शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

वाशिम जिल्ह्यातील गारपिटग्रस्तांना तातडीने मदत देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 13:34 IST

वाशिम - महसूल व कृषी विभागाने पंचनामे करताना दिरंगाई करू नये तसेच शासनाने गारपिटग्रस्तांना मदत द्यावी, अशी मागणी विविध संघटना व पक्षातर्फे १२ व १३ फेब्रुवारीला जिल्हाधिकाºयांमार्फत शासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

ठळक मुद्देरविवारी वाशिम जिल्हयात अवकाळी पाऊस झाला. रिसोड व मालेगाव तालुक्यात गारपिट झाली. पृष्ठभूमीवर शासनाने नुकसानग्रस्तांना भरघोष मदत द्यावी, अशी मागणी विविध संघटना व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली. 

वाशिम - वाशिम जिल्ह्यात झालेल्या गारपिटीमध्ये २२ ते २५ हजार एकर क्षेत्रावरील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पृष्ठभूमीवर महसूल व कृषी विभागाने पंचनामे करताना दिरंगाई करू नये तसेच शासनाने गारपिटग्रस्तांना मदत द्यावी, अशी मागणी विविध संघटना व पक्षातर्फे १२ व १३ फेब्रुवारीला जिल्हाधिकाºयांमार्फत शासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

रविवारी वाशिम जिल्हयात अवकाळी पाऊस झाला. रिसोड व मालेगाव तालुक्यात गारपिट झाली. सोमवारी सायंकाळी कारंजा तालुक्यात गारपिट व अवकाळी पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे मंगरूळपीर तालुक्यातील काही भागातील पिकांचे नुकसान झाले आहे. या पृष्ठभूमीवर शासनाने नुकसानग्रस्तांना भरघोष मदत द्यावी, अशी मागणी विविध संघटना व पक्षाच्या पदाधिकाºयांनी केली. 

पिकाच्या नुकसान भरपाई व जिवित हानीबद्दल पिडीतांना शासनाने प्रत्येकी दहा लाख रुपये सानुग्रह अनुदान द्यावे अशी मागणी छावा संघटनेने केली. गारपीटीमुळे कापूस, आंबा, हरभरा, भाजीपाला, गहू आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नैसर्गीक आपत्तीमुळे शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेले उत्पन्न पाहता पाहता निघून गेले.  नैसर्गीक आपत्तीमध्ये सापडलेले शेतकरी व जिवित हाणीग्रस्त कुटुंबांना तातडीने अर्थसहाय्यची कार्यवाही होण्यास प्रशासकीय कार्यवाहीमध्ये वेळ होत असल्यास तात्काळ सानुग्रह अनुदान मंजुर करण्यात यावे. सानुग्रह अनुदानाची रक्कम रुपये १० लाखापेक्षा कमी नसावी अशी मागणी संघटनेने केली. यावेळी छावा संघटनेचे विदर्भ संपर्कप्रमुख मनिष डांगे, विदर्भ संघटक गणेश गांजरे, जिल्हा संपर्कप्रमुख गजानन काळपांडे, जिल्हा निरिक्षक दिपक पानझाडे, जिल्हा प्रवक्ता संजय ढवळे, महिला जिल्हाध्यक्ष बेबी पडघान यांच्यासह अ.भा. छावा संघटना, सिंहगर्जना युवक अपंग विकास सामाजिक संघटना, छावा गणेशोत्सव मंडळ, छावा नवदुर्गा उत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पार्डी तिखे परिसरातील हरभरा व गहू, संत्रा आदींचे अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झाले आहे.  सरपंच शेषराव दगडूजी अंभोरे, पोलीस पाटील श्रीकांत तिखे यांनी  शेतावर जाऊन पाहणी केली. त्यानंतर नुकसानग्रस्त शेतकºयांना तातडीने मदत देण्याची मागणी सरपंच शेषराव  अंभोरे यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्र्यांकडे जिल्हाधिकाºयांमार्फत १२ फेब्रुवारी रोजी निवेदनाद्वारे केली. शारदा खोडके, नारायण अमृता तिखे, गणेश फलटणकर, रामेश्वर पुंजाजी वडकर, गणेश वडकर, प्रकाश धूड, विश्वनाथ लोडजी पोफळे, गीताबाई वडकर, प्रभाकर तिखे यांच्यासह ३० ते ४० शेतकºयांचे अतोनात नुकसान झाले असून, शासनाने भरघोष मदत द्यावी, अशी मागणी सरपंच, पोलीस पाटलांसह शेतकºयांनी केली.

वाशिम जिल्ह्यातील शेतकºयांना दिलासा म्हणून शासनाने हेक्टरी ५० हजार रुपये याप्रमाणे नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष युसूफ पुंजानी यांनी बुधवारी केली.

टॅग्स :washimवाशिमWashim Collector officeवाशिम जिल्हाधिकारी कार्यालय