शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
4
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
5
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
6
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
7
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
8
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
9
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
10
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
11
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
12
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
13
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
14
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
15
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
16
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
17
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
18
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
20
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या

वाशिम जिल्ह्यात २८ मे पासून अतिसार नियंत्रण पंधरवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 12:58 IST

वाशिम : भारत सरकारच्या निर्देशानुसार २८ मे ते ९ जून २०१९ या कालावधीत अतिसार नियंत्रण पंधरवडा जिल्ह्यामध्ये राबविला जाणार.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : भारत सरकारच्या निर्देशानुसार २८ मे ते ९ जून २०१९ या कालावधीत अतिसार नियंत्रण पंधरवडा जिल्ह्यामध्ये राबविला जाणार असून, त्या अनुषंगाने संबंधित विभागांनी समन्वयातून विविध उपक्रम, कार्यक्रम राबविण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी दिल्या.आरोग्य विभाग आणि युनिसेफच्यावतीने स्थानिक नियोजन भवनात आयोजित दोन दिवशीय कार्यशाळेत ते बोलत होते.  यावेळी न्यूमोनिया, डायरिया या आजारापासून सावध राहण्यासाठी नेमके काय करावे याची माहिती देण्यात आली. तसेच आगामी अतिसार नियंत्रण पंधरवडा, पूर्वनियोजन, विविध उपक्रम आदींची माहितीदेखील यावेळी देण्यात आली. शून्य ते पाच वर्षे वयोगटातील सर्वाधिक बालमृत्यू हे न्युमोनिया व डायरिया या दोन आजारामुळे होतात. यावर प्रतिबंध घालण्यासाठी आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण, ग्रामीण पाणीपुरवठा तसेच पाणी व स्वच्छता विभागाने मिळून एकात्मिक पद्धतीने प्रयत्न करणे गरजेचे आहे, अशा सूचना दीपक कुमार मीना यांनी दिल्या. २८ मे ते ९ जून २०१९ या कालावधीत जिल्ह्यात अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविण्यात येणार आहे. याचे पूर्वनियोजन करणे, विविध विभागाने सक्रिय सहभाग घेणे तसेच पुढील दोन महिन्यामध्ये एक पथदर्शी कार्यक्रम तयार करून पुढील दोन वर्षामध्ये न्यूमोनिया व डायरिया या आजाराच्या निर्देशांकमध्ये सुधारणा करण्याचे निर्देशही मीना यांनी दिले आहेत. यावेळी शुन्य ते पाच या वयोगटातील मुलांच्या आरोग्यासाठी सर्वाधिक घातक असलेल्या न्युमोनिया (श्वसनदाह) आणि डायरिया (हगवण) या आजारांवर प्रतिबंध घालण्यासंदर्भात एकात्मिक पध्दतीने प्रयत्न केले जातील, असे  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी सांगितले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के,  जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे, महिला व बाल कल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी नितिन मोहुर्ले, युनिसेफचे आरोग्य अधिकारी डॉ. मंगेश गढरी, डॉ. वैभव महात्मे आदिंची यावेळी उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमHealthआरोग्य