शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

‘रोहयो’ घोटाळ्यातील चौकशीचे अहवाल सादर करण्यात दिरंगाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 12:30 IST

८३ ग्रामपंचायतींपैकी केवळ ३ ग्रामपंचायतींचेच अहवाल कृषी विभागाला प्राप्त झाले असून सोमवार, २० जानेवारीला विभागीय आयुक्त आढावा घेणार असल्याची माहिती संनियंत्रण अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस.एम. तोटावार यांनी दिली.

- सुनील काकडे  लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : रोजगार हमी योजनेअंतर्गत मालेगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींनी केलेल्या विविध कामांमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला. त्याची विभागीय आयुक्तांच्या निर्देशावरून बुलडाणा, यवतमाळ जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या १० विशेष पथकांनी १२ ते ३१ डिसेंबरदरम्यान चौकशी केली. त्याचे अहवाल १९ जानेवारीपर्यंत सादर करण्याच्या सूचना होत्या. प्रत्यक्षात मात्र ८३ ग्रामपंचायतींपैकी केवळ ३ ग्रामपंचायतींचेच अहवाल कृषी विभागाला प्राप्त झाले असून सोमवार, २० जानेवारीला विभागीय आयुक्त आढावा घेणार असल्याची माहिती संनियंत्रण अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस.एम. तोटावार यांनी दिली.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत भूमिगत पाट, मातीची धरणे, समतल चर, समतल बांध, सिंचन तलावांमधील गाळ उपसा, सडक पट्टया, कालवा बांध, खोदविहिरी, शेततळी, फलोत्पादन, वैयक्तिक घरगुती शौचालय, शाळांमध्ये प्रसाधन गृहे, अंगणवाडीत प्रसाधनगृहे, घनकचरा, सांडपाणी, खेळाची मैदाने उभारणे यासह इतरही विविध स्वरूपातील कामे जॉब कार्डधारक मजूरांना उपलब्ध करून दिली जातात. त्यानुसार, मालेगाव तालुक्यातील ८३ ग्रामपंचायतींमध्येही कामे झाली; मात्र बहुतांश कामे निकृष्ट असून अनेक कामे कागदोपत्रीच उरकण्यात आली. यासंदर्भातील तक्रारींची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी गठीत केलेल्या पथकाने वाघळूद, ब्राम्हणवाडा यासह २० ग्रामपंचायत क्षेत्रातील कामांची प्राथमिक चौकशी केली असता, त्यात अनयिमितता व गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, इतरही ग्रामपंचायतींमध्ये असे गंभीर प्रकार झाल्यासंदर्भात जिल्हाधिकाºयांनी विभागीय आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला.त्यानुसार, विभागीय आयुक्तांनी १० डिसेंबर २०१९ ला आदेश पारित करून रोहयोअंतर्गत मालेगाव तालुक्यातील गावांमध्ये १ एप्रिल २०१८ ते ३० नोव्हेंबर २०१९ या कालावधीत करण्यात आलेल्या सर्व कामांची महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अधिनियम २००५, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना अधिनियम १९७७ व योजना राबविण्याबाबत शासनाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार कामे झाली आहेत किंवा नाही, याची सखोल चौकशी करण्यासाठी यवतमाळ आणि बुलडाणा जिल्ह्यातील अधिकाºयांचे १० वेगवेगळे पथक तयार करून सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले. १२ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत चौकशी प्रक्रिया पूर्ण करून त्याचे अहवाल १९ जानेवारी २०१९ पर्यंत सादर करण्याच्या सूचना पथकांमधील अधिकाºयांना देण्यात आल्या होत्या. प्रत्यक्षात मात्र १९ जानेवारीपर्यंत मालेगाव तालुक्यातील ८३ पैकी केवळ ३ ग्रामपंचायतींचेच चौकशी अहवाल पथकांमार्फत प्रशासनाला प्राप्त झाले. तथापि, ही बाब अत्यंत गंभीर असून २० जानेवारीला विभागीय आयुक्त यासंदर्भात आढावा बैठक घेणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तोटावार यांनी दिली.‘रोहयो’तील कामांत १.१७ कोटींचा घोटाळा करणारे ‘ते’ आरोपी अद्याप मोकाटच!मालेगाव पंचायत समितीअंतर्गत येणाºया मुठ्ठा, वाघळूद आणि वाकद गटग्रामपंचायत क्षेत्रात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून करण्यात आलेल्या कामांपैकी १०५ कामांमध्ये शासनाची दिशाभूल करून व खोटे दस्तावेज तयार करून १ कोटी १७ लाख ७० हजार ४२४ रुपयांचा अपहार करण्यात आला. याप्रकरणी दोषी आढळलेल्या तत्कालिन प्रभारी गटविकास अधिकारी संदिप कोटकर यांच्यासह तत्कालिन सहायक लेखा अधिकारी सुभाष इंगळे, तत्कालिन कंत्राटी पॅनल तांत्रीक सहायक धनंजय बोरकर, क्लार्क कम डाटा एन्ट्री आॅपरेटर सागर इंगोले, विनोद आगाशे, सरपंच कृष्णा देशमुख, ग्रामरोजगार सेवक वैजनाथ इंगळे अशा ७ जणांवर २० डिसेंबरला शिरपूर पोलिसांत कलम ४०९, ४२०, ४६५, ४६६, ४७१, ३४ अन्वये गुन्हे दाखल झाले. त्यानंतर हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. त्यास २९ दिवसांचा मोठा कालावधी उलटला असताना एकही आरोपी अद्यापपर्यंत ताब्यात घेण्यात आलेला नाही. त्यामुळे याप्रकरणी कुठेतरी पाणी मुरत असल्याचे बोलले जात आहे.मालेगाव पंचायत समितीच्या सहायक गटविकास अधिकाºयांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून ७ आरोपींवर विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. अपहाराची रक्कम १ कोटींपेक्षा अधिक असल्याने प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. शिरपूर पोलिस आर्थिक गुन्हे शाखेला अपेक्षित असलेले सहकार्य करित आहे. आरोपींचाही शोध घेतला जात आहे.- समाधान वाठोरेपोलिस निरीक्षक, शिरपूर जैन

टॅग्स :washimवाशिम