शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
4
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
5
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
6
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
7
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
8
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
9
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
10
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
11
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
12
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
13
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
14
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
15
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
16
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
17
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
18
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
20
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...

३५ पैकी २५ किलोमीटर अंतरावर खड्ड्यांचेच साम्राज्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 10:35 PM

वाशिम: जिल्ह्यातील मंगरुळपीर-अनसिंग या ३५ किलोमीटर अंतराच्या मार्गावर जवळा ते धानोरादरम्यानच्या २५ किलोमीटर अंतरावर केवळ मोठमोठ्या खड्ड्यांचेच साम्राज्य आहे. त्यामुळे या मार्गावर वाहन चालविणाºयांना आपला जीव मुठीत घेऊनच वाहने चालवावी लागत आहेत. 

ठळक मुद्देअनसिंग-मंगरूळपीर मार्गाची दशाजीव मुठीत घेऊन वाहनधारकांचे मार्गक्रमण 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यातील मंगरुळपीर-अनसिंग या ३५ किलोमीटर अंतराच्या मार्गावर जवळा ते धानोरादरम्यानच्या २५ किलोमीटर अंतरावर केवळ मोठमोठ्या खड्ड्यांचेच साम्राज्य आहे. त्यामुळे या मार्गावर वाहन चालविणाºयांना आपला जीव मुठीत घेऊनच वाहने चालवावी लागत आहेत. अनसिंग-मंगरुळपीर हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येतो. या मार्गावर मंगरुळपीर ते अनसिंग दरम्यान एसटी बसगाड्यांशिवाय काळीपिवळी, आॅटोरिक्षा या खाजगी प्रवासी वाहनांसह मालवाहू ट्रक मोठ्या संख्येने धावतात. आता या रस्त्याची अवस्था अत्यंत गंभीर झाली असल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. तथापि, गेल्या दिड वर्षापासून या मार्गावर जागोजागी खड्डे पडले असतानाही मार्गाची दुरुस्ती करण्याची तसदी मात्र घेण्यात आलेली नाही. ठिकठिकाणी मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेतच शिवाय कुठे कुठे, तर आठ फुट अंतरापर्यंतच मार्गच उखडला असून, निव्वळ खडीवरून वाहने धावत आहेत. यामुळे मार्गावर प्रवास करताना केवळ शिल्लक वेळच लागत नाही, तर खड्डे वाचविण्याचा प्रयत्न चालक करीत असल्याने वाहन सारखे आदळत असल्याने प्रवाशांची हाडेही खिळखिळी होत आहेत. या मार्गावर चालकाचे दुर्लक्ष म्हणजे मृत्यूला आमंत्रण अशीच स्थिती निर्माण झाल्याचे दिसत आहे.  याच मार्गावरील तीन नाल्यांवर असलेल्या पुलांची उंची आधीच कमी असताना त्या ठिकाणी मार्गाची अत्यंत दूरावस्था झाल्याने एखादवेळी खड्डे वाचविताना वाहन पुलात कोसळण्याची भितीही आहे. यातील एक पुल नांदगावनजिक, दुसरा कुंभीनजिक, तर तिसरा पुल जवळ्यानजिक आहे.  

मंगरुळपीर आगाराची हिंगोली बसफेरी बंद मंगरुळपीर येथून हिंगोलीकडे जाण्यासाठी अनसिंग मार्ग जवळचा असल्याने या मार्गावर मंगरुळपीर आगाराकडून वर्षभरापूर्वी हिंगोलीसाठी बसफेरी सुरू करण्यात आली होती; परंतु अवघ्या काही दिवसांतच या मार्गाची दूरवस्था झाल्याने या मार्गावरून बस चालविणे कठीण झाले, तसेच मार्गावरील खड्ड्यांमुळे वृद्ध प्रवाशांसह बालकांना प्रवासादरम्यान अतोनात त्रास सहन करावा लागत होता. त्याशिवाय बसचेही नुकसान होण्याची शक्यता होती. याच कारणामुळे मंगरुळपीर आगाराकडून ही बसफेरी बंद करण्यात आली.  

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा