शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

वाशिम जिल्ह्यातील चाऱ्यावर  परराज्यातील पशूंचा डल्ला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 17:28 IST

मंगरुळपीर: यंदा अपुऱ्या  पावसामुळे पशूधनाच्या चाºयाची समस्या गंभीर रूप धारण करीत असतानाच परराज्यातील मेंढपाळ हजारो शेळ्या, मेंढ्यांसह जिल्ह्यात दाखल झाले असून, हे पशू आधीच कमी होत असलेल्या चाºयावर ताव मारत असल्याने जिल्ह्यातील पशूपालकांवर जनावरे चराईचे संकट उभे राहिले आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.जिल्ह्यात यंदा वार्षिक ...

ठळक मुद्देपरराज्यातील मेंढपाळ हजारो शेळ्या, मेंढ्यांसह जिल्ह्यात दाखल झाले.जिल्ह्यातील पशूपालकांवर जनावरे चराईचे संकट उभे राहिले आहे. ई-क्लास जमीन, गायराने आणि शेतशिवार परिसरात ही जनावरे चारण्यात येत आहेत.

मंगरुळपीर: यंदा अपुऱ्या  पावसामुळे पशूधनाच्या चाºयाची समस्या गंभीर रूप धारण करीत असतानाच परराज्यातील मेंढपाळ हजारो शेळ्या, मेंढ्यांसह जिल्ह्यात दाखल झाले असून, हे पशू आधीच कमी होत असलेल्या चाºयावर ताव मारत असल्याने जिल्ह्यातील पशूपालकांवर जनावरे चराईचे संकट उभे राहिले आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात यंदा वार्षिक सरासरीच्या तुलनेत खूप कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे शेती उत्पादनात घट आली असून, प्रकल्पांनीही तळ गाठला आहे. या पृष्ठभूमीवर जिल्हा प्रशासनाने प्रकल्पांतील पाणी आरक्षीत करून सिंचन उपसा बंद केला आहे. प्रकल्पातून शेतीसाठी उपसा करणाºया शेतकºयांच्या वीज जोडण्याही खंडीत करण्याची मोहिम जिल्हाभरात राबविण्यात येत आहे; परंतु जनावरांच्या चाºया, पाण्याची समस्या गंभीर होत असताना मात्र त्याकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष नाही. जिल्ह्यात अपुºया पावसामुळे कृषी उत्पादन घटले असल्याने जनावरांच्या चाºयाची समस्याही बिकट झाली आहे.त्यामुळे शेकडो पशूपालक जनावरांची विक्री करण्यावर भर देत असल्याचे पशू बाजारातील चित्रावरून स्पष्ट होत आहे. त्यातच परराज्यातील मेंढपाळ आपल्या हजारो शेळ्या, मेंढ्या घेऊन वाशिम जिल्ह्यात दाखल झाले आहेत. मालेगाव, रिसोड, मानोरा, कारंजा, मंगरुळपीर आणि वाशिम या सर्वच तालुक्यातील कुरणांमध्ये परराज्यातील शेळ्या, मेंढ्या चारण्यात येत आहेत. राजस्थान, आणि मध्यप्रदेशासारख्या राज्यातील पशूपालक दरवर्षीच जिल्ह्यात दाखल होतात. त्यामुळे जिल्ह्यातील पशूंच्या चराईचा प्रश्न गंभीर होत असतो. यंदाही परराज्यातील पशूपालक मोठ्या प्रमाणात जनावरे घेऊन जिल्ह्यात दाखल झाले आहेत.  ई-क्लास जमीन, गायराने आणि शेतशिवार परिसरात ही जनावरे चारण्यात येत आहेत. जिल्ह्यातील पशूंचा चारा ते खात आहेतच शिवाय गावशिवारातील तळे, प्रकल्पातील पाण्याचाही आधार ते घेत आहेत. या प्रकाराकडे महसूल किंवा इतर संबंधित प्रशासनाचे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष आहे. विशेष म्हणजे, हे मेंढपाळ नेमके कोण्या राज्यातून आले आहेत. त्यांची ओळख काय, याची काहीही माहिती प्रशासनाकडे असल्याचे दिसत नाही. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र