शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रब्बी पेरणीची तयारी करताय, कर्जासाठी प्रस्ताव दिला का?

By दिनेश पठाडे | Updated: October 3, 2023 17:11 IST

रब्बी हंगामात १४ हजार शेतकऱ्यांना कर्ज देण्याचे उद्दिष्ट

वाशिम : जिल्ह्यात खरीप हंगामात उडीद, मूग, अल्पावधीत येणारे सोयाबीन घेतलेल्या शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची तयारी सुरू केली आहे. बी - बियाण्याची जमवाजमव केली जात आहे. पेरणीसाठी अनेक शेतकऱ्यांना आर्थिक चणचण भासते, अशावेळी बँकेकडे अर्ज करून पीककर्ज घेणे शक्य आहे. काही दिवसांत सर्वच ठिकाणी सोयाबीन काढणीस प्रारंभ होईल. यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे पीक उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. शिवाय बाजार समितीत आवक वाढल्यानंतर भावदेखील कमी होतात. अशावेळी शेतकरी सोयाबीन न विकता ठेवून देतात. 

रब्बी हंगामासाठी उसनवारी करून किंवा उधारीने बी-बियाणे घेतात. काहीजण खासगी सावकाराकडून कर्ज घेतात. यामुळे अनेकांना आर्थिक भुर्दंड बसतो. या परिस्थितीत शेतकऱ्यांना पीककर्ज घेण्याचा मार्ग हिताचा ठरतो. यंदाच्या वार्षिक पतपुरवठा आराखड्यानुसार जिल्ह्याला रब्बी हंगामात १५५ कोटी २१ लाख रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट असून, ज्याचा लाभ १३ हजार ९९० शेतकऱ्यांना होणे अपेक्षित आहे. खरीप हंगामातील पीककर्ज वाटपाचा कालावधी ३० सप्टेंबरला संपुष्टात आला आहे. 

१ ऑक्टोबरपासून रब्बी हंगामाचे पीककर्ज वाटपास प्रारंभ झाला आहे. त्या-त्या बँकेला कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. खरीप हंगामाच्या तुलनेत रब्बी हंगामात पेरणीचे क्षेत्र कमी असते. त्यामुळे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्टदेखील कमी राहत असल्याचे चित्र आहे. यंदा खरीप हंगामात विक्रमी कर्जवाटप झाले आहे. त्याचप्रमाणे रब्बी हंगामातही सुरुवातीच्या कालावधीपासूनच पीककर्ज वाटप गतीने करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी बँकांना दिल्या आहेत.

गतवर्षी होते १२६ कोटींचे उद्दिष्टरब्बी हंगाम २०२२-२३ मध्ये जिल्ह्याला १० हजार शेतकऱ्यांना १२६ कोटी रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या वर्षात बऱ्यापैकी कर्जवाटप करण्यात आले. खरीप हंगामात काही कारणास्तव कर्ज घेता आले नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात पीककर्ज घेतले होते.

टॅग्स :Farmerशेतकरी