शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वृक्ष लागवडीचे पैसे मिळालेच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 13:48 IST

०१४-१५ ते २०१६-१७ या कालावधीत करण्यात आलेल्या वृक्षारोपणाची मजूरी संबंधित मजुरांना तीन वर्षानंतरही मिळाली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत रिसोड तालुक्यातील चिखली-कवठा या मार्गालगत २०१४-१५ ते २०१६-१७ या कालावधीत करण्यात आलेल्या वृक्षारोपणाची मजूरी संबंधित मजुरांना तीन वर्षानंतरही मिळाली नाही. याप्रकरणी चौकशी करून स्वयंस्पष्ट अहवालासह चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वनअधिकारी उत्तम फड यांनी रिसोड वन परीक्षेत्र अधिकाऱ्यांना २० जानेवारी रोजी दिले.पर्यावरणाचे संतुलन कायम राखण्यासाठी गत काही वर्षांपासून वृक्षारोपण मोहिम राबविली जात आहे. सन २०१४-१५, २०१५-१६ आणि २०१६-१७ या कालावधीत रिसोड तालुक्यातील चिखली ते कवठा या मार्गालगत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले होते. रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण केल्यानंतर मजुरांना मजुरीचे पैसे मिळणे अपेक्षीत होते. परंतू, अद्यापही पैसे मिळाले नाहीत. यासंदर्भात युवरात सिताराम भगत यांनी तालुकास्तर तसेच जिल्हास्तरावरही अनेक वेळा तक्रारी केल्या. परंतू, त्याची दखल घेण्यात आली नाही. शेवटी भगत यांनी मुख्य वनसंरक्षक यवतमाळ यांच्याकडे तक्रार करताच, जलदगतीने चौकशीची चक्रे फिरली. याप्रकरणी सविस्तर चौकशी करण्याचे निर्देश मुख्य वनसंरक्षकांनी वाशिमच्या सामाजिक वनीकरण विभागाला दिले. त्यानुसार विभागीय वनअधिकारी फड यांनी याप्रकरणी रिसोड वन परीक्षेत्र अधिकाऱ्यांसह संबंधितांना चौकशी करण्याचे निर्देश २० जानेवारी रोजी दिले. २०१४-१५ ते २०१६-१७ या कालावधीतील वृक्षारोपणाची मजुरी संबंधितांना अद्याप मिळाली नाही, याप्रकरणी सविस्तर चौकशी करावी, अहवाल सादर करावा, असे निर्देश फड यांनी दिले आहेत. (प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिम