शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

निवड रद्द झालेल्या ग्रामपंचायत सदस्यांची विभागीय आयुक्तांकडे  धाव !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 15:50 IST

जिल्हयातील २५१ ग्रामपंचायतींच्या एकूण ६५६ सदस्यांची निवड ही भूतलक्षी प्रभावाने रद्द झाल्याचे आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी १ जानेवारीला काढले आहेत. या आदेशाविरोधात अनेक सदस्यांनी विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राखीव प्रवर्गातून निवडून आल्यानंतर विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाºया जिल्हयातील २५१ ग्रामपंचायतींच्या एकूण ६५६ सदस्यांची निवड ही भूतलक्षी प्रभावाने रद्द झाल्याचे आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी १ जानेवारीला काढले आहेत. या आदेशाविरोधात अनेक सदस्यांनी विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली असून, अनेकांना अंतिम निर्णयापर्यंत स्थगिती मिळाली असून, सदर प्रकरण सुनावणीकरीता वेगवेगळ्या तारखा देण्यात आल्या.जिल्ह्यात नोव्हेंबर २०१७ ते डिसेंबर २०१७ या कालावधीत मुदत संपणाºया एकूण २८७ पैकी २७३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ७ आॅक्टोबर २०१७ तर १४ ग्रामपंचायतींसाठी २७ आॅक्टोबर २०१७ रोजी मतदान झाले होते. राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या जिल्ह्यातील २५१ ग्रामपंचायतींच्या ६५६ सदस्यांनी तहसिलदारांकडे  विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही.  विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या ६५६ सदस्यांची पदे भूतलक्षी प्रभावाने रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिश्रा यांनी दिले आहेत. जिल्हाधिकाºयांच्या आदेशाला स्थगिती मिळावी याकरीता अनेक सदस्यांनी विभागीय आयुक्तांकडे दाद मागितली आहे. काही जणांना स्थगिती मिळाली असून, सदर प्रकरणावर २२ जानेवारीला सुनावणी होणार आहे.मालेगाव तालुक्यातील पांगरखेड येथील फालंगा माणिक पवार यांनी जिल्हाधिकाºयांच्या आदेशाला स्थगिती मिळावी याकरीता विभागीय आयुक्तांकडे अर्ज केला होता. या अर्जाच्या अनुषंगाने महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम, १९५९ मधील कलम १६ (२) अन्वये अंतिम निर्णयापर्यंत स्थगिती देण्यात येत असल्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी ८ जानेवारी रोजी दिले असून, सदर प्रकरणावर २२ जानेवारी २०१९ रोजी सुनावणी होणार आहे. डव्हा येथील रविराज अशोक गायकवाड यांनीदेखील स्थगिती मिळावी याकरीता विभागीय आयुक्तांकडे अर्ज सादर केला होता. यावर स्थगिती मिळाली असून, सदर प्रकरणावरदेखील २२ जानेवारी २०१९ रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे.

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायत