शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

माझा परिवार विकत घ्या, पण माझी शेती जगवा!; शेतकऱ्याची ठाकरे सरकारला आर्त हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 12:35 IST

सरकारकडून अपेक्षित मदत मिळत नसल्याने मालेगाव तालुक्यातील कोळगाव येथील विजय पंडीतराव शेंडगे या शेतकºयाने आपले कुटुंबच विक्रीला काढले.

लोकमत न्यूज नेटवर्क

मालेगाव (वाशिम) : दुष्काळी परिस्थिती आणि अवकाळी पाऊस यामुळे आर्थीक नुकसान ढासळले असतांना शेतकºयांच्या प्रश्नाकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे. गत तीन वर्षांपासून अस्मानी-सुल्तानी संकटामुळे  शेतीचे, पीकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असतांना सरकारकडून अपेक्षित मदत मिळत नसल्याने मालेगाव तालुक्यातील कोळगाव येथील विजय पंडीतराव शेंडगे या शेतकºयाने आपले कुटुंबच विक्रीला काढले. त्यांनी चक्क आपल्या शेतात ‘माय बाप सरकार माझा परिवार विकत घ्या, पण माझी शेती जगवा असे फलक लावून संपूर्ण कुटुंबच शेतात जावून बसले आहे.

युती सरकारच्या काळात कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही, पीक विमा कंपनीकडून नुकसानभरपाई मिळाली नाही. दुष्काळी परिस्थिती आणि त्यानंतर अवकाळी पावसामुळे हाताशी आलेले पीक गेले आहे. त्यामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून, अशा परिस्थितीत सरकारकडूनही दिलासा मिळत नसल्याने शेतकरी शेडगे हताश झाले आहेत. २३ डिसेंबरपासून त्यांनी आपल्याला न्याय दयावा याकरिता तहसील कार्यालयासमारे अन्नत्याग आंदोलन केले परंतु एकानेही याकडे ढुंकून पाहीले नसल्याने अखेर सदर निर्णय त्यांनी घेतला असल्याचे सांगितले. आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली असून, सरकारने शेतकरी विरोधी धोरणात बदल करावा, शेतकरी हिताचे निर्णय घ्यावे, नुकसानभरपाई द्यावी, सरसकट कर्जमाफी द्यावी, आर्थिक दिलासा द्यावा यासह अन्य मागण्यांसाठी शेतातच हे आगळे वेगळे आंदोलन सुरु केले आहे. निवेदनालाही केराची टोपलीगत तीन वर्षांपासून होत असलेले नुकसान पाहता व शेतकºयांसाठी कोणतेही हिताचे निर्णय न घेतल्याने २३ डिसेंबरपासून सुरु केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला साधी कोणी भेट न देणे तसेच तहसीलदार रवी काळे यांना निवेदन देऊन त्याची साधी दखल न घेता त्याला केराची टोपली दाखविल्याबद्दल शेतकरी शेंडगे कुटुंबाने प्रशासनाविरुध्दही रोष व्यक्त केला. शेतकरी कुटुंबाची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. दरवर्षी उदभवणाºया नुकसानामुळे शेती कशी करावी असा प्रश्न शेतकºयांसमोर उपस्थित होत आहे. त्यात सरकारनेही शेतकºयांना वाºयावर सोडल्याने आपले हे अनोखे आंदोलन आहे.- विजय शेंडगेशेतकरी, कोळगाव

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी