शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

अचूक बँक खात्याअभावी अतिवृष्टीची रक्कम शासनजमा होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 17:11 IST

मुदतीत उपरोक्त कार्यवाही झाली नाही तर शिल्लक रक्कम ही ३० जून रोजी शासनाकडे परत केली जाणार आहे.

वाशिम : अमरावती विभागात आॅक्टोबर-नोव्हेंबर-२०१९ दरम्यान झालेल्या अतिवृष्टीची नुकसानभरपाईची रक्कम शासनाने विविध टप्प्यात जिल्हास्तरावर मार्चपूर्वी वितरीत केली. बँक खात्यातील चुका व अन्य कारणामुळे अजूनही ८ टक्के शेतकरी यापासून वंचित राहिले. वंचित शेतकऱ्यांना १५ जूनपर्यंत संबंधित तलाठ्यांकडे आवश्यक ती कागदपत्रे देऊन नुकसानभरपाईचा लाभ घेता येईल. या मुदतीत उपरोक्त कार्यवाही झाली नाही तर शिल्लक रक्कम ही ३० जून रोजी शासनाकडे परत केली जाणार आहे.राज्यात आॅक्टोबर-नोव्हेबर २०१९ मध्ये ‘क्यार’ व ‘महा’ चक्रिवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे जोरदार अवकाळी पाऊस पडून राज्यातील ३४ जिल्ह्यातील ३४९ तालुक्यांतील शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले होते. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील २ लाख ५० हजार ३५० शेतकऱ्यांच्या २ लाख ८७ हजार १६५ हेक्टरवरील ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले होते. नुकसानापोटी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांना टप्प्याटप्प्याने निधी मिळाला. आतापर्यंत ९२ टक्के शेतकºयांच्या बँक खात्यात नुकसानभरपाईची रक्कम जमा झाली आहे. उर्वरीत ८ टक्के शेतकºयांनी आवश्यक ती कागदपत्रे सादर न केल्याने तसेच अचूक बँक क्रमांक, आधार क्रमांक न दिल्याने ही रक्कम शेतकºयांपर्यंत पोहचू शकली नाही. वंचित शेतकºयांना नुकसानभरपाईचा लाभ देण्यासाठी शेवटची संधी देण्यात आली असून, १५ जूनपर्यंत या शेतकºयांना आपले बँक खाते क्रमांक व आधारकार्डची छायांकीत प्रत संबंधित तलाठ्यांकडे जमा करावी लागणार आहे. त्याऊपरही कुणी तलाठ्याशी संपर्क साधला नाही तर शिल्लक राहिलेली रक्कम ही ३० जून रोजी शासनाकडे परत केली जाणार आहे.

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्र