शहरं
Join us  
Trending Stories
1
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
2
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
3
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
4
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
5
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
6
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
7
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
8
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
9
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
10
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
11
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
12
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
13
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
14
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
15
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
16
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
17
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
18
Viral Video : प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्टरला घंटा समजू लागले लोक; एकाने हात लावल्यावर पुढे काय झाले बघाच!
19
फोडाफोडीचं कारण, पक्षामध्ये खदखद! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत, अमित शाहांची घेणार भेट
20
स्पेशल 26! बंगळुरूमध्ये भरदिवसा लूट; छाप्याच्या नावाखाली तब्बल ७.११ कोटींवर मारला डल्ला
Daily Top 2Weekly Top 5

ईडीच्या चाैकशी अहवालाबाबत जिल्ह्यात रंगताहेत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:49 IST

वाशिम : जिल्ह्यात अनेक घाेटाळे, भ्रष्टाचार झालेत; परंतु आजपर्यंत कधी वरिष्ठ स्तरावर चाैकशी झाली नाही. गत महिन्यापासून दाेन वेळ ...

वाशिम : जिल्ह्यात अनेक घाेटाळे, भ्रष्टाचार झालेत; परंतु आजपर्यंत कधी वरिष्ठ स्तरावर चाैकशी झाली नाही. गत महिन्यापासून दाेन वेळ ईडीचे अधिकारी जिल्ह्यात येऊन गेल्याने त्यांनी केलेल्या चाैकशीत काय आढळते, याबाबत जिल्ह्यात सर्वत्र चर्चा रंगताहेत. या चर्चांना विराेधी पक्ष चांगलेच खतपाणी घालताना दिसून येत आहेत.

वाशिम जिल्ह्यातील कर्तव्यतत्पर, विकास कार्य खेचून आणणाऱ्या दाेन लाेकप्रतिनिधींनी माेठ्या प्रमाणात घाेटाळा केल्याचा आराेप - प्रत्याराेप केला जात आहे. यामध्ये खासदार भावना गवळी यांनी आपल्या संस्थांमध्ये १०० काेटी रुपयांचा, तर आमदार पाटणी यांच्या कुटुंबीयांनी जमीन खरेदी - विक्री व्यवहारात ५०० काेटी रुपयांचा घाेटाळा केल्याचे म्हटले जात आहे. खा. भावना गवळी यांनी १०० काेटींचा घाेटाळा केल्याची तक्रार भाजपचे नेते किरीट साेमय्या यांनी संबंधितांकडे केली. त्यानुसार त्यांची ईडीकडून चाैकशी केली जात आहे. या चाैकशीबाबत शिवसैनिकांकडून निषेध नाेंदवून शिवसेना नेत्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न सर्वत्र हाेत असल्याचे म्हटले आहे. शिवसेना नेत्यांचीच चाैकशी का? भाजपच्या लाेकप्रतिनिधींवरही घाेटाळ्यांचे आराेप हाेत आहेत. त्यांची चाैकशी का केली जात नाही, असा प्रश्न शिवसैनिकांकडून केला जात आहे. जिल्ह्यात ईडीचे अधिकारी आल्याने सर्वत्र खळबळ उडाल्याने सर्वत्र याच घटनेबाबत चर्चा हाेत असून, पुढे काय हाेणार, याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत. यामध्ये दाेषींवर कारवाई निश्चित हाेईल, असा आत्मविश्वास भाजप कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे, तर शिवसैनिक ‘कर नही ताे डर काय का’ म्हणत आहेत. ईडीचा चाैकशी अहवाल जाे येईल ताे येईल; परंतु जिल्ह्यामध्ये सणासुदीच्या काळातही जागाेजागी याचीच चर्चा हाेताना दिसून येत आहे, एवढे मात्र नक्की.

....

किरीट साेमय्या यांना सुरक्षा

ठाकरे सरकारमधील अनेक मंत्र्यांवर आराेप करुन त्यांचा घाेटाळा उघडकीस आणण्याचे काम भाजप नेते किरीट साेमय्या करीत असल्याने त्यांना धमक्या येत असून, सुरक्षेची मागणी केली हाेती. त्यांच्या मागणीला केंद्र सरकारने त्यांना झेड दर्जाची सुरक्षा दिली आहे. देगाव येथे त्यांच्या वाहनावर शाई व दगडफेक झाली हाेती. केंद्र सरकारने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे ४० जवान त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात केले आहेत. यामुळे अनेक प्रकरणे अधिक उजेडात येणार असल्याची चर्चा हाेत आहे.