शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

मालेगाव तालुक्यात कोविड सेंटर उभारण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:42 IST

कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले असून, ते कधी संपेल हे कुणीही सांगू शकत नाही. पहिल्या लाटेपेक्षाही दुसरी लाट प्रचंड ...

कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले असून, ते कधी संपेल हे कुणीही सांगू शकत नाही. पहिल्या लाटेपेक्षाही दुसरी लाट प्रचंड वेगाने वाढत असून, तिचा वेग हा असाच वाढत राहिल्यास फार मोठे संकट आरोग्य विभागावरच नव्हे तर सगळ्यांवरच येणार आहे. त्यासाठी आतापासूनच उपाययोजना करण्याची गरज आहे. जिल्ह्यात दररोज ३०० पेक्षाही अधिक रुग्ण वाढत आहेत. काही गावामध्ये तर कोरोनाने थैमान घातले आहे. पहिल्या लाटेत वयस्कर व ज्यांना मधुमेह, रक्तदाब, दमा अशाप्रकारचे आजार आहेत, त्यांचे मृत्यूचे प्रमाण जास्त होते. यावेळेस मात्र हा आजार सर्वच वयातील लोकांना होत आहे. मालेगाव तालुक्यामध्येही भयावह परिस्थिती आहे. दररोज सरासरी १०० वर रुग्ण पॉझिटिव्ह येत आहेत. कमी लक्षणे असलेल्या व श्वासाचा त्रास नसलेल्या रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यांच्यामध्ये विषाणूचे प्रमाणही अल्प असते. थोडी फार लक्षणे असलेल्या रुग्णांनी त्वरित आपली कोरोना टेस्ट करून घेऊन उपचार सुरू केल्यास ते रुग्ण बरे होऊ शकतात. मात्र अशाप्रकारच्या प्राथमिक उपचारासाठीसुद्धा रुग्णांना मालेगाव येथे व्यवस्था नसल्याने वाशीम येथे जावे लागते. त्यामुळे वाशीमचा ताण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने तेथे सर्वांनाच सुविधा पुरविणे कठीण झाले असल्याचे चित्र आहे. अनेक रुग्णांना तर हॉस्पिटलमध्ये जागा नसल्याने बाहेरच उपचार करून घ्यावे लागत आहेत. ज्या रुग्णांमध्ये कोरोना विषाणूचे प्रमाण अधिक असेल त्यांनाच वाशीम येथे पाठवावे व त्याखालील रुग्णांचा उपचार स्थानिक पातळीवरच झाल्यास रुग्णांची सुविधा होईल. वाशीम येथे उपचारासाठी जाण्यास अनेक जणांची हिंमत होत नाही तर काही पैशाच्या अडचणीमुळे जाऊ शकत नाही. त्यासाठी मालेगाव शहरामध्ये किमान २०० बेडचे कोविड रुग्णालय सुरू करण्याची गरज आहे. त्यासाठी शहरातील अनेक शाळांपैकी एखादी शाळा शासनाने ताब्यात घ्यावी, कारण सध्या शाळाही बंद आहेत. या सेंटरमध्ये शासनाने वैद्यकीय व्यवस्था व सेवा पुरवावी तसेच शहरातील व परिसरातील खासगी डॉक्टरांची सेवा तेथे घ्यावी. कोविड सेंटरमध्ये लागणाऱ्या प्राथमिक सुविधा उपलब्ध करून द्याव्या. या आणीबाणीच्या व देशावर आलेल्या संकटकाळामध्ये सर्वांनीच आपापल्यापरीने मदत केल्यास शासकीय यंत्रणेवरचा ताण कमी होऊन रुग्णांनाही चांगली सेवा मिळेल, यात शंका नाही.