शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

अपूर्ण विहिरींमुळे नवीन विहिरींची कामे वांध्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 14:11 IST

वाशिम : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विहिरींच्या प्रलंबित कामांच्या संख्येवरून, नवीन विहिरींची मंजूरी अवंलबून आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विहिरींच्या प्रलंबित कामांच्या संख्येवरून, नवीन विहिरींची मंजूरी अवंलबून आहे. पाच पेक्षा जास्त विहिरी अपूर्ण असल्यास, त्या ग्रामपंचायतींमध्ये नवीन विहिरींना मान्यता मिळत नसल्याचा फटका जिल्ह्यातील नवीन विहिरींना मोठ्या प्रमाणात बसला आहे. शेतीला सिंचनाची जोड देण्यासाठी शासनातर्फे विहिर बांधकामाला प्राधान्य दिले जात आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विहिरीचा लाभ दिला जातो. विहिर बांधकामाचा वेळोवेळी आढावा घेतला जात नसल्याने विहिरींची कामे प्रलंबित राहतात. अपूर्ण असलेल्या विहिरींची कामे तातडीने पूर्ण होण्यासाठी नवीन विहिरींना मान्यता देण्याचे धोरण यापूर्वीच निश्चित केले आहे. जिल्ह्यात आढावा घेतला असता, अनेक ग्रामपंचायतींमध्ये पाचपेक्षा जास्त विहिरींची कामे प्रलंबित आहेत. त्यामुळे रोहयोंतर्गत शेतकºयांचे नवीन विहिरीसाठी आलेले अर्ज धूळखात पडत आहेत. प्रगतीपथावर असलेल्या विहिरींची कामे लक्षात घेऊनच नवीन विहिरींना मंजूरी मिळणार आहे. एका ग्राम पंचायतीत एका वेळेस पाच विहिरींची कामे प्रगतीपथावर राहतील, याची दक्षता ग्रामपंचायती घ्यावी लागत आहे. एका ग्रामपंचायतीत तीन विहिरींचे कामे प्रगतीपथावर असल्यास नव्याने दोन विहिरींची कामे हाती घेण्यात येतील; परंतू पाच पेक्षा जास्त विहिरी अपूर्ण असतील तर संबंधित ग्रामपंचायतीत नवीन विहिरींना प्रशासकीय मान्यता देऊ नये, असे निर्देश असल्याने नवीन विहिरींसंदर्भातील अर्ज धूळखात आहेत. जिल्हा परिषदेच्या यापूर्वीच्या स्थायी तसेच सर्वसाधारण सभेत नवीन विहिरींबाबत चर्चा झाल्या, प्रश्न उपस्थित झाले होते. परंतू, प्रलंबित विहिरींची कामे पूर्ण न झाल्याने नवीन विहिरींचा प्रश्न निकाली निघू शकला नसल्याचे सांगितले जात आहे.

टॅग्स :washimवाशिम