शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

‘मुद्रा बँक’ योजनेतून कर्ज मिळण्यास लागतोय विलंब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 14:41 IST

स्थानिक पातळीवरील बँकांकडून कर्ज देण्याबाबत टाळाटाळ केली जात असून दाखल प्रकरणे निकाली काढायलाही विलंब केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सुशिक्षित तसेच ज्यांना स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याची इच्छा आहे, अशा सर्व घटकांसाठी शासनाने प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेंतर्गंत कर्ज वाटपाची सुविधा दिली. मात्र, स्थानिक पातळीवरील बँकांकडून कर्ज देण्याबाबत टाळाटाळ केली जात असून दाखल प्रकरणे निकाली काढायलाही विलंब केला जात आहे. या गंभीर बाबीकडे जिल्हा प्रशासनाचेही दुर्लक्ष होत आहे.ग्रामीण, दुर्गम आणि अती दुर्गम भागातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत, गरजू आणि होतकरू बेरोजगारांना स्वत:चा हक्काचा व्यवसाय सुरू करता यावा, या उद्देशाने शासनाने प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना अंमलात आणली. या योजनांमधील यंत्रणांमध्ये योग्य समन्वय साधण्यासाठी १४ जून २०१६ च्या शासन निर्णयान्वये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समित्यांचे गठण करण्यात आले.योजनेचा प्रचार व प्रसार युद्धस्तरावर व्हावा, यासाठी जिल्ह्यांच्या मागणीनुसार जिल्हास्तरीय समित्यांना भरीव निधी देखील उपलब्ध करून दिला जातो. मात्र, याऊपरही मुद्रा बँक योजनेचा जिल्हास्तरावर ना योग्यप्रकारे प्रचार होत आहे ना गरजू, होतकरू व्यक्तींना बँकांकडून वेळेवर कर्ज मिळत आहे. वारंवार बँकांचे उंबरठे झिजवून तसेच आवश्यक सर्व कागदपत्रांची पुर्तता करूनही कर्ज देण्यासंबंधी बँकांकडून उदासिनता बाळगली जात असल्याने बेरोजगार व्यक्तींमधून रोष व्यक्त होत आहे. 

प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी. गरजू व होतकरूंना विनाविलंब कर्जपुरवठा केला जावा, असे निर्देश जिल्ह्यातील सर्व बँकांना दिले आहेत. त्याचा वेळोवेळी आढावा देखील घेतला जातो. लाभार्थींच्या तक्रारी असल्यास त्यांनी त्या सादर कराव्या. त्याची निश्चितपणे दखल घेतली जाईल.- शैलेश हिंगेनिवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमPradhan Mantri Mudra Yojanaप्रधानमंत्री मुद्रा योजना