शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अपूर्ण विहिरींमुळे नवीन विहिरींची प्रशासकीय मान्यता येणार वांध्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 16:07 IST

पाच पेक्षा जास्त विहिरी अपूर्ण असल्यास, त्या ग्रामपंचायतींमध्ये नवीन विहिरींना प्रशासकीय मान्यता देण्यात येऊ नये, असे जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना बजावले आहे. त्यामुळे अपूर्ण विहिरींवरून नवीन विहिरींची प्रशासकीय मान्यता वांध्यात येणार आहे.

वाशिम : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत प्रलंबित असलेल्या विहिरींची कामे पूर्ण होण्यासाठी रोहयो विभागाने ५ जानेवारीला मार्गदर्र्शक सूचना जारी केल्या असून एका ग्राम पंचायतीला एका वेळेस पाच विहिरींची कामे प्रगतीपथावर राहतील, याची दक्षता घ्यावी लागणार आहे. पाच पेक्षा जास्त विहिरी अपूर्ण असल्यास, त्या ग्रामपंचायतींमध्ये नवीन विहिरींना प्रशासकीय मान्यता देण्यात येऊ नये, असे जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना बजावले आहे. त्यामुळे अपूर्ण विहिरींवरून नवीन विहिरींची प्रशासकीय मान्यता वांध्यात येणार आहे.शेतीला सिंचनाची जोड देण्यासाठी शासनातर्फे विहिर बांधकामाला प्राधान्य दिले जात आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विहिरीचा लाभ दिला जातो. विहिर बांधकामाचा वेळोवेळी आढावा घेतला जात नसल्याने विहिरींची कामे प्रलंबित राहत असल्याचे समोर आले आहे. राज्यातील सध्याची दुष्काळसदृश परिस्थिती विचारात घेता अपूर्ण असलेल्या विहिरींची कामे तातडीने पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून राज्याच्या रोहयो विभागाने जिल्हास्तरीय यंत्रणेसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्या अनुषंगाने प्रगतीपथावर असलेल्या विहिरींची कामे लक्षात घेऊनच नवीन विहिरींना मंजूरी मिळणार आहे. एका ग्राम पंचायतीत एका वेळेस पाच विहिरींची कामे प्रगतीपथावर राहतील, याची दक्षता ग्रामपंचायती तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना घ्यावी लागणार आहे. एका ग्रामपंचायतीत तीन विहिरींचे कामे प्रगतीपथावर असल्यास नव्याने दोन विहिरींची कामे हाती घेण्यात येतील; परंतू पाच पेक्षा जास्त विहिरी अपूर्ण असतील तर संबंधित ग्रामपंचायतीत नवीन विहिरींना प्रशासकीय मान्यता देऊ नये, निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना देण्यात आले आहेत. या निर्देशांच्या अंमलबजावणीचा एक भाग म्हणून ग्रामपंचायतनिहाय अपूर्ण असलेल्या विहिरी आणि रोहयोंतर्गत ग्रामपंचायतनिहाय नव्याने मंजूर असलेल्या विहिरींचा आढावा घ्यावा लागणार आहे. संबंधित ग्रामपंचायतींमध्ये पाच पेक्षा अधिक विहिरींची कामे अपूर्ण असतील आणि नव्याने तेथे विहिर मंजूर असेल तर त्या विहिरींची प्रशासकीय मान्यता वांध्यात येणार आहे. 

शासन निर्णयानुसार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गतच्या अपूर्ण विहिरी आणि नव्याने मंजूरी द्यावयाच्या विहिरींची कार्यवाही वाशिम जिल्ह्यात केली जाईल.- दीपक कुमार मीनामुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद वाशिम

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषदFarmerशेतकरी