शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मदत वाटपातील दिरंगाई अधिकाऱ्यांना भोवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 14:52 IST

दिरंगाई झाल्यास तात्पुरता गैरप्रकार समजून संबंधित जबाबदार अधिकाºयावर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात २७ आॅक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान, पीक नुकसानापोटी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी पहिल्या टप्प्यातील ५६ कोटी ५१ लाख २० हजार रूपयांचा निधी शासनाकडून जिल्ह्यास प्राप्त झाला आहे. तो आहरण व संवितरण अधिकारी म्हणून नेमलेल्या सहाही तालुक्यांच्या तहसीलदारांकडे वर्ग करण्यात आला आहे. या मदतनिधीचे वाटप करून तसा अहवाल ५ डिसेंबरपर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून यात हयगय अथवा दिरंगाई झाल्यास तात्पुरता गैरप्रकार समजून संबंधित जबाबदार अधिकाºयावर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे कृषी व महसूल विभागाने करून जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे नुकसानाचा अंतीम अहवाल सादर केला. त्यानुसार, २ लाख ५९ हजार ७०१ हेक्टर क्षेत्रावरील सोयाबिन, २० हजार ६३५ हेक्टरवरील कपाशी, १३३३ हेक्टरवरील तूर, २२२२ हेक्टरवरील भाजीपाला, १७४ हेक्टरवरील पपई, १११ हेक्टरवरील हळद, ४९४ हेक्टरवरील संत्रा, २७ हेक्टर लिंबू, ६५ हेक्टरवरील डाळींबाचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे दर्शविण्यात आले असून २ लाख ५० हजार ३५० बाधीत शेतकºयांना नुकसानभरपाईपोटी १९७ कोटी ८९ लाख ३९ हजार ८६२ रुपयांच्या निधीची गरज असल्याचा अंतीम अहवाल विभागीय आयुक्त व शासनाकडे सादर करण्यात आला. दरम्यान, या अहवालावरून जिल्ह्यातील बाधीत शेतकºयांना अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानापोटी आर्थिक मदत करण्यासाठी राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठीकीतील निर्णयानुसार पहिल्या टप्प्यात ५६ कोटी ५१ लाख २० हजार रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनास प्राप्त झाला आहे. हा निधी कोषागार कार्यालयामार्फत तालुकास्तरावर वितरीत करण्यात आला असून तहसीलदारांनी सदर निधी नुकसानग्रस्त शेतकºयांच्या खात्यात बँक खात्यात निकषानुसार जमा करावयाचा आहे. या प्रक्रियेत बरेचदा संबंधित बँका शेतकºयाचे नाव, खाते क्रमांक किंवा आधार क्रमांक जुळत नसल्याचे कारण समोर करून प्राप्त निधी निलंबन खात्यात जमा ठेवतात. प्रत्यक्षात असा निधी संबधित संवितरण किंवा आहरण अधिकाºयांच्या खात्यात ठेवणे आवश्यक असताना बँका तसे करित नाहीत व संबधित संवितरण, आहरण अधिकारी देखील त्याची माहिती घेत नसल्याचे निदर्शनास आले आहे.या चुकीच्या प्रकारामुळे शेतकºयांना देय असलेला मदतनिधी वेळेत प्राप्त होत नसल्याने प्रशासनाविरूद्ध नाहक रोष निर्माण होतो. यासोबतच प्रक्रियेतील नेमके दोषही लक्षात येत नाहीत. ही अडचण टाळण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी सर्व संबधित संवितरण, आहरण अधिकाºयांना १९ नोव्हेंबर रोजी पत्र पाठवून उपरोक्त बाबीची काळजीपूर्वक दक्षता घेण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार, निधी वितरणाची कार्यवाही पूर्ण करून ५ डिसेंबरपर्यंत त्याबाबतचा सुस्पष्ट अहवाल जिल्हा प्रशासनास पाठवावा लागणार आहे. यात दिरंगाई झाल्याचे लक्षात आल्यास तात्पुरता गैरव्यवहार समजून संबंधित संवितरण, आहरण अधिकाºयांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाºयांनी पत्रात नमूद केले आहे.(प्रतिनिधी)

 

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी