शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

२० दिवसांत ९०६ टन भाजीपाला, फळांची ग्राहकांना थेट विक्री!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 16:49 IST

२.२६ कोटींची उलाढाल झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी ‘लॉक डाऊन’ कालावधीत नागरिकांना दुध, भाजीपाला, फळे उपलब्ध व्हावी, यासाठी कृषी विभागाने शेतकरी गटांमार्फत उत्पादित शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहचिला. यामाध्यमातून गत २० दिवसांत ९०६ टन भाजीपाला व फळांची विक्री झाली असून २.२६ कोटींची उलाढाल झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी दिली.शेतकरी, शेतकरी गट तसेच शेतकरी कंपन्यांमार्फत उत्पादित शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहचविण्‍यासाठी नियंत्रण कक्ष स्‍थापण करण्यात आले आहे. कृषी उपसंचालक निलेश ठोंबरे, तंत्र अधिकारी (विस्तार) समाधान पडघान, मनिषा लंगोटे (फलोत्पादन) यांची जिल्हास्तरावर नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. यासह तालुका स्तरावर कृषी अधिकारी व कृषी सहायकांची तालुका नोडल अधिकारी म्‍हणून नेमणूक करण्यात आली.दरम्यान, जिल्ह्यात शहरी भागात एकाच ठिकाणी भाजी मंडई होती. ‘लॉक डाऊन’नंतर जिल्‍हा क्रीडा संकुल, काटा रोड मैदान, जुनी जिल्हा परिषद परिसर, गुरूवार बाजार, कृषी उत्पन्न बाजार समिती, वत्सगुल्म मराठी शाळा, जुने आरटीओ कार्यालय आदी ठिकाणी जागेची आखणी करुन भाजी मंडईचे  नियोजन करण्यात आले. त्यास वाशिम शहरातील नागरिकांनी ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन करित उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.खबरदारीची उपाययोजना म्‍हणून भाजीपाला, फळे व दूध विक्रेत्यांना कृषी विभागाकडून रियुजेबल कापडी मास्कचे वाटप करण्यात आले. जिल्ह्यातील रिसोड, मालेगाव, मानोरा, मंगरूळपीर, कारंजा येथेही शेतकरी ते ग्राहक थेट शेतमाल विक्रीचा उपक्रम राबविण्यात आला. २७ मार्चपासून १६ एप्रिलपर्यंत याअंतर्गत तब्बल ५०६ टन भाजीपाला आणि फळांची विक्री झाली असून २.२६ कोटींची उलाढाल झाल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तोटावार यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्र