शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

रब्बी पेरणीची तयारी करताय, कर्जासाठी प्रस्ताव दिला का?

By दिनेश पठाडे | Updated: October 3, 2023 17:11 IST

रब्बी हंगामात १४ हजार शेतकऱ्यांना कर्ज देण्याचे उद्दिष्ट

वाशिम : जिल्ह्यात खरीप हंगामात उडीद, मूग, अल्पावधीत येणारे सोयाबीन घेतलेल्या शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची तयारी सुरू केली आहे. बी - बियाण्याची जमवाजमव केली जात आहे. पेरणीसाठी अनेक शेतकऱ्यांना आर्थिक चणचण भासते, अशावेळी बँकेकडे अर्ज करून पीककर्ज घेणे शक्य आहे. काही दिवसांत सर्वच ठिकाणी सोयाबीन काढणीस प्रारंभ होईल. यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे पीक उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. शिवाय बाजार समितीत आवक वाढल्यानंतर भावदेखील कमी होतात. अशावेळी शेतकरी सोयाबीन न विकता ठेवून देतात. 

रब्बी हंगामासाठी उसनवारी करून किंवा उधारीने बी-बियाणे घेतात. काहीजण खासगी सावकाराकडून कर्ज घेतात. यामुळे अनेकांना आर्थिक भुर्दंड बसतो. या परिस्थितीत शेतकऱ्यांना पीककर्ज घेण्याचा मार्ग हिताचा ठरतो. यंदाच्या वार्षिक पतपुरवठा आराखड्यानुसार जिल्ह्याला रब्बी हंगामात १५५ कोटी २१ लाख रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट असून, ज्याचा लाभ १३ हजार ९९० शेतकऱ्यांना होणे अपेक्षित आहे. खरीप हंगामातील पीककर्ज वाटपाचा कालावधी ३० सप्टेंबरला संपुष्टात आला आहे. 

१ ऑक्टोबरपासून रब्बी हंगामाचे पीककर्ज वाटपास प्रारंभ झाला आहे. त्या-त्या बँकेला कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. खरीप हंगामाच्या तुलनेत रब्बी हंगामात पेरणीचे क्षेत्र कमी असते. त्यामुळे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्टदेखील कमी राहत असल्याचे चित्र आहे. यंदा खरीप हंगामात विक्रमी कर्जवाटप झाले आहे. त्याचप्रमाणे रब्बी हंगामातही सुरुवातीच्या कालावधीपासूनच पीककर्ज वाटप गतीने करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी बँकांना दिल्या आहेत.

गतवर्षी होते १२६ कोटींचे उद्दिष्टरब्बी हंगाम २०२२-२३ मध्ये जिल्ह्याला १० हजार शेतकऱ्यांना १२६ कोटी रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या वर्षात बऱ्यापैकी कर्जवाटप करण्यात आले. खरीप हंगामात काही कारणास्तव कर्ज घेता आले नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात पीककर्ज घेतले होते.

टॅग्स :Farmerशेतकरी