शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

‘टेस्टिंग रिपोर्ट’अभावी शेतकऱ्यांना कृषी रोहित्र मिळण्यास विलंब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 14:40 IST

‘टेस्टिंग रिपोर्ट’ लवकर मिळत नसल्याने विज जोडणी मिळण्यास विलंब होत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.

- सुनील काकडे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शेतीला सिंचनासाठी आवश्यक असलेला वीज पुरवठा उपलब्ध व्हावा, यासाठी जिल्हयातील शेतकऱ्यांनी रोहित्रांची मागणी केली आहे; मात्र लाखो रुपये भरुनही केवळ ‘टेस्टिंग रिपोर्ट’ लवकर मिळत नसल्याने विज जोडणी मिळण्यास विलंब होत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. सद्या सुरु असलेल्या रब्बीतील पिकांवर त्याचा परिणाम होत आहे.जिल्ह्यात ४ हजार ४४५ कृषीपंपांना विजजोडणी देण्याचे उद्दीष्ट आहे. त्यापैकी १५ फेब्रूवारी २०२० अखेर २ हजार २४१ कृषीपंपांना विजजोडणी देण्यात आली असून २ हजार १४१ कृषीपंपांना विजजोडणीचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांमधून सिंचनासाठी पाणी घेऊ इच्छित काही शेतकºयांना विजेची गरज भासत आहे. त्यासाठी त्यांनी रितसर अर्ज करून तथा आवश्यक असलेली लाखो रुपयांची रक्कम अदा करूनही केवळ ‘टेस्टिंग रिपोर्ट’ मिळण्यास विलंब होत असल्याने रोहित्र कार्यान्वित होणे अशक्य झाले आहे. यासंदर्भात माहिती जाणून घेतली असता, ठेकेदारांकडून रोहित्र बसविल्यानंतर त्याची विद्यूत निरीक्षकांकडून तपासणी केली जाते. त्यात रोहित्र किती क्षमतेचे आहे, त्याच क्षमतेचे फेज लावण्यात आले आहे का, प्रत्येक विद्यूत खांबावर नियमानुसार आर्थिंग तार बसविली आहे का, आदींचा समावेश आहे. या निरीक्षणानंतरच रोहित्रांचा ‘टेस्टिंग रिपोर्ट’ देऊन रोहित्रांना विद्यूत जोडणीस परवानगी दिली जाते. हा रिपोर्ट मिळण्यास मात्र बराच विलंब लागत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.महिनाभरापूर्वी २.६० लाख रुपये भरूनही मिळाले नाही रोहीत्रशिरपूरपासून जवळच मिर्झापूर सिंचन प्रकल्प असून मुबलक प्रमाणात पाणीसाठा असतानाही केवळ विजेअभावी शेतकºयांना सिंचनाचा लाभ मिळेनासा झाला आहे. दरम्यान, शिरपूर येथील शेतकरी गोपाल देशमुख, दिलीप बाविस्कर, हसन गवळी, सुरेश डुकरे, कैलास बाविस्कर व विठ्ठल काळे यांनी दोन महिन्यांपूर्वी रोहित्रासाठी दीड लाख व विद्यूत खांबांसाठी लागणारे १.१० लाख असे एकूण २.६० लाख रुपये भरूनही केवळ ‘टेस्टिंग रिपोर्ट’ न मिळाल्याने रोहित्र मिळू शकले नाही.मिर्झापूर सिंचन प्रकल्पामध्ये मुबलक प्रमाणात जलसाठा असतानाही सिंचनासाठी पाणी मिळणे अशक्य झाले आहे. रोहित्र बसवून मिळावे, यासाठी महावितरणकडे आम्ही सहा शेतकºयांनी महिनाभरापूर्वी २.६० लाखांचा भरणा केला; मात्र ’टेस्टिंग रिपोर्ट’ मिळाला नसल्याने रोहित्र बसवू शकत नाही, असे ठेकेदाराचे म्हणणे आहे. यामुळे सिंचनाचा प्रश्न भेडसावत असून नुकसान होत आहे.- विठ्ठलराव काळेशेतकरी, शिरपूरजैनजिल्ह्यातील विद्यूत रोहित्र बसविण्याचे काम करणाºया ठेकेदारांनी विद्यूत वाहिनी आणि खांब उभारल्यानंतर रोहित्र स्थापित करण्यापूर्वी त्यात कुठल्याही अडचणी नसल्याबाबत सखोल चौकशी व तपासणी करावी लागते. या प्रक्रियेत प्रशासनाकडून कुठलीही हयगय केली जात नाही. सद्य:स्थितीत अशी केवळ ६० प्रकरणे प्रलंबित असून ती देखील लवकरच निकाली काढण्यात येतील.- सारंग नाईविद्यूत निरीक्षक, महावितरण, वाशिम

 

टॅग्स :washimवाशिमmahavitaranमहावितरण