शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दुष्काळसदृष स्थितीचा महसूल वसूलीवर परिणाम; प्रशासकीय यंत्रणा हतबल  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 17:36 IST

वाशिम : यावर्षी उद्भवलेल्या दुष्काळसदृष स्थितीमुळे वसुलीवर परिणाम झाला असून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देवाशिम जिल्ह्यातील ७० टक्क्यांपेक्षा अधिक लोकांची उपजिविका शेती आणि तत्सम व्यवसायांवरच विसंबून आहे.महावितरणची विद्यूत देयके, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची थकीत पाणीपट्टी, नगर परिषद, नगर पंचायतींकडून आकारला जाणारा मालमत्ता कर अदा करणे अनेकांना अशक्य झाले आहे. ७९३ महसुली गावांपैकी ७७४ गावांची खरीप हंगामाची अंतीम पैसेवारी ४७ पैसे आहे.

वाशिम : दरवर्षी मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत किती महसूल वसूल व्हायला हवा, याचे उद्दीष्ट प्रशासकीय यंत्रणांमधील प्रमुख विभागांना ठरवून दिले जाते. त्यानुसार, यंदाही नगर परिषदा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, खनिकर्म विभाग, महावितरण, तहसील कार्यालये, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय यासह इतरही यंत्रणांनी मिळालेल्या उद्दीष्टाच्या पुर्ततेसाठी जीवाचा आटापिटा करणे सुरू केले आहे. मात्र, यावर्षी उद्भवलेल्या दुष्काळसदृष स्थितीमुळे वसुलीवर परिणाम झाला असून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.वाशिम जिल्ह्यातील ७० टक्क्यांपेक्षा अधिक लोकांची उपजिविका शेती आणि तत्सम व्यवसायांवरच विसंबून आहे. असे असताना गेल्या दोन ते तीन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे तथा विविध स्वरूपातील संकटांमुळे अपेक्षित उत्पादन न झाल्याने ग्रामीण भागातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडले आहेत. परिणामी, महावितरणची विद्यूत देयके, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची थकीत पाणीपट्टी, नगर परिषद, नगर पंचायतींकडून आकारला जाणारा मालमत्ता कर अदा करणे अनेकांना अशक्य झाले आहे. त्याचा थेट परिणाम प्रशासनाकडून अवलंबिण्यात आलेल्या करवसुली, महसूल वसुलीवर झाला असून १४ मार्चपर्यंत सर्वच यंत्रणांकडून वसुलीचे ५० टक्के उद्दीष्टही साध्य झालेले नाही, अशी माहिती त्या-त्या विभागाकडून प्राप्त झाली.७७४ गावांची अंतीम पैसेवारी ४७ पैसे!जिल्हा प्रशासनाकडून जानेवारी महिन्यात जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार ७९३ महसुली गावांपैकी ७७४ गावांची खरीप हंगामाची अंतीम पैसेवारी ४७ पैसे आहे. दरम्यान, जिल्ह्यातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, शेतमजूरांसह इतर घटक आर्थिकदृष्ट्या डबघाईस आल्याने मार्चअखेरपर्यंत अपेक्षित महसूल वसुलीचे प्रमाण घटणार असल्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.

टॅग्स :washimवाशिम