शहरं
Join us  
Trending Stories
1
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
2
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
3
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
4
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
5
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
6
U19 Asia Cup 2025 : कोण आहे Aaron George? पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी ठरला ‘संकटमोचक’
7
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
8
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
9
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
10
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
11
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
12
Nitin Nabin: चार वेळा आमदार, बिहारमध्ये मंत्री; भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नबीन कोण आहेत?
13
सिडनी येथे जगप्रसिद्ध बॉन्डी बीचवर अंदाधुंद गोळीबार; दोन हल्लेखोर ताब्यात, १० पर्यटकांचा जीव घेतला
14
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
15
IND vs SA T20I : टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हममधून जसप्रीत बुमराह OUT; कारण...
16
बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?
17
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
18
पीएम सूर्य घर : मोफत वीज योजनेसाठी कसा करायचा ऑनलाईन अर्ज? सोपी आहे पद्धत, एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
19
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
20
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळ परिषदेत शेतकर्‍यांच्या अडीअडचणींवर झाली चर्चा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 01:55 IST

शेलूबाजार: ‘ना जातीसाठी ना धर्मासाठी, एक होऊ फक्त बापासाठी’, हे ब्रीदवाक्य घेऊन मंगरूळपीर तालुक्यातील युवा शेतकर्‍यांनी एकत्र येत ११ फेब्रुवारीला ‘दुष्काळ परिषद’ घेतली. यात शेतकर्‍यांना जाणवणार्‍या विविध अडीअडचणींवर चर्चा करण्यात आली. यासह शेतकरीविरोधी धोरणांविरुद्ध परिषदेत सहभागी मान्यवरांनी आपल्या भाषणांमधून चांगलीच आगपाखड केली.

ठळक मुद्देयुवा शेतकर्‍यांचा पुढाकार शेतकरीविरोधी धोरणांविरुद्ध सहभागी मान्यवरांची आगपाखड

लोकमत न्यूज नेटवर्कशेलूबाजार: ‘ना जातीसाठी ना धर्मासाठी, एक होऊ फक्त बापासाठी’, हे ब्रीदवाक्य घेऊन मंगरूळपीर तालुक्यातील युवा शेतकर्‍यांनी एकत्र येत ११ फेब्रुवारीला ‘दुष्काळ परिषद’ घेतली. यात शेतकर्‍यांना जाणवणार्‍या विविध अडीअडचणींवर चर्चा करण्यात आली. यासह शेतकरीविरोधी धोरणांविरुद्ध परिषदेत सहभागी मान्यवरांनी आपल्या भाषणांमधून चांगलीच आगपाखड केली.शेलूबाजार येथील लक्ष्मीचंद हायस्कुलमध्ये आयोजित या दुष्काळ परिषदेस प्रमुख वक्ते म्हणून वीज प्रश्न व शेतकरी कर्ज प्रकरणाचे अभ्यासक ललीतकुमार बहाडे, शेतीप्रश्नाचे अभ्यासक प्रा. उल्हास जाधव तथा शेतकरी नेते गजानन अमदाबादकर यांची उपस्थिती होती. ‘दुष्काळाची परिभाषा आणि उपाययोजना’, या विषयाला बहाडे यांनी हात घातला. ‘ग्रामीण समस्या व शहरी नागरिकांची भूमिका’, या विषयावर प्रा. उल्हास जाधव यांनी, तर ‘भावी आंदोलनात युवकांची भूमिका’ या विषयावर शेतकरी नेते गजानन अमदाबादकर यांनी मार्गदर्शन केले. सन १९६0-१९७0 च्या शतकात धान्याला मोताज असलेला भारत देश सध्या मात्र धन-धान्याने समृद्ध झालेला आहे. हा चमत्कार घडवून आणणार्‍या शेतकर्‍यांच्या वाट्याला मात्र केवळ कर्जबाजारीपणा आला आहे. शेतात काबाडकष्ट करून शेतीमाल उत्पादनवाढीचा फायदा शेतकरी सोडून इतर सर्व घटकांना झाला. याचा परिणाम देशात होणार्‍या लाखो शेतकरी आत्महत्येच्या स्वरूपात समोर आला आहे, असे सांगून शेतकर्‍यांचा विचार कोण करेल, असा प्रश्न अमदाबादकर यांनी यावेळी उपस्थित केला. दुष्काळ परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी शेलुबाजार, हिरंगी-खेर्डा, चोरद-जनुना, वनोजा, माळशेलू, नांदखेडा, धोत्रा (गणेशपूर), तर्‍हाळा, ईचा-नागी, शेंदूरजना मोरे, चिखली, पिंप्री खु., पिंप्री अवगण, अरक-चिंचाळा, कंझरा, पिंपळखुटा संगम, मसोला ब., भुर-पूर-रुई-तांदळी, गोगरी, पेडगाव, येडशी, पार्डी ताड, लाठी, तपोवन, मानोली आदी गावांमधील युवा शेतकर्‍यांनी पुढाकार घेतला. शेतकरी प्रतिनिधी म्हणून दामोदर इंगोले, चेतन महल्ले, श्रीकांत ठाकरे, रवी ठाकरे आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक व परिषदेमागील भूमिका निमंत्रक अर्जुन भीमराव सुर्वे यांनी मांडली. कार्यक्रमाचे संचलन वैभव भिवरकर तथा आभार प्रदर्शन मधुकर ढोके यांनी केले. 

टॅग्स :washimवाशिम