शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

अर्धवट कामामुळे मिर्झापूर-शिरपूर रस्ता गेला धरणाच्या पाण्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 15:24 IST

शिरपूर: मालेगाव तालुक्यातील महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या मिर्झापूर प्रकल्पाचे काम करीत असताना मिर्झापूर-शिरपूर हा रस्ता बुडित क्षेत्रात गेला, तर नव्या रस्त्याचे काम अर्धवट झाल्याने हा रस्ताही धरणाच्या पाण्यातच गेला आहे.

ठळक मुद्देमिर्झापूर परिसरात सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी मिर्झापूर प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. हा प्रकल्प उभारताना नियोजनबद्ध काम न झाल्याने आता शेतकºयांसह ग्रामस्थांना वेगळ्याच समस्येचा सामना करावा लागत आहे. रस्ता बुडित क्षेत्रात गेल्याने ग्रामस्थ व शेतकºयांच्या वहिवाटीचा प्रश्न निर्माण झाला.

शिरपूर: मालेगाव तालुक्यातील महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या मिर्झापूर प्रकल्पाचे काम करीत असताना मिर्झापूर-शिरपूर हा रस्ता बुडित क्षेत्रात गेला, तर नव्या रस्त्याचे काम अर्धवट झाल्याने हा रस्ताही धरणाच्या पाण्यातच गेला आहे. त्यामुळे या मार्गावर दोन्ही गावांच्या ग्रामस्थांना वहिवाट करणे कठीण झाले आहे.

मिर्झापूर परिसरात सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी मिर्झापूर प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. या प्रकल्पामुळे परिसरातील ६५० हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. परंतु, हा प्रकल्प उभारताना नियोजनबद्ध काम न झाल्याने आता शेतकºयांसह ग्रामस्थांना वेगळ्याच समस्येचा सामना करावा लागत आहे. या प्रकल्पाच्या उभारणीदरम्यान शेतकºयांची जमीन अधिग्रहित करण्यात आली. त्याचवेळी मिर्झापूर-शिरपूर हा रस्ताही प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रात गेला. हा रस्ता बुडित क्षेत्रात गेल्याने ग्रामस्थ व शेतकºयांच्या वहिवाटीचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे या रस्त्याला पर्यायी रस्ता देण्याची मागणी करण्यात आली आणि ती मान्य करून जलसंधारण विभागाने मिर्झापूर-किन्ही घोडमोड हा पर्यायी रस्ताही केला. यासाठी नदीवर पुल उभारण्यात आला; परंतु पावसामुळे रस्त्याची दबाई योग्यपद्धतीने करून त्याचे डांबरीकरण होऊ शकले नाही. आता पावसाळा सुरु झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामुळे हा नवा रस्ताही पाण्यातच गेला आहे. या रस्त्यावर वाहनेही चालू शकत नाही आणि पायी मार्गकाढणेही शक्य नाही. त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैन