शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

‘क्वारंटीन’ नागरिक गावात फिरताना दिसल्यास कर्मचारीही येणार अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 11:04 IST

या नागरिकांवर वॉच ठेवण्याची जबाबदारी ग्रामस्तरीय, वार्डस्तरीय समितीच्या सदस्यांवर सोपविली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : परजिल्हा, परराज्यातून जिल्ह्यात आलेल्या जवळपास ३० हजार नागरिकांना होम क्वारंटीन करण्यात आले. तथापि, अनेकजण गावात फिरत असल्याचे निदर्शनात येत आहे. या नागरिकांवर वॉच ठेवण्याची जबाबदारी ग्रामस्तरीय, वार्डस्तरीय समितीच्या सदस्यांवर सोपविली. यापुढे या समितीतील सदस्यांनी हलगर्जी अथवा दुर्लक्ष केल्यास संबंधितांवर कठोर कार्यवाही करण्याचा आदेश जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी २१ मे रोजी दिला. होम क्वारंटीन नागरिकांची चूक ही सरपंच, नगरसेवक, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, कृषि सहाय्यक यांना भोवणार आहे.१५ मे पर्यंत कोरोनामुक्त असलेल्या वाशिम जिल्ह्यात मुंबई येथून आलेल्या एका कोरोनाबाधित रुग्णामुळे आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५ झाली आहे. परराज्य, परजिल्ह्यातून जिल्हयात परतणाऱ्या मजूर, कामगारांमुळे कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून या सर्व नागरिकांना होम क्वारंटीन करण्यात आले. तथापि, अनेकजण गावात बिनधास्त फिरत असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारीची दखल घेत होम क्वारंटीन असलेल्या नागरिकांनी घराबाहेर निघू नये तसेच या नागरिकांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना ग्रामस्तरीय, वार्डस्तरीय समितीला जिल्हाधिकारी मोडक यांनी दिल्या. ग्रामस्तरीय अथवा वार्डस्तरीय समितीच्या सदस्यांवर सोपविण्यात आलेल्या जबाबदारीविषयी हलगर्जी अथवा दुर्लक्ष केल्यास संबंधितांवर कठोर कार्यवाही करण्यात येईल. यामध्ये सरपंच, नगरसेवक, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, कृषि सहाय्यक इत्यादींचा समावेश असेल, असे जिल्हाधिकारी मोडक यांनी दिलेल्या आदेशात नमूद केले आहे.

४९१ ग्रा.पं.मध्ये समित्या कार्यरतजिल्ह्यातील ४९१ ग्राम पंचायतींमध्ये ग्रामस्तरीय समित्या कार्षरत आहेत. परराज्य, परजिल्ह्यातून जिल्ह्यात परतणाºया मजुरांची संख्या वाढत असल्याने या समित्यांनी आता अधिक चोखपणे कामगिरी बजावून कोरोना विषाणूपासून जिल्ह्याला सुरक्षित ठेवावे, असे आवाहन मोडक यांनी केले.

अनेक समित्यांचे, कार्य ढेपाळलेपरराज्य, परजिल्ह्यातून आलेल्या व्यक्तींवर विशेष लक्ष ठेवण्यात जिल्ह्यातील काही ग्रामस्तरीय समित्या, वार्डस्तरीय समित्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनात आले आहे. काही ठिकाणी बाहेर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांचे विलगीकरण करताना वेगवेगळे मापदंड लावले जात असल्याचे तसेच काही समित्या प्रभावीपणे काम करीत नसल्याचे दिसून आले.

शाळांमध्ये व्यवस्थामोठ्या संख्येने मजूर, कामगार परतत असल्याने जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये होम क्वारंटीनची व्यवस्था करण्यात आली. येथेही काही जण शाळेबाहेर पडत आहेत. होम क्वारंटीन व्यक्ती गावात फिरल्यास कर्मचाऱ्यांवरही कारवाई होणार असल्याने कर्मचारी दक्ष झाले आहेत.

 

 

 

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या