शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

दुष्काळ परिषदेत शेतकर्‍यांच्या अडीअडचणींवर झाली चर्चा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 01:55 IST

शेलूबाजार: ‘ना जातीसाठी ना धर्मासाठी, एक होऊ फक्त बापासाठी’, हे ब्रीदवाक्य घेऊन मंगरूळपीर तालुक्यातील युवा शेतकर्‍यांनी एकत्र येत ११ फेब्रुवारीला ‘दुष्काळ परिषद’ घेतली. यात शेतकर्‍यांना जाणवणार्‍या विविध अडीअडचणींवर चर्चा करण्यात आली. यासह शेतकरीविरोधी धोरणांविरुद्ध परिषदेत सहभागी मान्यवरांनी आपल्या भाषणांमधून चांगलीच आगपाखड केली.

ठळक मुद्देयुवा शेतकर्‍यांचा पुढाकार शेतकरीविरोधी धोरणांविरुद्ध सहभागी मान्यवरांची आगपाखड

लोकमत न्यूज नेटवर्कशेलूबाजार: ‘ना जातीसाठी ना धर्मासाठी, एक होऊ फक्त बापासाठी’, हे ब्रीदवाक्य घेऊन मंगरूळपीर तालुक्यातील युवा शेतकर्‍यांनी एकत्र येत ११ फेब्रुवारीला ‘दुष्काळ परिषद’ घेतली. यात शेतकर्‍यांना जाणवणार्‍या विविध अडीअडचणींवर चर्चा करण्यात आली. यासह शेतकरीविरोधी धोरणांविरुद्ध परिषदेत सहभागी मान्यवरांनी आपल्या भाषणांमधून चांगलीच आगपाखड केली.शेलूबाजार येथील लक्ष्मीचंद हायस्कुलमध्ये आयोजित या दुष्काळ परिषदेस प्रमुख वक्ते म्हणून वीज प्रश्न व शेतकरी कर्ज प्रकरणाचे अभ्यासक ललीतकुमार बहाडे, शेतीप्रश्नाचे अभ्यासक प्रा. उल्हास जाधव तथा शेतकरी नेते गजानन अमदाबादकर यांची उपस्थिती होती. ‘दुष्काळाची परिभाषा आणि उपाययोजना’, या विषयाला बहाडे यांनी हात घातला. ‘ग्रामीण समस्या व शहरी नागरिकांची भूमिका’, या विषयावर प्रा. उल्हास जाधव यांनी, तर ‘भावी आंदोलनात युवकांची भूमिका’ या विषयावर शेतकरी नेते गजानन अमदाबादकर यांनी मार्गदर्शन केले. सन १९६0-१९७0 च्या शतकात धान्याला मोताज असलेला भारत देश सध्या मात्र धन-धान्याने समृद्ध झालेला आहे. हा चमत्कार घडवून आणणार्‍या शेतकर्‍यांच्या वाट्याला मात्र केवळ कर्जबाजारीपणा आला आहे. शेतात काबाडकष्ट करून शेतीमाल उत्पादनवाढीचा फायदा शेतकरी सोडून इतर सर्व घटकांना झाला. याचा परिणाम देशात होणार्‍या लाखो शेतकरी आत्महत्येच्या स्वरूपात समोर आला आहे, असे सांगून शेतकर्‍यांचा विचार कोण करेल, असा प्रश्न अमदाबादकर यांनी यावेळी उपस्थित केला. दुष्काळ परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी शेलुबाजार, हिरंगी-खेर्डा, चोरद-जनुना, वनोजा, माळशेलू, नांदखेडा, धोत्रा (गणेशपूर), तर्‍हाळा, ईचा-नागी, शेंदूरजना मोरे, चिखली, पिंप्री खु., पिंप्री अवगण, अरक-चिंचाळा, कंझरा, पिंपळखुटा संगम, मसोला ब., भुर-पूर-रुई-तांदळी, गोगरी, पेडगाव, येडशी, पार्डी ताड, लाठी, तपोवन, मानोली आदी गावांमधील युवा शेतकर्‍यांनी पुढाकार घेतला. शेतकरी प्रतिनिधी म्हणून दामोदर इंगोले, चेतन महल्ले, श्रीकांत ठाकरे, रवी ठाकरे आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक व परिषदेमागील भूमिका निमंत्रक अर्जुन भीमराव सुर्वे यांनी मांडली. कार्यक्रमाचे संचलन वैभव भिवरकर तथा आभार प्रदर्शन मधुकर ढोके यांनी केले. 

टॅग्स :washimवाशिम