शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

खरीप हंगामात बियाणे न उगवण्याच्या तक्रारीत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 11:29 IST

Washim News : १९ शेतकऱ्यांच्या तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्या असून, यापैकी १४ शेतकऱ्यांनी तक्रार मागे घेतली आहे.

- संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गतवर्षी खरीप हंगामात बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारींचा पाऊस पडला होता. यंदा मात्र आतापर्यंत केवळ १९ शेतकऱ्यांच्या तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्या असून, यापैकी १४ शेतकऱ्यांनी तक्रार मागे घेतली आहे.गतवर्षातील नैसर्गिक आपत्तीच्या संकटातून स्वत:ला सावरत यंदा शेतकरी हे खरीप हंगामासाठी नव्या जोमाने कामाला लागल्याचे दिसून आले. यंदा जिल्ह्यात ४ लाख ६ हजार ४५० हेक्‍टरवर पेरणीचे नियोजन केले होते. आतापर्यंत ९८ टक्के पेरणी आटोपली असून, सर्वाधिक पेरा सोयाबीनचा आहे. खरीप हंगामात पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांना बियाण्यांसाठी धावपळ करावी लागली. विशेषत: महाबीजच्या सोयाबीन बियाण्यांसाठी वेटिंगवर राहूनही अनेक शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली. आता सोयाबीन, तूर, कपाशी यासह खरिपातील सर्व पिके चांगलीच बहरली आहेत. गतवर्षी बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारींचा पाऊस पडला होता. जवळपास ३२०० तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्या होत्या. यंदा मात्र तक्रारींची संख्या लक्षणीय घटली असून, आतापर्यंत केवळ १९ शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले. त्यातही १४ शेतकऱ्यांनी तक्रारी मागे घेतल्या तर उर्वरित ५ तक्रारींमध्ये तथ्य आढळून आले नसल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी सांगितले. 

महाबीज बियाण्याबाबत एकही तक्रार नाही !गेल्या वर्षी महाबीजचे बियाणे उगवले नसल्यासंदर्भात तक्रारींचा पाऊस होता. यंदा महाबीज बियाणे उगवले नसल्याबाबत आतापर्यंत एकही तक्रार महाबीजकडे प्राप्त झाली नाही, असे महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक डॉ. प्रशांत घावडे यांनी स्पष्ट केले.

यावर्षी घरगुती बियाणे वापरासंदर्भात शेतकऱ्यांमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती केली तसेच बियाणे उगवण क्षमता तपासणीचे प्रात्यक्षिकही दिले. यावर्षी बियाणे उगवले नसल्याच्या १९ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यापैकी १४ शेतकऱ्यांनी तक्रारी मागे घेतल्या तर पाच तक्रारीत तथ्य आढळून आले नाही.-  शंकर तोटावारजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम 

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीMahabeejमहाबीज