शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

सदोष बियाणे; ३४ कंपन्या खटल्याच्या कक्षेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 11:24 IST

याप्रकरणी सद्यस्थितीत ३४ कंपन्या खटल्याच्या कक्षेत आल्या असून, यातील चार कंपन्यांवर खटले दाखल करण्यात आले आहेत.

- दादाराव गायकवाड लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : यंदाच्या हंगामात जिल्ह्यातीला कृषी विभागाच्या गुणनियंत्रण पथकांनी तपासणीसाठी संकलित केलेल्या सोयाबीन बियाण्यांच्या नमुन्यातील अनेक नमुने सदोष आढळले आहेत. याप्रकरणी सद्यस्थितीत ३४ कंपन्या खटल्याच्या कक्षेत आल्या असून, यातील चार कंपन्यांवर खटले दाखल करण्यात आले आहेत.यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाच्या गुणनियंत्रण पथकाने विविध पिकांच्या बियाण्यांचे नमुने संकलित केले आहेत. या नमुन्यांची उगवण क्षमता प्रयोगशाळेत तपासली जात आहे. त्यात जिल्हाभरात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनातील पथकासह जिल्हा परिषदेच्या पथकाने ९६ पेक्षा अधिक बियाण्यांचे नमुने संकलित केले. त्यापैकी ८५ नमुन्यांचे अहवाल कृषी विभागास प्राप्त झाले असून, त्यातील ३८ नमुने सदोष असल्याने संबंधित कंपन्या कोर्ट खटल्याच्या कक्षेत असल्याचे कृषी विभागाच्या अहवालात नमूद आहे. त्यात जिल्हा परिषदेतील कृषी विकास अधिकाºयाच्या मागदर्शनातील पथकाने संकलित केलेले ३४, तर अधीक्षक कृषी अधिकाºयाच्या मार्गदर्शनातील पथकाने संकलित केलेल्या ४ नमुन्यांचा समावेश आहे. शिवाय २० नमुन्यांप्रकरणी संबंधित कंपनीस ताकिद दिली असून, त्यात अधीक्षक कृषी अधिकाºयांच्या पथकाचे १२ आणि जि.प.च्या पथकाने संकलित केलेल्या १२ नमुन्यांचा समावेश आहे. सदोष आढलेल्या नमुन्यांत सर्टिफाईड बियाण्यांचे १२, तसेच ट्रुथफुल बियाण्यांच्या ६ नमुन्यांचा समावेश आहे. दरम्यान, अद्यापही ११ नमुन्यांच अहवालाची प्रतिक्षा आहे. या अहवालामुळे जिल्ह्यात यंदाच्या हंगामात सदोष बियाण्यांचीही विक्री झाल्याचे निष्पन्न होत आहे. जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात बियाण्यांचे नमुने सदोष आढळून आल्याने हजारो शेतकºयांनी बियाणे न उगवल्याबाबत केलेल्या तक्रारीत बव्हंशी सत्यता असल्याचे निष्पन्न होत आहे. दरम्यान, सदोष गुणनियंत्रण निरीक्षकांनी संकलित केलेल्या इतरही एका लॉटमधील नमुने सदोष आढळले आहेत; परंतु त्याची विक्री झाली नाही.गुणनियंत्रण निरीक्षकांनी जिल्ह्यात संकलित केलेल्या आणि सदोष आढळून आलेल्या नमुन्यांप्रकरणी संबंधित कंपनीला कायद्यानुसार कारणेदाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. या नोटीसच्या खुलाशाची प्रतिक्षा आहे. कंपन्यांच्या खुलाशाची पडताळणी करण्यात येणार आहे. ज्या कंपनीचा खुलासा समाधानकारक नसेल, त्या कंपनीवर सदोष बियाणे विक्री प्रकरणी नियमानुसार कोर्ट खटला दाखल करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे खुलाशांची प्रतिक्षा आहे.-एस. एम. तोटावार,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,वाशिम

टॅग्स :washimवाशिमCourtन्यायालयAgriculture Sectorशेती क्षेत्र