शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दुष्काळसदृश परिस्थिती; तरीही कृषीपंप जोडणी खंडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 17:35 IST

वाशिम : रिसोड तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती तसेच मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे, मानोरा तालुक्यातील उमरी महसूल दुष्काळी सवलती लागू केल्या असतानाही थकित वीज देयकावरून कृषीपंप जोडणी खंडीत करण्याचे प्रकार सुरू आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : रिसोड तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती तसेच मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे, मानोरा तालुक्यातील उमरी महसूल दुष्काळी सवलती लागू केल्या असतानाही थकित वीज देयकावरून कृषीपंप जोडणी खंडीत करण्याचे प्रकार सुरू आहेत.  दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने महावितरणने कृषीपंप जोडणी खंडीत करू नये अन्यथा तिव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती विश्वनाथ सानप यांनी दिला.यावर्षी अनेक तालुक्यांमध्ये तसेच महसूल मंडळात जून ते सप्टेंबर या दरम्यान पावसाने सरासरी गाठली नाही. कमी पर्जन्यमान झाल्याने उत्पादनात घट आली. शेतकºयांसह सर्वसामान्य जनतेला दिलासा म्हणून शासनाने जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात तसेच मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे तसेच मानोरा तालुक्यातील उमरी महसूल मंडळात दुष्काळसदृश परिस्थिती घोषित करून दुष्काळी सवलती लागू केल्या आहेत. जऊळका रेल्वे महसूल मंडळात १६ गावांचा समावेश आहे. उमरी महसूल मंडळात १५ पेक्षा अधिक गावांचा समावेश आहे. जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठण, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसूलीस स्थगिती, कृषीपंपाच्या चालू वीज बिलात ३३.५ टक्के सुट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावांत शेतकºयांच्या शेतीच्या पंपाची वीजजोडणी खंडीत न करणे आदी सवलतींचा समावेश आहे. प्रत्यक्षात दुष्काळी सवलतींची अंमलबजावणी सुरू झाली नसल्याने या सवलतींचा लाभ केव्हा मिळणार? असा प्रश्न पडला आहे. थकित वीज देयकावरून कृषीपंप जोडणी खंडीत केली जात आहे. यामुळे शेतकºयांचे नुकसान होत आहे. कृषीपंप जोडणी खंडीत करू नये अन्यथा शेतकºयांसह आंदोलन छेडण्याचा इशारा विश्वनाथ सानप यांनी दिला.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती