शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

मदत वाटपातील दिरंगाई अधिकाऱ्यांना भोवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 14:52 IST

दिरंगाई झाल्यास तात्पुरता गैरप्रकार समजून संबंधित जबाबदार अधिकाºयावर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात २७ आॅक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान, पीक नुकसानापोटी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी पहिल्या टप्प्यातील ५६ कोटी ५१ लाख २० हजार रूपयांचा निधी शासनाकडून जिल्ह्यास प्राप्त झाला आहे. तो आहरण व संवितरण अधिकारी म्हणून नेमलेल्या सहाही तालुक्यांच्या तहसीलदारांकडे वर्ग करण्यात आला आहे. या मदतनिधीचे वाटप करून तसा अहवाल ५ डिसेंबरपर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून यात हयगय अथवा दिरंगाई झाल्यास तात्पुरता गैरप्रकार समजून संबंधित जबाबदार अधिकाºयावर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे कृषी व महसूल विभागाने करून जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे नुकसानाचा अंतीम अहवाल सादर केला. त्यानुसार, २ लाख ५९ हजार ७०१ हेक्टर क्षेत्रावरील सोयाबिन, २० हजार ६३५ हेक्टरवरील कपाशी, १३३३ हेक्टरवरील तूर, २२२२ हेक्टरवरील भाजीपाला, १७४ हेक्टरवरील पपई, १११ हेक्टरवरील हळद, ४९४ हेक्टरवरील संत्रा, २७ हेक्टर लिंबू, ६५ हेक्टरवरील डाळींबाचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे दर्शविण्यात आले असून २ लाख ५० हजार ३५० बाधीत शेतकºयांना नुकसानभरपाईपोटी १९७ कोटी ८९ लाख ३९ हजार ८६२ रुपयांच्या निधीची गरज असल्याचा अंतीम अहवाल विभागीय आयुक्त व शासनाकडे सादर करण्यात आला. दरम्यान, या अहवालावरून जिल्ह्यातील बाधीत शेतकºयांना अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानापोटी आर्थिक मदत करण्यासाठी राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठीकीतील निर्णयानुसार पहिल्या टप्प्यात ५६ कोटी ५१ लाख २० हजार रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनास प्राप्त झाला आहे. हा निधी कोषागार कार्यालयामार्फत तालुकास्तरावर वितरीत करण्यात आला असून तहसीलदारांनी सदर निधी नुकसानग्रस्त शेतकºयांच्या खात्यात बँक खात्यात निकषानुसार जमा करावयाचा आहे. या प्रक्रियेत बरेचदा संबंधित बँका शेतकºयाचे नाव, खाते क्रमांक किंवा आधार क्रमांक जुळत नसल्याचे कारण समोर करून प्राप्त निधी निलंबन खात्यात जमा ठेवतात. प्रत्यक्षात असा निधी संबधित संवितरण किंवा आहरण अधिकाºयांच्या खात्यात ठेवणे आवश्यक असताना बँका तसे करित नाहीत व संबधित संवितरण, आहरण अधिकारी देखील त्याची माहिती घेत नसल्याचे निदर्शनास आले आहे.या चुकीच्या प्रकारामुळे शेतकºयांना देय असलेला मदतनिधी वेळेत प्राप्त होत नसल्याने प्रशासनाविरूद्ध नाहक रोष निर्माण होतो. यासोबतच प्रक्रियेतील नेमके दोषही लक्षात येत नाहीत. ही अडचण टाळण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी सर्व संबधित संवितरण, आहरण अधिकाºयांना १९ नोव्हेंबर रोजी पत्र पाठवून उपरोक्त बाबीची काळजीपूर्वक दक्षता घेण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार, निधी वितरणाची कार्यवाही पूर्ण करून ५ डिसेंबरपर्यंत त्याबाबतचा सुस्पष्ट अहवाल जिल्हा प्रशासनास पाठवावा लागणार आहे. यात दिरंगाई झाल्याचे लक्षात आल्यास तात्पुरता गैरव्यवहार समजून संबंधित संवितरण, आहरण अधिकाºयांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाºयांनी पत्रात नमूद केले आहे.(प्रतिनिधी)

 

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी