शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

‘टेस्टिंग रिपोर्ट’अभावी शेतकऱ्यांना कृषी रोहित्र मिळण्यास विलंब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 14:40 IST

‘टेस्टिंग रिपोर्ट’ लवकर मिळत नसल्याने विज जोडणी मिळण्यास विलंब होत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.

- सुनील काकडे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शेतीला सिंचनासाठी आवश्यक असलेला वीज पुरवठा उपलब्ध व्हावा, यासाठी जिल्हयातील शेतकऱ्यांनी रोहित्रांची मागणी केली आहे; मात्र लाखो रुपये भरुनही केवळ ‘टेस्टिंग रिपोर्ट’ लवकर मिळत नसल्याने विज जोडणी मिळण्यास विलंब होत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. सद्या सुरु असलेल्या रब्बीतील पिकांवर त्याचा परिणाम होत आहे.जिल्ह्यात ४ हजार ४४५ कृषीपंपांना विजजोडणी देण्याचे उद्दीष्ट आहे. त्यापैकी १५ फेब्रूवारी २०२० अखेर २ हजार २४१ कृषीपंपांना विजजोडणी देण्यात आली असून २ हजार १४१ कृषीपंपांना विजजोडणीचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांमधून सिंचनासाठी पाणी घेऊ इच्छित काही शेतकºयांना विजेची गरज भासत आहे. त्यासाठी त्यांनी रितसर अर्ज करून तथा आवश्यक असलेली लाखो रुपयांची रक्कम अदा करूनही केवळ ‘टेस्टिंग रिपोर्ट’ मिळण्यास विलंब होत असल्याने रोहित्र कार्यान्वित होणे अशक्य झाले आहे. यासंदर्भात माहिती जाणून घेतली असता, ठेकेदारांकडून रोहित्र बसविल्यानंतर त्याची विद्यूत निरीक्षकांकडून तपासणी केली जाते. त्यात रोहित्र किती क्षमतेचे आहे, त्याच क्षमतेचे फेज लावण्यात आले आहे का, प्रत्येक विद्यूत खांबावर नियमानुसार आर्थिंग तार बसविली आहे का, आदींचा समावेश आहे. या निरीक्षणानंतरच रोहित्रांचा ‘टेस्टिंग रिपोर्ट’ देऊन रोहित्रांना विद्यूत जोडणीस परवानगी दिली जाते. हा रिपोर्ट मिळण्यास मात्र बराच विलंब लागत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.महिनाभरापूर्वी २.६० लाख रुपये भरूनही मिळाले नाही रोहीत्रशिरपूरपासून जवळच मिर्झापूर सिंचन प्रकल्प असून मुबलक प्रमाणात पाणीसाठा असतानाही केवळ विजेअभावी शेतकºयांना सिंचनाचा लाभ मिळेनासा झाला आहे. दरम्यान, शिरपूर येथील शेतकरी गोपाल देशमुख, दिलीप बाविस्कर, हसन गवळी, सुरेश डुकरे, कैलास बाविस्कर व विठ्ठल काळे यांनी दोन महिन्यांपूर्वी रोहित्रासाठी दीड लाख व विद्यूत खांबांसाठी लागणारे १.१० लाख असे एकूण २.६० लाख रुपये भरूनही केवळ ‘टेस्टिंग रिपोर्ट’ न मिळाल्याने रोहित्र मिळू शकले नाही.मिर्झापूर सिंचन प्रकल्पामध्ये मुबलक प्रमाणात जलसाठा असतानाही सिंचनासाठी पाणी मिळणे अशक्य झाले आहे. रोहित्र बसवून मिळावे, यासाठी महावितरणकडे आम्ही सहा शेतकºयांनी महिनाभरापूर्वी २.६० लाखांचा भरणा केला; मात्र ’टेस्टिंग रिपोर्ट’ मिळाला नसल्याने रोहित्र बसवू शकत नाही, असे ठेकेदाराचे म्हणणे आहे. यामुळे सिंचनाचा प्रश्न भेडसावत असून नुकसान होत आहे.- विठ्ठलराव काळेशेतकरी, शिरपूरजैनजिल्ह्यातील विद्यूत रोहित्र बसविण्याचे काम करणाºया ठेकेदारांनी विद्यूत वाहिनी आणि खांब उभारल्यानंतर रोहित्र स्थापित करण्यापूर्वी त्यात कुठल्याही अडचणी नसल्याबाबत सखोल चौकशी व तपासणी करावी लागते. या प्रक्रियेत प्रशासनाकडून कुठलीही हयगय केली जात नाही. सद्य:स्थितीत अशी केवळ ६० प्रकरणे प्रलंबित असून ती देखील लवकरच निकाली काढण्यात येतील.- सारंग नाईविद्यूत निरीक्षक, महावितरण, वाशिम

 

टॅग्स :washimवाशिमmahavitaranमहावितरण