शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

निधीअभावी मानोरा तालुक्यातील ३८ अंगणवाड्या अर्धवट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 4:03 PM

वाशिम: जिल्ह्यात तालुक्यात जवळपास ८ वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या अंगणवाड्यांचे बांधकाम निधीअभावी अर्धवट अवस्थेत पडून आहे.

ठळक मुद्दे चिमुकल्यांची शाळा उघड्यावर

वाशिम: जिल्ह्यात तालुक्यात जवळपास ८ वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या अंगणवाड्यांचे बांधकाम निधीअभावी अर्धवट अवस्थेत पडून आहे. या प्रकारामुळे अंगणवाडी सेविकांना चिमुकल्याचा पोषण आहार देणे कठीण झाले आहेच शिवाय त्यांना उघड्यावर बसवून शासनाचे विविध उपक्रम पार पाडावे लागत आहेत. एकट्या मानोरा तालुक्यातच अशा ३८ अंगणवाडी केंद्रांचे काम निधीअभावी रखडले आहे. 

ग्रामीण भागांमध्ये चालवल्या जाणाºया अंगणवाडी केंद्रांत महिला आणि बालकांच्या सर्वांगीण विकासावर अधिक भर दिला जातो. ० ते ५ वर्ष वयोगटातील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणे तसेच माता-बालकांचे आरोग्य, आहार, कुपोषण या अन्य बाबीं कडे लक्ष पुरवणे अशा कार्यांचा समावेश अंगणवाडी केंद्रांत समावेश असतो. त्याशिवाय पालकांना वेळोवेळी मार्गदर्शन करणे, ग्रामीण भागातील महिलांना आहार व आरोग्य याविषयी योग्य मार्गदर्शन करणे हे देखील अंगणवाडी केंद्रांचे मुलभूत कार्य आहे. यासाठी जिल्ह्यात ११ अंगणवाडी केंद्र कार्यरत आहेत. त्यामध्येच मानोरा तालुक्यातील अर्धवट अवस्थेत असलेल्या ३८ केंद्रांचाही समावेश आहे. शासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतर या अंगणवाड्या कागदावर सुरू आहेत; परंतु या अंगणवाड्यांच्या इमारतीच पूर्ण नसल्याने अंगणवाडी सेविका, मदतनिसांना आपले कर्तव्य पार पाडणे कठीण झाले आहे. आसोला खु., आमकिन्ही वाईगौळ, शेंदोणा, पोहरादेवी, फुलउमरी, सोमेश्वर नगर, म्हसणी, वापटा कुपटा, विठोली आदिंसह एकूण ३८ गावांसाठी २००८-०९ मध्ये अंगणवाडी केंद्रांना मंजुरी मिळाली होती. या अंगणवाड्यांचे बांधकाम करण्यासाठी त्यावेळी निधीही प्राप्त झाला आणि अंगणवाड्यांचे बांधकामही सुरू झाले; परंतु हे काम पूर्ण करण्यासाठी पुढे आवश्यक असलेला निधी मात्र मिळालाच नाही. त्यामुळे गेल्या ८ वर्षांपासून या अंगणवाड्यांच्या इमारती अर्धवटच आहेत. 

 बांधकामाची होतेय दूरावस्था 

मानोरा तालुक्यातील मंजूर झालेल्या ३८ अंगणवाड्यांचे काम निधीअभावी अर्धवट अवस्थेत आहे. आता गेल्या ८ वर्षांपासून हिच स्थिती असल्याने या बांधकामाकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने बांधकाम ढासळू लागले आहे. काही इमारतीच्या दारे, खिडक््यांची मोडतोड झाली असून, या इमारतींचा वापर लघूशंका उरकण्यासाठी केला जात आहे. इमारतीच्या परिसरात ग्रामस्थांकडून घरातील घाणकचरा टाकल्या जात असल्याने या परिसरात उकंडेही तयार झाले आहेत. त्यावरून शासनाकडून मंजूर निधीचा एक प्रकारे अपव्ययच झाल्याचेही स्पष्ट होत आहे.