शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

जिल्हा परिषद निवडणूक; रणधुमाळीने तापले राजकीय वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 12:26 IST

कडाक्याच्या थंडीत ग्रामीण भागात राजकीय वातावरण तापले असून, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी ७ जानेवारी रोजी मतदान होत आहे. ५२ जिल्हा परिषद गट व १०४ पंचायत समिती गण असे मिळून एकूण ७२४ उमेदवार निवडणुक रिंगणात असून, रणधुमाळीस प्रारंभ झाला आहे. कडाक्याच्या थंडीत ग्रामीण भागात राजकीय वातावरण तापले असून, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.जिल्हा परिषदेचे ५२ गट व पंचायत समितीचे १०४ गण आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर सर्वच गट व गणातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. ५२ गटासाठी २६३ उमेदवार रिंगणात असून, रणधुमाळीला प्रारंभ झाला. कारंजा तालुक्यात ८ जिल्हा परिषद गटासाठी ४९ उमेदवार, वाशिम तालुक्यात १० गटासाठी ५० उमेदवार, मालेगाव तालुक्यात ९ गटासाठी ५३ उमेदवार, रिसोड तालुक्यात ९ गटासाठी ३७ उमेदवार, मंगरूळपीर तालुक्यात ८ गटासाठी ३५ उमेदवार आणि मानोरा तालुक्यात ८ गटासाठी ३९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. जिल्ह्यातील १०४ पंचायत समिती गणासाठी एकूण ४६१ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये कारंजा तालुक्यातील १६ पंचायत समिती गणासाठी ७२ उमेदवार, मंगरूळपीर तालुक्यात १६ गणासाठी ७० उमेदवार, वाशिम तालुक्यात २० गणासाठी ७७ उमेदवार, मालेगाव तालुक्यात १८ गणासाठी ८८ उमेदवार, रिसोड तालुक्यात १८ गणासाठी ७२ उमेदवार, मानोरा तालुक्यात १६ गणासाठी ८२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पार्टी, भारिप-बमसं, वाशिम जिल्हा जनविकास आघाडीचे उमेदवार रिंगणात असून, सर्वांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेवरची सत्ता कायम राखण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली असून, काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरून स्टार प्रचारकांची यादीही प्रसिद्ध झाली आहे. स्टार प्रचारकांची सभा लावण्यासाठी काँग्रेसच्या उमेदवारांनी वरिष्ठांकडे ‘फिल्डिंग’ लावल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनेही सदस्य संख्या वाढविण्यासाठी मंत्र्यांच्या सभांचे नियोजन केल्याची माहिती आहे. शिवसेना व भाजपाच्यावतीनेही सभांचे नियोजन असून, अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी अंतर्गत गटबाजी शमविण्यावर भर दिला जात आहे. वंचित बहुजन आघाडीतर्फे भारिप-बमसं या बॅनरखाली निवडणूक लढविली जात असून, दोन अंकी आकडा गाठण्यासाठी वरिष्ठ पदाधिकारी जिल्ह्यात तळ ठोकून आहेत. माजी खासदार अनंतराव देशमुख यांची वाशिम जिल्हा जनविकास आघाडीदेखील रिसोड, मालेगाव व मानोरा तालुक्यात नशीब आजमावत असून, दोन अंकी आकडा गाठण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लागली आहे. रणधुमाळीला प्रारंभ झाल्याने कडाक्याच्या थंडीत ग्रामीण भागातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असल्याचे दिसून येते.(प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद