शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
5
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
6
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
7
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
8
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
9
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
10
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
11
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
12
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
13
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
14
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
15
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
16
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
17
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
18
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
19
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
20
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...

सदोष बियाणे; ३४ कंपन्या खटल्याच्या कक्षेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 11:24 IST

याप्रकरणी सद्यस्थितीत ३४ कंपन्या खटल्याच्या कक्षेत आल्या असून, यातील चार कंपन्यांवर खटले दाखल करण्यात आले आहेत.

- दादाराव गायकवाड लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : यंदाच्या हंगामात जिल्ह्यातीला कृषी विभागाच्या गुणनियंत्रण पथकांनी तपासणीसाठी संकलित केलेल्या सोयाबीन बियाण्यांच्या नमुन्यातील अनेक नमुने सदोष आढळले आहेत. याप्रकरणी सद्यस्थितीत ३४ कंपन्या खटल्याच्या कक्षेत आल्या असून, यातील चार कंपन्यांवर खटले दाखल करण्यात आले आहेत.यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाच्या गुणनियंत्रण पथकाने विविध पिकांच्या बियाण्यांचे नमुने संकलित केले आहेत. या नमुन्यांची उगवण क्षमता प्रयोगशाळेत तपासली जात आहे. त्यात जिल्हाभरात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनातील पथकासह जिल्हा परिषदेच्या पथकाने ९६ पेक्षा अधिक बियाण्यांचे नमुने संकलित केले. त्यापैकी ८५ नमुन्यांचे अहवाल कृषी विभागास प्राप्त झाले असून, त्यातील ३८ नमुने सदोष असल्याने संबंधित कंपन्या कोर्ट खटल्याच्या कक्षेत असल्याचे कृषी विभागाच्या अहवालात नमूद आहे. त्यात जिल्हा परिषदेतील कृषी विकास अधिकाºयाच्या मागदर्शनातील पथकाने संकलित केलेले ३४, तर अधीक्षक कृषी अधिकाºयाच्या मार्गदर्शनातील पथकाने संकलित केलेल्या ४ नमुन्यांचा समावेश आहे. शिवाय २० नमुन्यांप्रकरणी संबंधित कंपनीस ताकिद दिली असून, त्यात अधीक्षक कृषी अधिकाºयांच्या पथकाचे १२ आणि जि.प.च्या पथकाने संकलित केलेल्या १२ नमुन्यांचा समावेश आहे. सदोष आढलेल्या नमुन्यांत सर्टिफाईड बियाण्यांचे १२, तसेच ट्रुथफुल बियाण्यांच्या ६ नमुन्यांचा समावेश आहे. दरम्यान, अद्यापही ११ नमुन्यांच अहवालाची प्रतिक्षा आहे. या अहवालामुळे जिल्ह्यात यंदाच्या हंगामात सदोष बियाण्यांचीही विक्री झाल्याचे निष्पन्न होत आहे. जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात बियाण्यांचे नमुने सदोष आढळून आल्याने हजारो शेतकºयांनी बियाणे न उगवल्याबाबत केलेल्या तक्रारीत बव्हंशी सत्यता असल्याचे निष्पन्न होत आहे. दरम्यान, सदोष गुणनियंत्रण निरीक्षकांनी संकलित केलेल्या इतरही एका लॉटमधील नमुने सदोष आढळले आहेत; परंतु त्याची विक्री झाली नाही.गुणनियंत्रण निरीक्षकांनी जिल्ह्यात संकलित केलेल्या आणि सदोष आढळून आलेल्या नमुन्यांप्रकरणी संबंधित कंपनीला कायद्यानुसार कारणेदाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. या नोटीसच्या खुलाशाची प्रतिक्षा आहे. कंपन्यांच्या खुलाशाची पडताळणी करण्यात येणार आहे. ज्या कंपनीचा खुलासा समाधानकारक नसेल, त्या कंपनीवर सदोष बियाणे विक्री प्रकरणी नियमानुसार कोर्ट खटला दाखल करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे खुलाशांची प्रतिक्षा आहे.-एस. एम. तोटावार,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,वाशिम

टॅग्स :washimवाशिमCourtन्यायालयAgriculture Sectorशेती क्षेत्र