शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

पीक विम्याचे धोरण बदलण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:25 IST

शेतकऱ्यांना एक हेक्टर सोयाबीनचा विमा घेण्यासाठी ९२० रुपये भरावे लागतात. हे पैसे भरल्यानंतर विमा कंपनीला सरकारकडून ५ हजार १७५ ...

शेतकऱ्यांना एक हेक्टर सोयाबीनचा विमा घेण्यासाठी ९२० रुपये भरावे लागतात. हे पैसे भरल्यानंतर विमा कंपनीला सरकारकडून ५ हजार १७५ रुपये मिळतात. म्हणजेच शेतकऱ्यांनी एका हेक्टर सोयाबीनचे ९२० रुपये भरले की, विमा कंपनीकडे त्या-त्या शेतकऱ्यांचे ६ हजार ७५ प्रतु हेक्टर जमा होतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी सहभाग घेतल्याशिवाय विमा कंपनीला पैसे मिळत नाहीत. यातून विमा कंपनी शेतकरी आणि शासन असे मिळून शेकडो कोटी रुपये जमा करतात. हे पैसे जमा करण्यासाठी शेतकऱ्यांना विमा भरायला लावण्यासाठी सर्रास शासकीय यंत्रणेचा वापर केला जातो. मग शासनाचा हिस्सा जमा करण्यापासून भ्रष्टाचाराला सुरुवात होते. तर दुसऱ्या वर्षांतील पीक विमा घेईपर्यंत देवाणघेवाण सुरूच राहते. हजारो कोटी रुपये शेतकऱ्यांच्या नावावर खर्च होतात, पण शेतकरी मात्र कवडीला मोहताज असतात. शंभर टक्के विमा घेतलेल्या पिकाचे नुकसान झाले तर हेक्टरला ४५ हजार रुपयांची तरतूद आहे, परंतु पीक तर सोडाच, जमीन खरडून गेली तरी शंभर टक्के नुकसान भरपाई विमा कंपनी देत नाही.

-----------

महाराष्ट्र सरकारने शेतकरी हित जोपासावे

इतर अनेक राज्यांनी केंद्र सरकारची पंतप्रधान विमा योजना बंद करून स्वतःची योजना कार्यान्वित केली. तेलंगणा सरकार विमा न घेता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत देते. असेच एखादे शेतकरी हिताचे धोरण महाराष्ट्र सरकारने अंमलात आणले पाहिजे. त्याशिवाय पीक विम्याकडे पाहण्याचा शेतकऱ्यांचा दृष्टिकोन बदलणार नाही. काही वर्षे आधी, तर पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा सक्तीचा असायचा बँका, विमा कंपनी आणि शासकीय यंत्रणेतील काही उच्चपदस्थ यात सहभागी असायचे. आता सक्ती बंद झाली असली तरी काही ठिकाणी आधूनमधून काही बँक अधिकारी प्रयोग करताना दिसतात.