तालुक्यातील धोत्रा गावचे शेतकरी रामकृष्ण सीताराम मनवर यांची शेती मंगरूळपीर - कारंजा रस्त्यालगत असून, निर्माणाधिन रस्त्याच्या नाल्या काढण्यात न आल्यामुळे आणि मागील वर्षी आणि यावर्षी झालेल्या अतिवृष्टीने व मंगरूळपीर - कारंजा रस्त्यावरील पाण्याचा लोंढा शेतशिवारातून वाहून गेल्याने शेती मोठ्या प्रमाणात खरडून अपरिमित हानी झाल्याचे निवेदन मागील वर्षी आणि याहीवर्षी बाधित शेतकऱ्यांनी तहसीलदार, मंगरूळपीर यांना देऊनही कुठल्याही प्रकारची नुकसानभरपाई अद्यापपर्यंत मिळालेली नसल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
०००००००००००००
तहसीलदारांना पुन्हा निवेदन
अतिवृष्टीमुळे खरडून गेलेल्या शेत शिवारातून सोयाबीन, तूर आणि इतर पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे रामकृष्ण मनवर यांनी तहसीलदारांना निवेदनाद्वारे कळवले आहे. शेती हेच कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे साधन असल्याने नुकसानभरपाई तातडीने देण्याची मागणी बाधित शेतकरी मनवर यांनी महसूल प्रशासनाला केली आहे.