शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

वाशिम जिल्ह्यातील तीन बाजार समित्यामध्ये होणार ई-नाम प्रणाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2020 2:39 PM

रिसोड, कारंजा आणि मानोरा या तीन या बाजार समितीत ही प्रणाली राबविण्यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे.

- दादाराव गायकवाड लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :नव्या वर्षांत शेतमाल खरेदी प्रक्रिया शेतकऱ्यांसाठी अधिक सुलभ होणार आहे. शासनाच्या धोरणानुसार जिल्ह्यातील रिसोड, कारंजा आणि मानोरा बाजार समितीत ई-नाम (इलेक्ट्रीकल नॅॅशनल अ‍ॅग्रीकल्चर मार्केट) प्रणालीची अमलबजावणी नव्या वर्षात होणार आहे. ही प्रक्रिया पार पडल्यानंतर जिल्ह्यात या प्रणालीतील बाजार समित्यांची संख्या पाच होणार असून, जिल्ह्यात यापूर्वी मंगरुळपीर आणि वाशिम बाजार समितीत ही प्रणाली राबविण्यात येत आहे.बाजार समित्यांमधील शेतमालाची खरेदी-विक्री व्यवस्था इलेक्ट्रॉनिक प्लॅट फॉर्मवर आणण्यासाठी राज्यातील ६३ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा ‘ई-नाम’ योजनेत समावेश करण्यात आलेला आहे. या योजनेची प्रभावी अमलबजावणी करण्यासाठी शासनाने नोडल अधिकारी म्हणून विभागीय स्तरावर विभागीय सहनिबंधक, तर जिल्हास्तरावर जिल्हा उपनिबंधकांकडे जबाबदारी सोपविली आहे. या ई-नाम योजनेची राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये प्रभावी अंमलबजावणी करण्याकरीता शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांना राज्यस्तरीय नोडल एजन्सी म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यापुढे ई-नाम योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय नोडल एजन्सी म्हणून कार्यरत राहणार असून, ई-नाम योजनेची विभाभीय स्तरावर अमलबजावणी करण्याकरीता सर्व संबंधीत विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था व जिल्हा स्तरावर अंमलबजावणी करण्याकरीता सर्व संबंधीत जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांना ई-नाम योजनेचे समन्वय अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान, वाशिम जिल्ह्यात यापूर्वी मंगरुळपीर आणि वाशिम बाजार समितीत या प्रणालीचा अवलंब करण्यात आलेला असून, आता रिसोड, कारंजा आणि मानोरा या तीन या बाजार समितीत ही प्रणाली राबविण्यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे. यासाठी पणन मंडळाकडे प्रस्तावही पाठविण्यात आले आहेत.शेतकऱ्यांना मिळणार ‘आॅनलाईन मार्केटिंग प्लॅटफॉर्म’शेतमाल विक्री व्यवस्थेमधील पारंपरिक पद्धती बंद करून संगणकीकृत आणि आॅनलाईन लिलावाद्वारे व्यवहार करण्यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय कृषी बाजाराची संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. या प्रणालीद्वारे देशातील बाजार समित्या व त्यांचे व्यवहार इंटरनेटद्वारे राष्ट्रीय बाजारपेठेशी जोडण्यात आले आहेत. परिणामी शेतकºयांना ‘आॅनलाईन मार्केटिंग कंपन्यांचे ‘प्लॅटफॉर्म’ मिळणार आहे. या प्रणालीलंतर्गत ‘ई-आॅक्शन’ ई-वे-स्केलचा समावेश असल्याने शेतकºयांना मोठा फायदाही होणार आहे.

टॅग्स :washimवाशिमMarket committee washimबाजार समिती वाशिमRisodरिसोडKaranjaकारंजाManoraमानोरा