शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
2
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
3
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
4
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
5
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
6
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
7
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
8
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
9
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
10
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!
11
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
12
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
13
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
14
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
15
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
16
France Gen-Z Protest: फ्रान्समध्ये Gen- Z चा संताप! लिमामध्ये DINA विरोधात बंड, दगडफेक आणि पोलिसांशी झटापट
17
...तर पतीच्या प्रेयसीकडून पत्नीला मिळेल भरपाई; हायकोर्टानं नोंदवली निरीक्षणे
18
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
19
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
20
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी

महावितरणच्या भारनियमनामुळे रब्बीचे क्षेत्र घटण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 16:39 IST

वाशिम : ऐन रब्बी हंगामाच्या पेरणी काळातच महावितरणने भारनियमन सुरू केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनात अडचणी निर्माण झाल्या असून, आता या भारनियमनामुळे रब्बी पिकांचे क्षेत्र घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ऐन रब्बी हंगामाच्या पेरणी काळातच महावितरणने भारनियमन सुरू केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनात अडचणी निर्माण झाल्या असून, आता या भारनियमनामुळे रब्बी पिकांचे क्षेत्र घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पश्चिम वºहाडातील शेतकºयांनी रब्बीसाठी मशागत केली; परंतु भारनियमनामुळे पाणी देणे अशक्य असल्याने त्यांनी पेरणी थांबविल्याचे दिसत आहे.राज्यात विजेची उपलब्धता १६००० ते १७००० मेगावॅट एवढी असताना महावितरणची वीजेची मागणी १९५०० मेगावॅटवर पोहोचली आहे. त्यामुळे तब्बल २००० ते २५०० मेगावॅट वीजेची तुट निर्माण झाली आहे. त्यामुळे महावितरणकडून जी-१, जी-२ आणि जी-३ या गटांत भारनियमन करण्यात करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या तिन्ही गटांत वीजहानी मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळेच भारनियमन लागू करण्यात आले आहे. याचा सर्वाधिक फटका शेतकºयांना बसत आहे. सद्यस्थितीत आठवड्यात तीन दिवस रात्री आणि दिन दिवस दिवसाच्या वेळेत भारनियमन करण्यात येत आहे. निर्धारित कार्यक्रमानुसार तीन दिवस ८ तास आणि चार दिवस १० असे आलटून पालटून भारनियन सुरू असताना कृषीपंपावर अतिरिक्त भारनियमन करण्याच्या सुचनाच विभागीय कार्यालयांना वरिष्ठस्तरावर देण्यात आल्या आहेत. त्यामुळे भारनियनम १४ तासांपेक्षा अधिक होत आहे. ऐन रब्बी हंगामाच्या सुुरुवातीलाच भारनियमन करण्यात येत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. पश्चिम वºहाडात यंदा पाणी उपलब्ध असतानाही भारनियमनामुळे त्याचा वापर करणे अशक्य असल्याने अनेक शेतकºयांनी रब्बीसाठी मशागत करूनही पेरणीस सुरुवात केली नाही. पिकांना योग्य वेळेत पाणी देणे शक्य न झाल्यास मोठे नुकसान होण्याची भिती असल्याने यंदा रब्बीचे क्षेत्र घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शेतकºयांना सिंचन करण्यात अडचणी येऊ नये म्हणून भारनियमनाच्या वेळेत बदल करण्याबाबत वरिष्ठस्तरावरून मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. राज्यात विजेचा तुटवडा असल्याने भारनियमन कमी करण्याबाबत मात्र काही सांगता येणार नाही.-व्ही. बी. बेथारियाअधीक्षक अभियंता,महावितरण, वाशिम

 महावितरणने ऐन रब्बी हंगामातच भारनियमन सुरू केले आहे. यामुळे पेरणी केलेल्या हरभरा, गहू पिकाला पाणी देणे अशक्य झाले आहे. या भारनियमनामुळेच पाणी असतानाही काही शेतकरी रब्बीची पेरणी करण्यास धजावत नसल्याने भारनियमन कमी करण्याची मागणी करण्यात येत आहे.-संतोष गंगावणेशेतकरी, देपुळ (वाशिम)

टॅग्स :washimवाशिमmahavitaranमहावितरण