शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
5
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
6
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
7
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
8
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
9
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
10
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
11
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
12
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
13
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
14
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
15
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
16
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
17
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
18
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
19
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
20
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा

‘क्वारंटीन’ नागरिक गावात फिरताना दिसल्यास कर्मचारीही येणार अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 11:04 IST

या नागरिकांवर वॉच ठेवण्याची जबाबदारी ग्रामस्तरीय, वार्डस्तरीय समितीच्या सदस्यांवर सोपविली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : परजिल्हा, परराज्यातून जिल्ह्यात आलेल्या जवळपास ३० हजार नागरिकांना होम क्वारंटीन करण्यात आले. तथापि, अनेकजण गावात फिरत असल्याचे निदर्शनात येत आहे. या नागरिकांवर वॉच ठेवण्याची जबाबदारी ग्रामस्तरीय, वार्डस्तरीय समितीच्या सदस्यांवर सोपविली. यापुढे या समितीतील सदस्यांनी हलगर्जी अथवा दुर्लक्ष केल्यास संबंधितांवर कठोर कार्यवाही करण्याचा आदेश जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी २१ मे रोजी दिला. होम क्वारंटीन नागरिकांची चूक ही सरपंच, नगरसेवक, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, कृषि सहाय्यक यांना भोवणार आहे.१५ मे पर्यंत कोरोनामुक्त असलेल्या वाशिम जिल्ह्यात मुंबई येथून आलेल्या एका कोरोनाबाधित रुग्णामुळे आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५ झाली आहे. परराज्य, परजिल्ह्यातून जिल्हयात परतणाऱ्या मजूर, कामगारांमुळे कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून या सर्व नागरिकांना होम क्वारंटीन करण्यात आले. तथापि, अनेकजण गावात बिनधास्त फिरत असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारीची दखल घेत होम क्वारंटीन असलेल्या नागरिकांनी घराबाहेर निघू नये तसेच या नागरिकांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना ग्रामस्तरीय, वार्डस्तरीय समितीला जिल्हाधिकारी मोडक यांनी दिल्या. ग्रामस्तरीय अथवा वार्डस्तरीय समितीच्या सदस्यांवर सोपविण्यात आलेल्या जबाबदारीविषयी हलगर्जी अथवा दुर्लक्ष केल्यास संबंधितांवर कठोर कार्यवाही करण्यात येईल. यामध्ये सरपंच, नगरसेवक, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, कृषि सहाय्यक इत्यादींचा समावेश असेल, असे जिल्हाधिकारी मोडक यांनी दिलेल्या आदेशात नमूद केले आहे.

४९१ ग्रा.पं.मध्ये समित्या कार्यरतजिल्ह्यातील ४९१ ग्राम पंचायतींमध्ये ग्रामस्तरीय समित्या कार्षरत आहेत. परराज्य, परजिल्ह्यातून जिल्ह्यात परतणाºया मजुरांची संख्या वाढत असल्याने या समित्यांनी आता अधिक चोखपणे कामगिरी बजावून कोरोना विषाणूपासून जिल्ह्याला सुरक्षित ठेवावे, असे आवाहन मोडक यांनी केले.

अनेक समित्यांचे, कार्य ढेपाळलेपरराज्य, परजिल्ह्यातून आलेल्या व्यक्तींवर विशेष लक्ष ठेवण्यात जिल्ह्यातील काही ग्रामस्तरीय समित्या, वार्डस्तरीय समित्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनात आले आहे. काही ठिकाणी बाहेर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांचे विलगीकरण करताना वेगवेगळे मापदंड लावले जात असल्याचे तसेच काही समित्या प्रभावीपणे काम करीत नसल्याचे दिसून आले.

शाळांमध्ये व्यवस्थामोठ्या संख्येने मजूर, कामगार परतत असल्याने जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये होम क्वारंटीनची व्यवस्था करण्यात आली. येथेही काही जण शाळेबाहेर पडत आहेत. होम क्वारंटीन व्यक्ती गावात फिरल्यास कर्मचाऱ्यांवरही कारवाई होणार असल्याने कर्मचारी दक्ष झाले आहेत.

 

 

 

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या