दगडउमरा : परिसरातील ई-पीक पाहणी ॲप समजत नसल्याने, २५ टक्केच शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला आहे. ॲपमुळे डाेकेदुखी वाढल्याचे शेतकऱ्यांमध्ये बाेलले जात आहे.
परिसरातील काही शेतकऱ्यांकडे मोबाइलच नाहीत, तर शेतकऱ्यांनी पेरा ऑनलाइन करण्याचा प्रश्न पडला आहे. महाराष्ट्र सरकारने या वर्षी ई-पीक पाहणी ॲप सुरू केले आहे. महसूल विभाग आणि कृषी विभागाच्या वतीने ई-पीक पाहणी हा संयुक्त प्रकल्प राबविण्यात येत आहे. माझी शेती, माझा सातबारा, माझा पीकपेरा या घोषवाक्याचा आधारे शासनाने सुरू केलेल्या पीक पाहणी करण्याचा राज्यातील वाशिम जिल्ह्यांमध्ये पीक पाहणी ॲपला शेतकऱ्यांचा प्रतिसाद कमी मिळत आहे, तर काही ठिकाणी महसूल प्रशासनाला पीक पाहणी ॲपचा वापर करावा, यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करूनही शेतकऱ्यांना कळेना झाले आहे. ई-पीक पाहणी नोंदविण्यास ४ दिवस बाकी असून, ई-पीक पाहणी ॲपद्वारे नोंदविण्यास शेतकऱ्यांना एक महिन्याची मुदत देण्यात आली होती. पीक पाहणी ॲपमधून नोंदणीची मुदत १५ सप्टेंबरपर्यंत आहे. सातबारा उताऱ्यावर ऑनलाइन पद्धतीने खरीप हंगामातील पिकाच्या नोंदणीला अवघे ४ दिवस शिल्लक राहिले आहेत.