शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

मालेगाव तालुक्यात कोविड सेंटर उभारण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:42 IST

कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले असून, ते कधी संपेल हे कुणीही सांगू शकत नाही. पहिल्या लाटेपेक्षाही दुसरी लाट प्रचंड ...

कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले असून, ते कधी संपेल हे कुणीही सांगू शकत नाही. पहिल्या लाटेपेक्षाही दुसरी लाट प्रचंड वेगाने वाढत असून, तिचा वेग हा असाच वाढत राहिल्यास फार मोठे संकट आरोग्य विभागावरच नव्हे तर सगळ्यांवरच येणार आहे. त्यासाठी आतापासूनच उपाययोजना करण्याची गरज आहे. जिल्ह्यात दररोज ३०० पेक्षाही अधिक रुग्ण वाढत आहेत. काही गावामध्ये तर कोरोनाने थैमान घातले आहे. पहिल्या लाटेत वयस्कर व ज्यांना मधुमेह, रक्तदाब, दमा अशाप्रकारचे आजार आहेत, त्यांचे मृत्यूचे प्रमाण जास्त होते. यावेळेस मात्र हा आजार सर्वच वयातील लोकांना होत आहे. मालेगाव तालुक्यामध्येही भयावह परिस्थिती आहे. दररोज सरासरी १०० वर रुग्ण पॉझिटिव्ह येत आहेत. कमी लक्षणे असलेल्या व श्वासाचा त्रास नसलेल्या रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यांच्यामध्ये विषाणूचे प्रमाणही अल्प असते. थोडी फार लक्षणे असलेल्या रुग्णांनी त्वरित आपली कोरोना टेस्ट करून घेऊन उपचार सुरू केल्यास ते रुग्ण बरे होऊ शकतात. मात्र अशाप्रकारच्या प्राथमिक उपचारासाठीसुद्धा रुग्णांना मालेगाव येथे व्यवस्था नसल्याने वाशीम येथे जावे लागते. त्यामुळे वाशीमचा ताण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने तेथे सर्वांनाच सुविधा पुरविणे कठीण झाले असल्याचे चित्र आहे. अनेक रुग्णांना तर हॉस्पिटलमध्ये जागा नसल्याने बाहेरच उपचार करून घ्यावे लागत आहेत. ज्या रुग्णांमध्ये कोरोना विषाणूचे प्रमाण अधिक असेल त्यांनाच वाशीम येथे पाठवावे व त्याखालील रुग्णांचा उपचार स्थानिक पातळीवरच झाल्यास रुग्णांची सुविधा होईल. वाशीम येथे उपचारासाठी जाण्यास अनेक जणांची हिंमत होत नाही तर काही पैशाच्या अडचणीमुळे जाऊ शकत नाही. त्यासाठी मालेगाव शहरामध्ये किमान २०० बेडचे कोविड रुग्णालय सुरू करण्याची गरज आहे. त्यासाठी शहरातील अनेक शाळांपैकी एखादी शाळा शासनाने ताब्यात घ्यावी, कारण सध्या शाळाही बंद आहेत. या सेंटरमध्ये शासनाने वैद्यकीय व्यवस्था व सेवा पुरवावी तसेच शहरातील व परिसरातील खासगी डॉक्टरांची सेवा तेथे घ्यावी. कोविड सेंटरमध्ये लागणाऱ्या प्राथमिक सुविधा उपलब्ध करून द्याव्या. या आणीबाणीच्या व देशावर आलेल्या संकटकाळामध्ये सर्वांनीच आपापल्यापरीने मदत केल्यास शासकीय यंत्रणेवरचा ताण कमी होऊन रुग्णांनाही चांगली सेवा मिळेल, यात शंका नाही.