शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

दुष्काळ परिषदेत शेतकर्‍यांच्या अडीअडचणींवर झाली चर्चा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 01:55 IST

शेलूबाजार: ‘ना जातीसाठी ना धर्मासाठी, एक होऊ फक्त बापासाठी’, हे ब्रीदवाक्य घेऊन मंगरूळपीर तालुक्यातील युवा शेतकर्‍यांनी एकत्र येत ११ फेब्रुवारीला ‘दुष्काळ परिषद’ घेतली. यात शेतकर्‍यांना जाणवणार्‍या विविध अडीअडचणींवर चर्चा करण्यात आली. यासह शेतकरीविरोधी धोरणांविरुद्ध परिषदेत सहभागी मान्यवरांनी आपल्या भाषणांमधून चांगलीच आगपाखड केली.

ठळक मुद्देयुवा शेतकर्‍यांचा पुढाकार शेतकरीविरोधी धोरणांविरुद्ध सहभागी मान्यवरांची आगपाखड

लोकमत न्यूज नेटवर्कशेलूबाजार: ‘ना जातीसाठी ना धर्मासाठी, एक होऊ फक्त बापासाठी’, हे ब्रीदवाक्य घेऊन मंगरूळपीर तालुक्यातील युवा शेतकर्‍यांनी एकत्र येत ११ फेब्रुवारीला ‘दुष्काळ परिषद’ घेतली. यात शेतकर्‍यांना जाणवणार्‍या विविध अडीअडचणींवर चर्चा करण्यात आली. यासह शेतकरीविरोधी धोरणांविरुद्ध परिषदेत सहभागी मान्यवरांनी आपल्या भाषणांमधून चांगलीच आगपाखड केली.शेलूबाजार येथील लक्ष्मीचंद हायस्कुलमध्ये आयोजित या दुष्काळ परिषदेस प्रमुख वक्ते म्हणून वीज प्रश्न व शेतकरी कर्ज प्रकरणाचे अभ्यासक ललीतकुमार बहाडे, शेतीप्रश्नाचे अभ्यासक प्रा. उल्हास जाधव तथा शेतकरी नेते गजानन अमदाबादकर यांची उपस्थिती होती. ‘दुष्काळाची परिभाषा आणि उपाययोजना’, या विषयाला बहाडे यांनी हात घातला. ‘ग्रामीण समस्या व शहरी नागरिकांची भूमिका’, या विषयावर प्रा. उल्हास जाधव यांनी, तर ‘भावी आंदोलनात युवकांची भूमिका’ या विषयावर शेतकरी नेते गजानन अमदाबादकर यांनी मार्गदर्शन केले. सन १९६0-१९७0 च्या शतकात धान्याला मोताज असलेला भारत देश सध्या मात्र धन-धान्याने समृद्ध झालेला आहे. हा चमत्कार घडवून आणणार्‍या शेतकर्‍यांच्या वाट्याला मात्र केवळ कर्जबाजारीपणा आला आहे. शेतात काबाडकष्ट करून शेतीमाल उत्पादनवाढीचा फायदा शेतकरी सोडून इतर सर्व घटकांना झाला. याचा परिणाम देशात होणार्‍या लाखो शेतकरी आत्महत्येच्या स्वरूपात समोर आला आहे, असे सांगून शेतकर्‍यांचा विचार कोण करेल, असा प्रश्न अमदाबादकर यांनी यावेळी उपस्थित केला. दुष्काळ परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी शेलुबाजार, हिरंगी-खेर्डा, चोरद-जनुना, वनोजा, माळशेलू, नांदखेडा, धोत्रा (गणेशपूर), तर्‍हाळा, ईचा-नागी, शेंदूरजना मोरे, चिखली, पिंप्री खु., पिंप्री अवगण, अरक-चिंचाळा, कंझरा, पिंपळखुटा संगम, मसोला ब., भुर-पूर-रुई-तांदळी, गोगरी, पेडगाव, येडशी, पार्डी ताड, लाठी, तपोवन, मानोली आदी गावांमधील युवा शेतकर्‍यांनी पुढाकार घेतला. शेतकरी प्रतिनिधी म्हणून दामोदर इंगोले, चेतन महल्ले, श्रीकांत ठाकरे, रवी ठाकरे आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक व परिषदेमागील भूमिका निमंत्रक अर्जुन भीमराव सुर्वे यांनी मांडली. कार्यक्रमाचे संचलन वैभव भिवरकर तथा आभार प्रदर्शन मधुकर ढोके यांनी केले. 

टॅग्स :washimवाशिम