शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

अचूक बँक खात्याअभावी अतिवृष्टीची रक्कम शासनजमा होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 17:11 IST

मुदतीत उपरोक्त कार्यवाही झाली नाही तर शिल्लक रक्कम ही ३० जून रोजी शासनाकडे परत केली जाणार आहे.

वाशिम : अमरावती विभागात आॅक्टोबर-नोव्हेंबर-२०१९ दरम्यान झालेल्या अतिवृष्टीची नुकसानभरपाईची रक्कम शासनाने विविध टप्प्यात जिल्हास्तरावर मार्चपूर्वी वितरीत केली. बँक खात्यातील चुका व अन्य कारणामुळे अजूनही ८ टक्के शेतकरी यापासून वंचित राहिले. वंचित शेतकऱ्यांना १५ जूनपर्यंत संबंधित तलाठ्यांकडे आवश्यक ती कागदपत्रे देऊन नुकसानभरपाईचा लाभ घेता येईल. या मुदतीत उपरोक्त कार्यवाही झाली नाही तर शिल्लक रक्कम ही ३० जून रोजी शासनाकडे परत केली जाणार आहे.राज्यात आॅक्टोबर-नोव्हेबर २०१९ मध्ये ‘क्यार’ व ‘महा’ चक्रिवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे जोरदार अवकाळी पाऊस पडून राज्यातील ३४ जिल्ह्यातील ३४९ तालुक्यांतील शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले होते. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील २ लाख ५० हजार ३५० शेतकऱ्यांच्या २ लाख ८७ हजार १६५ हेक्टरवरील ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले होते. नुकसानापोटी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांना टप्प्याटप्प्याने निधी मिळाला. आतापर्यंत ९२ टक्के शेतकºयांच्या बँक खात्यात नुकसानभरपाईची रक्कम जमा झाली आहे. उर्वरीत ८ टक्के शेतकºयांनी आवश्यक ती कागदपत्रे सादर न केल्याने तसेच अचूक बँक क्रमांक, आधार क्रमांक न दिल्याने ही रक्कम शेतकºयांपर्यंत पोहचू शकली नाही. वंचित शेतकºयांना नुकसानभरपाईचा लाभ देण्यासाठी शेवटची संधी देण्यात आली असून, १५ जूनपर्यंत या शेतकºयांना आपले बँक खाते क्रमांक व आधारकार्डची छायांकीत प्रत संबंधित तलाठ्यांकडे जमा करावी लागणार आहे. त्याऊपरही कुणी तलाठ्याशी संपर्क साधला नाही तर शिल्लक राहिलेली रक्कम ही ३० जून रोजी शासनाकडे परत केली जाणार आहे.

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्र