शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

अडते, व्यापा-यांत वाद; व्यवहार ठप्प!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 01:51 IST

वाशिम : पश्चिम विदर्भासह मराठवाड्यात विशिष्ट सोयी-सुविधांमुळे नामांकित ठरलेली वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती सध्या अडते व व्यापाºयांच्या वादामुळे चर्चेत आली आहे. याच वादामुळे गत दोन दिवसांपासून बाजार समिती बंद असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

ठळक मुद्देशेतकरी हवालदिलदोन दिवसांपासून वशिम बाजार समिती बंदसमिती बंद असल्याने शेतकरी हवालदिल

शिखरचंद बागरेचा ।लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पश्चिम विदर्भासह मराठवाड्यात विशिष्ट सोयी-सुविधांमुळे नामांकित ठरलेली वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती सध्या अडते व व्यापाºयांच्या वादामुळे चर्चेत आली आहे. याच वादामुळे गत दोन दिवसांपासून बाजार समिती बंद असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वाशिम तालुक्यातील कास्तकारांसह हिंगोली व पुसद जिल्ह्यातील कास्तकारसुद्धा येथे सोयाबीन, हरभरा, ज्वारी, तूर, भुईमूग, हळद, मूग, उडीद, गहू, इत्यादी प्रमुख शेतमाल विक्रीसाठी आणतात. शेतकºयांच्या हितासाठी शासनाने शेतकºयांकडून ‘अडत वसुली’ची पद्धत बंद करून व्यापाºयांनी अडत्यांना अडत द्यावी, असा निर्णय घेतला. शासनाच्या निर्णयानुसार वाशिम बाजार समितीत व्यापाºयांनी अडत्यांना १.४० रुपये दराने अडत द्यायला सुरुवात केली. सदरची अडत ही इतर जिल्ह्यांपेक्षा जास्त असताना वाशिम बाजार समितीत काही अडते १.४० रुपयांऐवजी २ रुपये शेकडा अडतची मागणी लावून धरली. यावरून अडते व व्यापाºयांमध्ये वादाची ठिणगी पडली. या दोघांच्या वादात शेतकरी मात्र भरडून निघत आहे. शासन शेतकºयांच्या हितासाठी विविध योजना राबवित आहे, तर दुसरीकडे अडते व व्यापारी मात्र शेतकºयांना वेठीस धरत असल्याचा प्रकार वाशिम बाजार समितीत पाहावयास मिळत आहे.शेतकºयांनी आपला शेतमाल विक्रीसाठी बाजार समितीत आणल्यानंतर अडते वेगवेगळ्या मार्गाने शेतकºयांकडून आपला खर्च वसूल करण्याचे प्रकारही घडतात. शेतकºयांना वेठीस धरणे कितपत योग्य आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकºयांमधून उमटत आहेत.शेतकºयांचा शेतमाल बाजार समितीत विक्रीसाठी आणल्यानंतर थेट व्यापाºयांनी खरेदी करणे शेतकºयांना अपेक्षित आहे. याकडे बाजार समिती प्रशासनाने विशेष लक्ष देऊन शेतकरी हितासाठी अडते व व्यापारी यांच्यामधील वाद संपुष्टात आणावा, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे.अडते व्यापाºयांकडून जादा अडतची मागणी करीत आहेत. व्यापारी जादा अडत देण्यास तयार नाही. यामध्ये साहजिकच शेतकरी बांधव हा या दोघांच्या वादात अडकला आहे. हा प्रश्न सुटावा व बाजार समिती सुरळीत सुरू व्हावी, यासाठी मंगळवारी बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत सर्वमान्य तोडगा काढून बाजार समितीचा कारभार सुरळीत करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.- नारायणराव गोटे, सभापती,कृषी उत्पन्न बाजार समिती, वाशिम.अडते व व्यापारी यांनी शेतकºयांना कोंडीत धरले असून, दोन दिवसांपासून बाजार समिती बंद आहे. शेतकºयांवर होणारा अन्याय दूर करण्यात यावा, यासाठी आपण जिल्हा उपनिबंधकाकडे तक्रारसुद्धा दिली आहे. कमिशनवर अडत न वाढविता कमी कमिशनमध्ये जे अडते शेतकºयांचा शेतमाल घेण्यास तयार असतील, तर बाजार समितीने बाजार समिती उघडून शेतकºयांचा शेतमाल विक्रीस बोलवावा.- बंडू महाले, तज्ज्ञ संचालककृ.उ.बा.स. वाशिमजादा कमिशनची मागणी करून अडत्यांनी बाजार समिती बंद पाडली आहे. हा शेतकºयांवर घोर अन्याय आहे. यासंदर्भात अडते व व्यापारी यांनी समन्वयातून तोडगा काढावा व शेतकºयांना न्याय देणे अपेक्षित आहे. केवळ कमिशनवाढीसाठी शेतकºयांना वेठीस धरणे योग्य नाही.- राजू चौधरी, शेतकरी, पार्डी टकमोर, ता.जि. वाशिम