शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

महावितरणच्या भारनियमनामुळे रब्बीचे क्षेत्र घटण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 16:39 IST

वाशिम : ऐन रब्बी हंगामाच्या पेरणी काळातच महावितरणने भारनियमन सुरू केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनात अडचणी निर्माण झाल्या असून, आता या भारनियमनामुळे रब्बी पिकांचे क्षेत्र घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ऐन रब्बी हंगामाच्या पेरणी काळातच महावितरणने भारनियमन सुरू केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनात अडचणी निर्माण झाल्या असून, आता या भारनियमनामुळे रब्बी पिकांचे क्षेत्र घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पश्चिम वºहाडातील शेतकºयांनी रब्बीसाठी मशागत केली; परंतु भारनियमनामुळे पाणी देणे अशक्य असल्याने त्यांनी पेरणी थांबविल्याचे दिसत आहे.राज्यात विजेची उपलब्धता १६००० ते १७००० मेगावॅट एवढी असताना महावितरणची वीजेची मागणी १९५०० मेगावॅटवर पोहोचली आहे. त्यामुळे तब्बल २००० ते २५०० मेगावॅट वीजेची तुट निर्माण झाली आहे. त्यामुळे महावितरणकडून जी-१, जी-२ आणि जी-३ या गटांत भारनियमन करण्यात करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या तिन्ही गटांत वीजहानी मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळेच भारनियमन लागू करण्यात आले आहे. याचा सर्वाधिक फटका शेतकºयांना बसत आहे. सद्यस्थितीत आठवड्यात तीन दिवस रात्री आणि दिन दिवस दिवसाच्या वेळेत भारनियमन करण्यात येत आहे. निर्धारित कार्यक्रमानुसार तीन दिवस ८ तास आणि चार दिवस १० असे आलटून पालटून भारनियन सुरू असताना कृषीपंपावर अतिरिक्त भारनियमन करण्याच्या सुचनाच विभागीय कार्यालयांना वरिष्ठस्तरावर देण्यात आल्या आहेत. त्यामुळे भारनियनम १४ तासांपेक्षा अधिक होत आहे. ऐन रब्बी हंगामाच्या सुुरुवातीलाच भारनियमन करण्यात येत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. पश्चिम वºहाडात यंदा पाणी उपलब्ध असतानाही भारनियमनामुळे त्याचा वापर करणे अशक्य असल्याने अनेक शेतकºयांनी रब्बीसाठी मशागत करूनही पेरणीस सुरुवात केली नाही. पिकांना योग्य वेळेत पाणी देणे शक्य न झाल्यास मोठे नुकसान होण्याची भिती असल्याने यंदा रब्बीचे क्षेत्र घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शेतकºयांना सिंचन करण्यात अडचणी येऊ नये म्हणून भारनियमनाच्या वेळेत बदल करण्याबाबत वरिष्ठस्तरावरून मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. राज्यात विजेचा तुटवडा असल्याने भारनियमन कमी करण्याबाबत मात्र काही सांगता येणार नाही.-व्ही. बी. बेथारियाअधीक्षक अभियंता,महावितरण, वाशिम

 महावितरणने ऐन रब्बी हंगामातच भारनियमन सुरू केले आहे. यामुळे पेरणी केलेल्या हरभरा, गहू पिकाला पाणी देणे अशक्य झाले आहे. या भारनियमनामुळेच पाणी असतानाही काही शेतकरी रब्बीची पेरणी करण्यास धजावत नसल्याने भारनियमन कमी करण्याची मागणी करण्यात येत आहे.-संतोष गंगावणेशेतकरी, देपुळ (वाशिम)

टॅग्स :washimवाशिमmahavitaranमहावितरण