शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

ईडीच्या चाैकशी अहवालाबाबत जिल्ह्यात रंगताहेत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:49 IST

वाशिम : जिल्ह्यात अनेक घाेटाळे, भ्रष्टाचार झालेत; परंतु आजपर्यंत कधी वरिष्ठ स्तरावर चाैकशी झाली नाही. गत महिन्यापासून दाेन वेळ ...

वाशिम : जिल्ह्यात अनेक घाेटाळे, भ्रष्टाचार झालेत; परंतु आजपर्यंत कधी वरिष्ठ स्तरावर चाैकशी झाली नाही. गत महिन्यापासून दाेन वेळ ईडीचे अधिकारी जिल्ह्यात येऊन गेल्याने त्यांनी केलेल्या चाैकशीत काय आढळते, याबाबत जिल्ह्यात सर्वत्र चर्चा रंगताहेत. या चर्चांना विराेधी पक्ष चांगलेच खतपाणी घालताना दिसून येत आहेत.

वाशिम जिल्ह्यातील कर्तव्यतत्पर, विकास कार्य खेचून आणणाऱ्या दाेन लाेकप्रतिनिधींनी माेठ्या प्रमाणात घाेटाळा केल्याचा आराेप - प्रत्याराेप केला जात आहे. यामध्ये खासदार भावना गवळी यांनी आपल्या संस्थांमध्ये १०० काेटी रुपयांचा, तर आमदार पाटणी यांच्या कुटुंबीयांनी जमीन खरेदी - विक्री व्यवहारात ५०० काेटी रुपयांचा घाेटाळा केल्याचे म्हटले जात आहे. खा. भावना गवळी यांनी १०० काेटींचा घाेटाळा केल्याची तक्रार भाजपचे नेते किरीट साेमय्या यांनी संबंधितांकडे केली. त्यानुसार त्यांची ईडीकडून चाैकशी केली जात आहे. या चाैकशीबाबत शिवसैनिकांकडून निषेध नाेंदवून शिवसेना नेत्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न सर्वत्र हाेत असल्याचे म्हटले आहे. शिवसेना नेत्यांचीच चाैकशी का? भाजपच्या लाेकप्रतिनिधींवरही घाेटाळ्यांचे आराेप हाेत आहेत. त्यांची चाैकशी का केली जात नाही, असा प्रश्न शिवसैनिकांकडून केला जात आहे. जिल्ह्यात ईडीचे अधिकारी आल्याने सर्वत्र खळबळ उडाल्याने सर्वत्र याच घटनेबाबत चर्चा हाेत असून, पुढे काय हाेणार, याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत. यामध्ये दाेषींवर कारवाई निश्चित हाेईल, असा आत्मविश्वास भाजप कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे, तर शिवसैनिक ‘कर नही ताे डर काय का’ म्हणत आहेत. ईडीचा चाैकशी अहवाल जाे येईल ताे येईल; परंतु जिल्ह्यामध्ये सणासुदीच्या काळातही जागाेजागी याचीच चर्चा हाेताना दिसून येत आहे, एवढे मात्र नक्की.

....

किरीट साेमय्या यांना सुरक्षा

ठाकरे सरकारमधील अनेक मंत्र्यांवर आराेप करुन त्यांचा घाेटाळा उघडकीस आणण्याचे काम भाजप नेते किरीट साेमय्या करीत असल्याने त्यांना धमक्या येत असून, सुरक्षेची मागणी केली हाेती. त्यांच्या मागणीला केंद्र सरकारने त्यांना झेड दर्जाची सुरक्षा दिली आहे. देगाव येथे त्यांच्या वाहनावर शाई व दगडफेक झाली हाेती. केंद्र सरकारने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे ४० जवान त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात केले आहेत. यामुळे अनेक प्रकरणे अधिक उजेडात येणार असल्याची चर्चा हाेत आहे.