शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

कोट्यवधी रुपये खर्चूनही सामाजिक सभागृहे धूळ खात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 15:12 IST

वाशिम जिल्ह्यातील शंभरावर सामाजिक सभागृहे सद्या विविध समस्यांच्या विळख्यात सापडले आहेत.

ठळक मुद्देसामाजिक सभागृहांची अवस्था अत्यंत दयनिय झाली आहे. गावकऱ्यांना लग्नसोहळ्यांसह इतर काही कार्यक्रम घेताना अडचण जात आहे. प्रशासनाचे या महत्वपूर्ण बाबीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ग्रामीण भागात नागरिकांना सांस्कृतिक कार्यक्रम अथवा इतर कौटुंबिक कार्यक्रम साजरे करण्यासाठी योग्य जागा उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्ह्यात आमदार निधीतून करोडो रुपये खर्चून सामाजिक सभागृहे उभारण्यात आली. विद्यार्थी, तरूणांसाठी अभ्यासिका, व्यायामशाळा उभारल्या; मात्र, यातील बहुतांश वास्तूंची अवस्था अत्यंत दयनिय झाली आहे. जिल्ह्यातील शंभरावर सामाजिक सभागृहे सद्या विविध समस्यांच्या विळख्यात सापडले आहेत. कचरा, धूळ, स्वच्छतागृहांची दुरवस्था, खिळखिळीत झालेल्या खिडक्या अशी अवस्था या सभागृहांची झाली आहे.जिल्ह्यातील गावांमध्ये आमदार निधीतून सामाजिक सभागृह, सिमेंट रस्ते, व्यायामशाळा, स्मशानभूमी, शाळा खोली विशेष दुरूस्ती आदी कामे करण्यात आली. त्यातील सामाजिक सभागृहांची अवस्था अत्यंत दयनिय झाली आहे. गावातील कुठलेही मंगलकार्य साजरे करण्यासाठी गावकऱ्यांना हक्काचे व सुविधांनी सज्ज ठिकाण म्हणून या सभागृहांचा वापर होणे क्रमप्राप्त आहे. प्रत्यक्षात मात्र तुलनेने जुन्या झालेल्या अनेक ठिकाणच्या सभागृहाची मोठ्या प्रमाणात पडझड होण्यासोबतच काही ठिकाणी सभागृहांचा वापर चक्क गुरांचा गोठा म्हणून केला जात असल्याचे निदर्शनास येत आहे. काही सभागृहांसभोवताल कचºयाचे ढीग साचत असल्याने मूळ उद्देशांना हरताळ फासला जात असल्याचे पाहावयास मिळत आहे.

सभागृहांची डागडूजी, दुरूस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्षजिल्ह्यातील काही गावांमध्ये असलेल्या सामाजिक सभागृहांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. यामुळे गावकऱ्यांना लग्नसोहळ्यांसह इतर काही कार्यक्रम घेताना अडचण जात आहे. अशा स्थितीत सभागृहांच्या डागडूजी, दुरूस्तीकडे प्रशासनाने लक्ष पुरविल्यास ग्रामस्थांची होणारी गैरसोय टळू शकते. प्रत्यक्षात मात्र प्रशासनाचे या महत्वपूर्ण बाबीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

ग्रामीण भागात उभारण्यात आलेली अनेक ठिकाणची सामाजिक सभागृहे सद्य:स्थितीत जुनी झाली असून आवश्यक सुविधा मिळत नसल्याने नागरिकांकडून त्याचा वापर केला जात नाही. प्रशासनाने सभागृहांच्या दुरूस्तीकडे लक्ष पुरविल्यास चित्र बदलू शकते.- प्रदिप शिंदे, पांगरखेडा (ता.मालेगाव)

आमदार निधीमधून दरवर्षी इतर कामांसोबतच मागणीप्रमाणे सामाजिक सभागृह उभारण्यासाठी निधीची तरतूद करण्यात येते. त्यानुसार जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये सभागृह उभारण्यात आली आहेत. स्थानिक ग्रामपंचायतींनी ही सभागृहे सुस्थितीत ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवे.- भारत वायाळजिल्हा नियोजन अधिकारी, वाशिम

 

 

टॅग्स :washimवाशिमSocialसामाजिक