शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

अपूर्ण विहिरींमुळे नवीन विहिरींची प्रशासकीय मान्यता येणार वांध्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 16:07 IST

पाच पेक्षा जास्त विहिरी अपूर्ण असल्यास, त्या ग्रामपंचायतींमध्ये नवीन विहिरींना प्रशासकीय मान्यता देण्यात येऊ नये, असे जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना बजावले आहे. त्यामुळे अपूर्ण विहिरींवरून नवीन विहिरींची प्रशासकीय मान्यता वांध्यात येणार आहे.

वाशिम : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत प्रलंबित असलेल्या विहिरींची कामे पूर्ण होण्यासाठी रोहयो विभागाने ५ जानेवारीला मार्गदर्र्शक सूचना जारी केल्या असून एका ग्राम पंचायतीला एका वेळेस पाच विहिरींची कामे प्रगतीपथावर राहतील, याची दक्षता घ्यावी लागणार आहे. पाच पेक्षा जास्त विहिरी अपूर्ण असल्यास, त्या ग्रामपंचायतींमध्ये नवीन विहिरींना प्रशासकीय मान्यता देण्यात येऊ नये, असे जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना बजावले आहे. त्यामुळे अपूर्ण विहिरींवरून नवीन विहिरींची प्रशासकीय मान्यता वांध्यात येणार आहे.शेतीला सिंचनाची जोड देण्यासाठी शासनातर्फे विहिर बांधकामाला प्राधान्य दिले जात आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विहिरीचा लाभ दिला जातो. विहिर बांधकामाचा वेळोवेळी आढावा घेतला जात नसल्याने विहिरींची कामे प्रलंबित राहत असल्याचे समोर आले आहे. राज्यातील सध्याची दुष्काळसदृश परिस्थिती विचारात घेता अपूर्ण असलेल्या विहिरींची कामे तातडीने पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून राज्याच्या रोहयो विभागाने जिल्हास्तरीय यंत्रणेसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्या अनुषंगाने प्रगतीपथावर असलेल्या विहिरींची कामे लक्षात घेऊनच नवीन विहिरींना मंजूरी मिळणार आहे. एका ग्राम पंचायतीत एका वेळेस पाच विहिरींची कामे प्रगतीपथावर राहतील, याची दक्षता ग्रामपंचायती तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना घ्यावी लागणार आहे. एका ग्रामपंचायतीत तीन विहिरींचे कामे प्रगतीपथावर असल्यास नव्याने दोन विहिरींची कामे हाती घेण्यात येतील; परंतू पाच पेक्षा जास्त विहिरी अपूर्ण असतील तर संबंधित ग्रामपंचायतीत नवीन विहिरींना प्रशासकीय मान्यता देऊ नये, निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना देण्यात आले आहेत. या निर्देशांच्या अंमलबजावणीचा एक भाग म्हणून ग्रामपंचायतनिहाय अपूर्ण असलेल्या विहिरी आणि रोहयोंतर्गत ग्रामपंचायतनिहाय नव्याने मंजूर असलेल्या विहिरींचा आढावा घ्यावा लागणार आहे. संबंधित ग्रामपंचायतींमध्ये पाच पेक्षा अधिक विहिरींची कामे अपूर्ण असतील आणि नव्याने तेथे विहिर मंजूर असेल तर त्या विहिरींची प्रशासकीय मान्यता वांध्यात येणार आहे. 

शासन निर्णयानुसार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गतच्या अपूर्ण विहिरी आणि नव्याने मंजूरी द्यावयाच्या विहिरींची कार्यवाही वाशिम जिल्ह्यात केली जाईल.- दीपक कुमार मीनामुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद वाशिम

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषदFarmerशेतकरी