शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

अडते, व्यापा-यांत वाद; व्यवहार ठप्प!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 01:51 IST

वाशिम : पश्चिम विदर्भासह मराठवाड्यात विशिष्ट सोयी-सुविधांमुळे नामांकित ठरलेली वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती सध्या अडते व व्यापाºयांच्या वादामुळे चर्चेत आली आहे. याच वादामुळे गत दोन दिवसांपासून बाजार समिती बंद असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

ठळक मुद्देशेतकरी हवालदिलदोन दिवसांपासून वशिम बाजार समिती बंदसमिती बंद असल्याने शेतकरी हवालदिल

शिखरचंद बागरेचा ।लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पश्चिम विदर्भासह मराठवाड्यात विशिष्ट सोयी-सुविधांमुळे नामांकित ठरलेली वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती सध्या अडते व व्यापाºयांच्या वादामुळे चर्चेत आली आहे. याच वादामुळे गत दोन दिवसांपासून बाजार समिती बंद असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वाशिम तालुक्यातील कास्तकारांसह हिंगोली व पुसद जिल्ह्यातील कास्तकारसुद्धा येथे सोयाबीन, हरभरा, ज्वारी, तूर, भुईमूग, हळद, मूग, उडीद, गहू, इत्यादी प्रमुख शेतमाल विक्रीसाठी आणतात. शेतकºयांच्या हितासाठी शासनाने शेतकºयांकडून ‘अडत वसुली’ची पद्धत बंद करून व्यापाºयांनी अडत्यांना अडत द्यावी, असा निर्णय घेतला. शासनाच्या निर्णयानुसार वाशिम बाजार समितीत व्यापाºयांनी अडत्यांना १.४० रुपये दराने अडत द्यायला सुरुवात केली. सदरची अडत ही इतर जिल्ह्यांपेक्षा जास्त असताना वाशिम बाजार समितीत काही अडते १.४० रुपयांऐवजी २ रुपये शेकडा अडतची मागणी लावून धरली. यावरून अडते व व्यापाºयांमध्ये वादाची ठिणगी पडली. या दोघांच्या वादात शेतकरी मात्र भरडून निघत आहे. शासन शेतकºयांच्या हितासाठी विविध योजना राबवित आहे, तर दुसरीकडे अडते व व्यापारी मात्र शेतकºयांना वेठीस धरत असल्याचा प्रकार वाशिम बाजार समितीत पाहावयास मिळत आहे.शेतकºयांनी आपला शेतमाल विक्रीसाठी बाजार समितीत आणल्यानंतर अडते वेगवेगळ्या मार्गाने शेतकºयांकडून आपला खर्च वसूल करण्याचे प्रकारही घडतात. शेतकºयांना वेठीस धरणे कितपत योग्य आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकºयांमधून उमटत आहेत.शेतकºयांचा शेतमाल बाजार समितीत विक्रीसाठी आणल्यानंतर थेट व्यापाºयांनी खरेदी करणे शेतकºयांना अपेक्षित आहे. याकडे बाजार समिती प्रशासनाने विशेष लक्ष देऊन शेतकरी हितासाठी अडते व व्यापारी यांच्यामधील वाद संपुष्टात आणावा, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे.अडते व्यापाºयांकडून जादा अडतची मागणी करीत आहेत. व्यापारी जादा अडत देण्यास तयार नाही. यामध्ये साहजिकच शेतकरी बांधव हा या दोघांच्या वादात अडकला आहे. हा प्रश्न सुटावा व बाजार समिती सुरळीत सुरू व्हावी, यासाठी मंगळवारी बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत सर्वमान्य तोडगा काढून बाजार समितीचा कारभार सुरळीत करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.- नारायणराव गोटे, सभापती,कृषी उत्पन्न बाजार समिती, वाशिम.अडते व व्यापारी यांनी शेतकºयांना कोंडीत धरले असून, दोन दिवसांपासून बाजार समिती बंद आहे. शेतकºयांवर होणारा अन्याय दूर करण्यात यावा, यासाठी आपण जिल्हा उपनिबंधकाकडे तक्रारसुद्धा दिली आहे. कमिशनवर अडत न वाढविता कमी कमिशनमध्ये जे अडते शेतकºयांचा शेतमाल घेण्यास तयार असतील, तर बाजार समितीने बाजार समिती उघडून शेतकºयांचा शेतमाल विक्रीस बोलवावा.- बंडू महाले, तज्ज्ञ संचालककृ.उ.बा.स. वाशिमजादा कमिशनची मागणी करून अडत्यांनी बाजार समिती बंद पाडली आहे. हा शेतकºयांवर घोर अन्याय आहे. यासंदर्भात अडते व व्यापारी यांनी समन्वयातून तोडगा काढावा व शेतकºयांना न्याय देणे अपेक्षित आहे. केवळ कमिशनवाढीसाठी शेतकºयांना वेठीस धरणे योग्य नाही.- राजू चौधरी, शेतकरी, पार्डी टकमोर, ता.जि. वाशिम