शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
4
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
5
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
6
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
7
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
8
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
9
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
10
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
11
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
12
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
13
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
14
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
15
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
16
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
17
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
18
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
19
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
20
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?

अपूर्ण विहिरींमुळे नवीन विहिरींची प्रशासकीय मान्यता येणार वांध्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 16:07 IST

पाच पेक्षा जास्त विहिरी अपूर्ण असल्यास, त्या ग्रामपंचायतींमध्ये नवीन विहिरींना प्रशासकीय मान्यता देण्यात येऊ नये, असे जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना बजावले आहे. त्यामुळे अपूर्ण विहिरींवरून नवीन विहिरींची प्रशासकीय मान्यता वांध्यात येणार आहे.

वाशिम : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत प्रलंबित असलेल्या विहिरींची कामे पूर्ण होण्यासाठी रोहयो विभागाने ५ जानेवारीला मार्गदर्र्शक सूचना जारी केल्या असून एका ग्राम पंचायतीला एका वेळेस पाच विहिरींची कामे प्रगतीपथावर राहतील, याची दक्षता घ्यावी लागणार आहे. पाच पेक्षा जास्त विहिरी अपूर्ण असल्यास, त्या ग्रामपंचायतींमध्ये नवीन विहिरींना प्रशासकीय मान्यता देण्यात येऊ नये, असे जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना बजावले आहे. त्यामुळे अपूर्ण विहिरींवरून नवीन विहिरींची प्रशासकीय मान्यता वांध्यात येणार आहे.शेतीला सिंचनाची जोड देण्यासाठी शासनातर्फे विहिर बांधकामाला प्राधान्य दिले जात आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विहिरीचा लाभ दिला जातो. विहिर बांधकामाचा वेळोवेळी आढावा घेतला जात नसल्याने विहिरींची कामे प्रलंबित राहत असल्याचे समोर आले आहे. राज्यातील सध्याची दुष्काळसदृश परिस्थिती विचारात घेता अपूर्ण असलेल्या विहिरींची कामे तातडीने पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून राज्याच्या रोहयो विभागाने जिल्हास्तरीय यंत्रणेसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्या अनुषंगाने प्रगतीपथावर असलेल्या विहिरींची कामे लक्षात घेऊनच नवीन विहिरींना मंजूरी मिळणार आहे. एका ग्राम पंचायतीत एका वेळेस पाच विहिरींची कामे प्रगतीपथावर राहतील, याची दक्षता ग्रामपंचायती तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना घ्यावी लागणार आहे. एका ग्रामपंचायतीत तीन विहिरींचे कामे प्रगतीपथावर असल्यास नव्याने दोन विहिरींची कामे हाती घेण्यात येतील; परंतू पाच पेक्षा जास्त विहिरी अपूर्ण असतील तर संबंधित ग्रामपंचायतीत नवीन विहिरींना प्रशासकीय मान्यता देऊ नये, निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना देण्यात आले आहेत. या निर्देशांच्या अंमलबजावणीचा एक भाग म्हणून ग्रामपंचायतनिहाय अपूर्ण असलेल्या विहिरी आणि रोहयोंतर्गत ग्रामपंचायतनिहाय नव्याने मंजूर असलेल्या विहिरींचा आढावा घ्यावा लागणार आहे. संबंधित ग्रामपंचायतींमध्ये पाच पेक्षा अधिक विहिरींची कामे अपूर्ण असतील आणि नव्याने तेथे विहिर मंजूर असेल तर त्या विहिरींची प्रशासकीय मान्यता वांध्यात येणार आहे. 

शासन निर्णयानुसार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गतच्या अपूर्ण विहिरी आणि नव्याने मंजूरी द्यावयाच्या विहिरींची कार्यवाही वाशिम जिल्ह्यात केली जाईल.- दीपक कुमार मीनामुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद वाशिम

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषदFarmerशेतकरी