनामुक्त असलेल्या वाशिम जिल्ह्यात मुंबई येथून आलेल्या एका कोरोनाबाधित रुग्णामुळे आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५ झाली आहे. परराज्य, परजिल्ह्यातून जिल्हयात परतणाऱ्या मजूर, कामगारांमुळे कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून या सर्व नागरिकांना होम क्वारंटीन करण्यात आले. तथापि, अनेकजण गावात बिनधास्त फिरत असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारीची दखल घेत होम क्वारंटीन असलेल्या नागरिकांनी घराबाहेर निघू नये तसेच या नागरिकांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना ग्रामस्तरीय, वार्डस्तरीय समितीला जिल्हाधिकारी मोडक यांनी दिल्या. ग्रामस्तरीय अथवा वार्डस्तरीय समितीच्या सदस्यांवर सोपविण्यात आलेल्या जबाबदारीविषयी हलगर्जी अथवा दुर्लक्ष केल्यास संबंधितांवर कठोर कार्यवाही करण्यात येईल. यामध्ये सरपंच, नगरसेवक, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, कृषि सहाय्यक इत्यादींचा समावेश असेल, असे जिल्हाधिकारी मोडक यांनी दिलेल्या आदेशात नमूद केले आहे.

४९१ ग्रा.पं.मध्ये समित्या कार्यरतजिल्ह्यातील ४९१ ग्राम पंचायतींमध्ये ग्रामस्तरीय समित्या कार्षरत आहेत. परराज्य, परजिल्ह्यातून जिल्ह्यात परतणाºया मजुरांची संख्या वाढत असल्याने या समित्यांनी आता अधिक चोखपणे कामगिरी बजावून कोरोना विषाणूपासून जिल्ह्याला सुरक्षित ठेवावे, असे आवाहन मोडक यांनी केले.

अनेक समित्यांचे, कार्य ढेपाळलेपरराज्य, परजिल्ह्यातून आलेल्या व्यक्तींवर विशेष लक्ष ठेवण्यात जिल्ह्यातील काही ग्रामस्तरीय समित्या, वार्डस्तरीय समित्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनात आले आहे. काही ठिकाणी बाहेर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांचे विलगीकरण करताना वेगवेगळे मापदंड लावले जात असल्याचे तसेच काही समित्या प्रभावीपणे काम करीत नसल्याचे दिसून आले.

शाळांमध्ये व्यवस्थामोठ्या संख्येने मजूर, कामगार परतत असल्याने जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये होम क्वारंटीनची व्यवस्था करण्यात आली. येथेही काही जण शाळेबाहेर पडत आहेत. होम क्वारंटीन व्यक्ती गावात फिरल्यास कर्मचाऱ्यांवरही कारवाई होणार असल्याने कर्मचारी दक्ष झाले आहेत.

 

 

 

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या