शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

वाशिम जिल्ह्यातील गारपिटग्रस्तांना तातडीने मदत देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 13:34 IST

वाशिम - महसूल व कृषी विभागाने पंचनामे करताना दिरंगाई करू नये तसेच शासनाने गारपिटग्रस्तांना मदत द्यावी, अशी मागणी विविध संघटना व पक्षातर्फे १२ व १३ फेब्रुवारीला जिल्हाधिकाºयांमार्फत शासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

ठळक मुद्देरविवारी वाशिम जिल्हयात अवकाळी पाऊस झाला. रिसोड व मालेगाव तालुक्यात गारपिट झाली. पृष्ठभूमीवर शासनाने नुकसानग्रस्तांना भरघोष मदत द्यावी, अशी मागणी विविध संघटना व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली. 

वाशिम - वाशिम जिल्ह्यात झालेल्या गारपिटीमध्ये २२ ते २५ हजार एकर क्षेत्रावरील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पृष्ठभूमीवर महसूल व कृषी विभागाने पंचनामे करताना दिरंगाई करू नये तसेच शासनाने गारपिटग्रस्तांना मदत द्यावी, अशी मागणी विविध संघटना व पक्षातर्फे १२ व १३ फेब्रुवारीला जिल्हाधिकाºयांमार्फत शासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

रविवारी वाशिम जिल्हयात अवकाळी पाऊस झाला. रिसोड व मालेगाव तालुक्यात गारपिट झाली. सोमवारी सायंकाळी कारंजा तालुक्यात गारपिट व अवकाळी पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे मंगरूळपीर तालुक्यातील काही भागातील पिकांचे नुकसान झाले आहे. या पृष्ठभूमीवर शासनाने नुकसानग्रस्तांना भरघोष मदत द्यावी, अशी मागणी विविध संघटना व पक्षाच्या पदाधिकाºयांनी केली. 

पिकाच्या नुकसान भरपाई व जिवित हानीबद्दल पिडीतांना शासनाने प्रत्येकी दहा लाख रुपये सानुग्रह अनुदान द्यावे अशी मागणी छावा संघटनेने केली. गारपीटीमुळे कापूस, आंबा, हरभरा, भाजीपाला, गहू आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नैसर्गीक आपत्तीमुळे शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेले उत्पन्न पाहता पाहता निघून गेले.  नैसर्गीक आपत्तीमध्ये सापडलेले शेतकरी व जिवित हाणीग्रस्त कुटुंबांना तातडीने अर्थसहाय्यची कार्यवाही होण्यास प्रशासकीय कार्यवाहीमध्ये वेळ होत असल्यास तात्काळ सानुग्रह अनुदान मंजुर करण्यात यावे. सानुग्रह अनुदानाची रक्कम रुपये १० लाखापेक्षा कमी नसावी अशी मागणी संघटनेने केली. यावेळी छावा संघटनेचे विदर्भ संपर्कप्रमुख मनिष डांगे, विदर्भ संघटक गणेश गांजरे, जिल्हा संपर्कप्रमुख गजानन काळपांडे, जिल्हा निरिक्षक दिपक पानझाडे, जिल्हा प्रवक्ता संजय ढवळे, महिला जिल्हाध्यक्ष बेबी पडघान यांच्यासह अ.भा. छावा संघटना, सिंहगर्जना युवक अपंग विकास सामाजिक संघटना, छावा गणेशोत्सव मंडळ, छावा नवदुर्गा उत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पार्डी तिखे परिसरातील हरभरा व गहू, संत्रा आदींचे अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झाले आहे.  सरपंच शेषराव दगडूजी अंभोरे, पोलीस पाटील श्रीकांत तिखे यांनी  शेतावर जाऊन पाहणी केली. त्यानंतर नुकसानग्रस्त शेतकºयांना तातडीने मदत देण्याची मागणी सरपंच शेषराव  अंभोरे यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्र्यांकडे जिल्हाधिकाºयांमार्फत १२ फेब्रुवारी रोजी निवेदनाद्वारे केली. शारदा खोडके, नारायण अमृता तिखे, गणेश फलटणकर, रामेश्वर पुंजाजी वडकर, गणेश वडकर, प्रकाश धूड, विश्वनाथ लोडजी पोफळे, गीताबाई वडकर, प्रभाकर तिखे यांच्यासह ३० ते ४० शेतकºयांचे अतोनात नुकसान झाले असून, शासनाने भरघोष मदत द्यावी, अशी मागणी सरपंच, पोलीस पाटलांसह शेतकºयांनी केली.

वाशिम जिल्ह्यातील शेतकºयांना दिलासा म्हणून शासनाने हेक्टरी ५० हजार रुपये याप्रमाणे नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष युसूफ पुंजानी यांनी बुधवारी केली.

टॅग्स :washimवाशिमWashim Collector officeवाशिम जिल्हाधिकारी कार्यालय