शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

नाट्यकलेतील मरगळ झटकल्या जावी - हंसीनी उचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 13:50 IST

कलावंतांना व्यासपिठ कसे मिळेल, यासह तत्सम विषयांवर मराठी चित्रपट अभिनेत्री, नाट्य कलावंत हंसीनी उचित यांच्याशी साधलेला हा संवाद...

वाशिम : विविध प्रकारचे सामाजिक विषय समाजासमोर मांडण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे नाटक होय. नाट्यकला ही जगातील अन्य सर्व कलांना आपल्या ह्रदयात स्थान देते. वाशिमलाही नाट्यकलेचा प्रदिर्घ असा इतिहास लाभलेला आहे; मात्र गत काही वर्षांमध्ये नाट्यकला आणि त्यात भविष्य घडवू पाहणाऱ्या कलावंतांना व्यासपिठ मिळेनासे झाले आहे. ही मरगळ झटकून नाट्यक्षेत्राला चांगले दिवस कसे येतील, कलावंतांना व्यासपिठ कसे मिळेल, यासह तत्सम विषयांवर मराठी चित्रपट अभिनेत्री, नाट्य कलावंत हंसीनी उचित यांच्याशी साधलेला हा संवाद...

मराठी चित्रपट, नाट्यक्षेत्रातील तुमच्या योगदानाविषयी काय सांगाल ?मला लहानपणापासूनच नाटकांमध्ये अभिनय करण्याची आवड होती. आधी वडिलांची आणि नंतर पतीची त्यासाठी साथ मिळाल्याने १३ मराठी चित्रपटांमध्ये अभिनेत्री म्हणून काम करता आले. याशिवाय दुरचित्रवाणीवरील ३ मालिका आणि ४ गाजलेल्या नाटकांमध्येही भुमिका करायला मिळाल्या.

तुमच्या नजरेतून पुर्वी आणि आता नाट्यक्षेत्रात वाशिमची स्थिती काय ?वाशिमला नाट्यकलेचे वरदान लाभलेले आहे. इ.स. ८८० ते ९२० या कालखंडात सुप्रसिद्ध कवी, नाटककार राजशेखर यांचा वारसा या शहराला लाभलेला आहे. याच मातीत सुरूची, साधना नाट्यसंस्था, राजशेखर नाट्यमंडळ, युवाशक्ती कला संच, कलाश्री कला संच यासारख्या नाट्यसंस्था रुजल्या. त्यातील कलावंतांनी नाट्यक्षेत्राला एका वेगळ्या उंचीवर पोहचविले; मात्र काळाच्या ओघात आणि प्रशासकीय उदासिनतेमुळे नाट्यक्षेत्रात मरगळ आली असून ती झटकली जाणे आवश्यक आहे.

नाट्यकलेला चांगले दिवस येण्यासाठी काय करता येईल?अभिनय क्षेत्रात भविष्य घडवू इच्छित युवक, युवतींसाठी प्रथम वाशिममध्ये दर्जेदार नाट्यसंस्था सुरू होणे आवश्यक आहे. त्यासाठी मी स्वत: अमरावती विद्यापिठाकडे प्रस्ताव सादर केलेला आहे.नाटकांमधील अभिनयाच्या प्रकारांविषयी काय सांगाल?नाटकांमध्ये प्रामुख्याने आंगिक, आहार्य, वाचिक आणि सात्विक हे चार प्रकार पडतात. अभिनय करताना हे चार प्रकार लिलया पेलता यायला हवे. याशिवाय पाचवा घटकही असून त्याचे नाव तात्विक आहे आणि तो कलाकृतीच्या आशयात मोडतो. कलाकृतीमधील तात्विकता जेवढी प्रगल्भ, तेवढी ती कलाकृती समृद्ध होते. ज्याप्रमाणे मजबूत पाया नसलेली इमारत केव्हाही कोसळू शकते, त्याचप्रमाणे तात्विकता नसलेली कलाकृतीही कोसळू शकते.

टॅग्स :washimवाशिमinterviewमुलाखत