शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद निवडणूक; रणधुमाळीने तापले राजकीय वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 12:26 IST

कडाक्याच्या थंडीत ग्रामीण भागात राजकीय वातावरण तापले असून, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी ७ जानेवारी रोजी मतदान होत आहे. ५२ जिल्हा परिषद गट व १०४ पंचायत समिती गण असे मिळून एकूण ७२४ उमेदवार निवडणुक रिंगणात असून, रणधुमाळीस प्रारंभ झाला आहे. कडाक्याच्या थंडीत ग्रामीण भागात राजकीय वातावरण तापले असून, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.जिल्हा परिषदेचे ५२ गट व पंचायत समितीचे १०४ गण आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर सर्वच गट व गणातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. ५२ गटासाठी २६३ उमेदवार रिंगणात असून, रणधुमाळीला प्रारंभ झाला. कारंजा तालुक्यात ८ जिल्हा परिषद गटासाठी ४९ उमेदवार, वाशिम तालुक्यात १० गटासाठी ५० उमेदवार, मालेगाव तालुक्यात ९ गटासाठी ५३ उमेदवार, रिसोड तालुक्यात ९ गटासाठी ३७ उमेदवार, मंगरूळपीर तालुक्यात ८ गटासाठी ३५ उमेदवार आणि मानोरा तालुक्यात ८ गटासाठी ३९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. जिल्ह्यातील १०४ पंचायत समिती गणासाठी एकूण ४६१ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये कारंजा तालुक्यातील १६ पंचायत समिती गणासाठी ७२ उमेदवार, मंगरूळपीर तालुक्यात १६ गणासाठी ७० उमेदवार, वाशिम तालुक्यात २० गणासाठी ७७ उमेदवार, मालेगाव तालुक्यात १८ गणासाठी ८८ उमेदवार, रिसोड तालुक्यात १८ गणासाठी ७२ उमेदवार, मानोरा तालुक्यात १६ गणासाठी ८२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पार्टी, भारिप-बमसं, वाशिम जिल्हा जनविकास आघाडीचे उमेदवार रिंगणात असून, सर्वांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेवरची सत्ता कायम राखण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली असून, काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरून स्टार प्रचारकांची यादीही प्रसिद्ध झाली आहे. स्टार प्रचारकांची सभा लावण्यासाठी काँग्रेसच्या उमेदवारांनी वरिष्ठांकडे ‘फिल्डिंग’ लावल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनेही सदस्य संख्या वाढविण्यासाठी मंत्र्यांच्या सभांचे नियोजन केल्याची माहिती आहे. शिवसेना व भाजपाच्यावतीनेही सभांचे नियोजन असून, अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी अंतर्गत गटबाजी शमविण्यावर भर दिला जात आहे. वंचित बहुजन आघाडीतर्फे भारिप-बमसं या बॅनरखाली निवडणूक लढविली जात असून, दोन अंकी आकडा गाठण्यासाठी वरिष्ठ पदाधिकारी जिल्ह्यात तळ ठोकून आहेत. माजी खासदार अनंतराव देशमुख यांची वाशिम जिल्हा जनविकास आघाडीदेखील रिसोड, मालेगाव व मानोरा तालुक्यात नशीब आजमावत असून, दोन अंकी आकडा गाठण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लागली आहे. रणधुमाळीला प्रारंभ झाल्याने कडाक्याच्या थंडीत ग्रामीण भागातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असल्याचे दिसून येते.(प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद