शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
4
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
5
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
6
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
7
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
8
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
9
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
10
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
11
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
12
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
13
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
14
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
15
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
16
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
17
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
18
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
19
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
20
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी

वाशिम जिल्ह्यातील चाऱ्यावर  परराज्यातील पशूंचा डल्ला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 17:28 IST

मंगरुळपीर: यंदा अपुऱ्या  पावसामुळे पशूधनाच्या चाºयाची समस्या गंभीर रूप धारण करीत असतानाच परराज्यातील मेंढपाळ हजारो शेळ्या, मेंढ्यांसह जिल्ह्यात दाखल झाले असून, हे पशू आधीच कमी होत असलेल्या चाºयावर ताव मारत असल्याने जिल्ह्यातील पशूपालकांवर जनावरे चराईचे संकट उभे राहिले आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.जिल्ह्यात यंदा वार्षिक ...

ठळक मुद्देपरराज्यातील मेंढपाळ हजारो शेळ्या, मेंढ्यांसह जिल्ह्यात दाखल झाले.जिल्ह्यातील पशूपालकांवर जनावरे चराईचे संकट उभे राहिले आहे. ई-क्लास जमीन, गायराने आणि शेतशिवार परिसरात ही जनावरे चारण्यात येत आहेत.

मंगरुळपीर: यंदा अपुऱ्या  पावसामुळे पशूधनाच्या चाºयाची समस्या गंभीर रूप धारण करीत असतानाच परराज्यातील मेंढपाळ हजारो शेळ्या, मेंढ्यांसह जिल्ह्यात दाखल झाले असून, हे पशू आधीच कमी होत असलेल्या चाºयावर ताव मारत असल्याने जिल्ह्यातील पशूपालकांवर जनावरे चराईचे संकट उभे राहिले आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात यंदा वार्षिक सरासरीच्या तुलनेत खूप कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे शेती उत्पादनात घट आली असून, प्रकल्पांनीही तळ गाठला आहे. या पृष्ठभूमीवर जिल्हा प्रशासनाने प्रकल्पांतील पाणी आरक्षीत करून सिंचन उपसा बंद केला आहे. प्रकल्पातून शेतीसाठी उपसा करणाºया शेतकºयांच्या वीज जोडण्याही खंडीत करण्याची मोहिम जिल्हाभरात राबविण्यात येत आहे; परंतु जनावरांच्या चाºया, पाण्याची समस्या गंभीर होत असताना मात्र त्याकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष नाही. जिल्ह्यात अपुºया पावसामुळे कृषी उत्पादन घटले असल्याने जनावरांच्या चाºयाची समस्याही बिकट झाली आहे.त्यामुळे शेकडो पशूपालक जनावरांची विक्री करण्यावर भर देत असल्याचे पशू बाजारातील चित्रावरून स्पष्ट होत आहे. त्यातच परराज्यातील मेंढपाळ आपल्या हजारो शेळ्या, मेंढ्या घेऊन वाशिम जिल्ह्यात दाखल झाले आहेत. मालेगाव, रिसोड, मानोरा, कारंजा, मंगरुळपीर आणि वाशिम या सर्वच तालुक्यातील कुरणांमध्ये परराज्यातील शेळ्या, मेंढ्या चारण्यात येत आहेत. राजस्थान, आणि मध्यप्रदेशासारख्या राज्यातील पशूपालक दरवर्षीच जिल्ह्यात दाखल होतात. त्यामुळे जिल्ह्यातील पशूंच्या चराईचा प्रश्न गंभीर होत असतो. यंदाही परराज्यातील पशूपालक मोठ्या प्रमाणात जनावरे घेऊन जिल्ह्यात दाखल झाले आहेत.  ई-क्लास जमीन, गायराने आणि शेतशिवार परिसरात ही जनावरे चारण्यात येत आहेत. जिल्ह्यातील पशूंचा चारा ते खात आहेतच शिवाय गावशिवारातील तळे, प्रकल्पातील पाण्याचाही आधार ते घेत आहेत. या प्रकाराकडे महसूल किंवा इतर संबंधित प्रशासनाचे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष आहे. विशेष म्हणजे, हे मेंढपाळ नेमके कोण्या राज्यातून आले आहेत. त्यांची ओळख काय, याची काहीही माहिती प्रशासनाकडे असल्याचे दिसत नाही. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र