शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

पीक विम्याचे धोरण बदलण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:25 IST

शेतकऱ्यांना एक हेक्टर सोयाबीनचा विमा घेण्यासाठी ९२० रुपये भरावे लागतात. हे पैसे भरल्यानंतर विमा कंपनीला सरकारकडून ५ हजार १७५ ...

शेतकऱ्यांना एक हेक्टर सोयाबीनचा विमा घेण्यासाठी ९२० रुपये भरावे लागतात. हे पैसे भरल्यानंतर विमा कंपनीला सरकारकडून ५ हजार १७५ रुपये मिळतात. म्हणजेच शेतकऱ्यांनी एका हेक्टर सोयाबीनचे ९२० रुपये भरले की, विमा कंपनीकडे त्या-त्या शेतकऱ्यांचे ६ हजार ७५ प्रतु हेक्टर जमा होतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी सहभाग घेतल्याशिवाय विमा कंपनीला पैसे मिळत नाहीत. यातून विमा कंपनी शेतकरी आणि शासन असे मिळून शेकडो कोटी रुपये जमा करतात. हे पैसे जमा करण्यासाठी शेतकऱ्यांना विमा भरायला लावण्यासाठी सर्रास शासकीय यंत्रणेचा वापर केला जातो. मग शासनाचा हिस्सा जमा करण्यापासून भ्रष्टाचाराला सुरुवात होते. तर दुसऱ्या वर्षांतील पीक विमा घेईपर्यंत देवाणघेवाण सुरूच राहते. हजारो कोटी रुपये शेतकऱ्यांच्या नावावर खर्च होतात, पण शेतकरी मात्र कवडीला मोहताज असतात. शंभर टक्के विमा घेतलेल्या पिकाचे नुकसान झाले तर हेक्टरला ४५ हजार रुपयांची तरतूद आहे, परंतु पीक तर सोडाच, जमीन खरडून गेली तरी शंभर टक्के नुकसान भरपाई विमा कंपनी देत नाही.

-----------

महाराष्ट्र सरकारने शेतकरी हित जोपासावे

इतर अनेक राज्यांनी केंद्र सरकारची पंतप्रधान विमा योजना बंद करून स्वतःची योजना कार्यान्वित केली. तेलंगणा सरकार विमा न घेता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत देते. असेच एखादे शेतकरी हिताचे धोरण महाराष्ट्र सरकारने अंमलात आणले पाहिजे. त्याशिवाय पीक विम्याकडे पाहण्याचा शेतकऱ्यांचा दृष्टिकोन बदलणार नाही. काही वर्षे आधी, तर पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा सक्तीचा असायचा बँका, विमा कंपनी आणि शासकीय यंत्रणेतील काही उच्चपदस्थ यात सहभागी असायचे. आता सक्ती बंद झाली असली तरी काही ठिकाणी आधूनमधून काही बँक अधिकारी प्रयोग करताना दिसतात.