शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
7
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
8
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
9
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
10
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
11
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
12
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
13
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
14
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
16
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
17
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
18
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
19
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
20
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी

अडते, व्यापा-यांत वाद; व्यवहार ठप्प!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 01:51 IST

वाशिम : पश्चिम विदर्भासह मराठवाड्यात विशिष्ट सोयी-सुविधांमुळे नामांकित ठरलेली वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती सध्या अडते व व्यापाºयांच्या वादामुळे चर्चेत आली आहे. याच वादामुळे गत दोन दिवसांपासून बाजार समिती बंद असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

ठळक मुद्देशेतकरी हवालदिलदोन दिवसांपासून वशिम बाजार समिती बंदसमिती बंद असल्याने शेतकरी हवालदिल

शिखरचंद बागरेचा ।लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पश्चिम विदर्भासह मराठवाड्यात विशिष्ट सोयी-सुविधांमुळे नामांकित ठरलेली वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती सध्या अडते व व्यापाºयांच्या वादामुळे चर्चेत आली आहे. याच वादामुळे गत दोन दिवसांपासून बाजार समिती बंद असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वाशिम तालुक्यातील कास्तकारांसह हिंगोली व पुसद जिल्ह्यातील कास्तकारसुद्धा येथे सोयाबीन, हरभरा, ज्वारी, तूर, भुईमूग, हळद, मूग, उडीद, गहू, इत्यादी प्रमुख शेतमाल विक्रीसाठी आणतात. शेतकºयांच्या हितासाठी शासनाने शेतकºयांकडून ‘अडत वसुली’ची पद्धत बंद करून व्यापाºयांनी अडत्यांना अडत द्यावी, असा निर्णय घेतला. शासनाच्या निर्णयानुसार वाशिम बाजार समितीत व्यापाºयांनी अडत्यांना १.४० रुपये दराने अडत द्यायला सुरुवात केली. सदरची अडत ही इतर जिल्ह्यांपेक्षा जास्त असताना वाशिम बाजार समितीत काही अडते १.४० रुपयांऐवजी २ रुपये शेकडा अडतची मागणी लावून धरली. यावरून अडते व व्यापाºयांमध्ये वादाची ठिणगी पडली. या दोघांच्या वादात शेतकरी मात्र भरडून निघत आहे. शासन शेतकºयांच्या हितासाठी विविध योजना राबवित आहे, तर दुसरीकडे अडते व व्यापारी मात्र शेतकºयांना वेठीस धरत असल्याचा प्रकार वाशिम बाजार समितीत पाहावयास मिळत आहे.शेतकºयांनी आपला शेतमाल विक्रीसाठी बाजार समितीत आणल्यानंतर अडते वेगवेगळ्या मार्गाने शेतकºयांकडून आपला खर्च वसूल करण्याचे प्रकारही घडतात. शेतकºयांना वेठीस धरणे कितपत योग्य आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकºयांमधून उमटत आहेत.शेतकºयांचा शेतमाल बाजार समितीत विक्रीसाठी आणल्यानंतर थेट व्यापाºयांनी खरेदी करणे शेतकºयांना अपेक्षित आहे. याकडे बाजार समिती प्रशासनाने विशेष लक्ष देऊन शेतकरी हितासाठी अडते व व्यापारी यांच्यामधील वाद संपुष्टात आणावा, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे.अडते व्यापाºयांकडून जादा अडतची मागणी करीत आहेत. व्यापारी जादा अडत देण्यास तयार नाही. यामध्ये साहजिकच शेतकरी बांधव हा या दोघांच्या वादात अडकला आहे. हा प्रश्न सुटावा व बाजार समिती सुरळीत सुरू व्हावी, यासाठी मंगळवारी बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत सर्वमान्य तोडगा काढून बाजार समितीचा कारभार सुरळीत करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.- नारायणराव गोटे, सभापती,कृषी उत्पन्न बाजार समिती, वाशिम.अडते व व्यापारी यांनी शेतकºयांना कोंडीत धरले असून, दोन दिवसांपासून बाजार समिती बंद आहे. शेतकºयांवर होणारा अन्याय दूर करण्यात यावा, यासाठी आपण जिल्हा उपनिबंधकाकडे तक्रारसुद्धा दिली आहे. कमिशनवर अडत न वाढविता कमी कमिशनमध्ये जे अडते शेतकºयांचा शेतमाल घेण्यास तयार असतील, तर बाजार समितीने बाजार समिती उघडून शेतकºयांचा शेतमाल विक्रीस बोलवावा.- बंडू महाले, तज्ज्ञ संचालककृ.उ.बा.स. वाशिमजादा कमिशनची मागणी करून अडत्यांनी बाजार समिती बंद पाडली आहे. हा शेतकºयांवर घोर अन्याय आहे. यासंदर्भात अडते व व्यापारी यांनी समन्वयातून तोडगा काढावा व शेतकºयांना न्याय देणे अपेक्षित आहे. केवळ कमिशनवाढीसाठी शेतकºयांना वेठीस धरणे योग्य नाही.- राजू चौधरी, शेतकरी, पार्डी टकमोर, ता.जि. वाशिम