शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

वाशिम जिल्ह्यात २८ मे पासून अतिसार नियंत्रण पंधरवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 12:58 IST

वाशिम : भारत सरकारच्या निर्देशानुसार २८ मे ते ९ जून २०१९ या कालावधीत अतिसार नियंत्रण पंधरवडा जिल्ह्यामध्ये राबविला जाणार.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : भारत सरकारच्या निर्देशानुसार २८ मे ते ९ जून २०१९ या कालावधीत अतिसार नियंत्रण पंधरवडा जिल्ह्यामध्ये राबविला जाणार असून, त्या अनुषंगाने संबंधित विभागांनी समन्वयातून विविध उपक्रम, कार्यक्रम राबविण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी दिल्या.आरोग्य विभाग आणि युनिसेफच्यावतीने स्थानिक नियोजन भवनात आयोजित दोन दिवशीय कार्यशाळेत ते बोलत होते.  यावेळी न्यूमोनिया, डायरिया या आजारापासून सावध राहण्यासाठी नेमके काय करावे याची माहिती देण्यात आली. तसेच आगामी अतिसार नियंत्रण पंधरवडा, पूर्वनियोजन, विविध उपक्रम आदींची माहितीदेखील यावेळी देण्यात आली. शून्य ते पाच वर्षे वयोगटातील सर्वाधिक बालमृत्यू हे न्युमोनिया व डायरिया या दोन आजारामुळे होतात. यावर प्रतिबंध घालण्यासाठी आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण, ग्रामीण पाणीपुरवठा तसेच पाणी व स्वच्छता विभागाने मिळून एकात्मिक पद्धतीने प्रयत्न करणे गरजेचे आहे, अशा सूचना दीपक कुमार मीना यांनी दिल्या. २८ मे ते ९ जून २०१९ या कालावधीत जिल्ह्यात अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविण्यात येणार आहे. याचे पूर्वनियोजन करणे, विविध विभागाने सक्रिय सहभाग घेणे तसेच पुढील दोन महिन्यामध्ये एक पथदर्शी कार्यक्रम तयार करून पुढील दोन वर्षामध्ये न्यूमोनिया व डायरिया या आजाराच्या निर्देशांकमध्ये सुधारणा करण्याचे निर्देशही मीना यांनी दिले आहेत. यावेळी शुन्य ते पाच या वयोगटातील मुलांच्या आरोग्यासाठी सर्वाधिक घातक असलेल्या न्युमोनिया (श्वसनदाह) आणि डायरिया (हगवण) या आजारांवर प्रतिबंध घालण्यासंदर्भात एकात्मिक पध्दतीने प्रयत्न केले जातील, असे  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी सांगितले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के,  जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे, महिला व बाल कल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी नितिन मोहुर्ले, युनिसेफचे आरोग्य अधिकारी डॉ. मंगेश गढरी, डॉ. वैभव महात्मे आदिंची यावेळी उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमHealthआरोग्य