शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

खरीप हंगामात बियाणे न उगवण्याच्या तक्रारीत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 11:29 IST

Washim News : १९ शेतकऱ्यांच्या तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्या असून, यापैकी १४ शेतकऱ्यांनी तक्रार मागे घेतली आहे.

- संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गतवर्षी खरीप हंगामात बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारींचा पाऊस पडला होता. यंदा मात्र आतापर्यंत केवळ १९ शेतकऱ्यांच्या तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्या असून, यापैकी १४ शेतकऱ्यांनी तक्रार मागे घेतली आहे.गतवर्षातील नैसर्गिक आपत्तीच्या संकटातून स्वत:ला सावरत यंदा शेतकरी हे खरीप हंगामासाठी नव्या जोमाने कामाला लागल्याचे दिसून आले. यंदा जिल्ह्यात ४ लाख ६ हजार ४५० हेक्‍टरवर पेरणीचे नियोजन केले होते. आतापर्यंत ९८ टक्के पेरणी आटोपली असून, सर्वाधिक पेरा सोयाबीनचा आहे. खरीप हंगामात पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांना बियाण्यांसाठी धावपळ करावी लागली. विशेषत: महाबीजच्या सोयाबीन बियाण्यांसाठी वेटिंगवर राहूनही अनेक शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली. आता सोयाबीन, तूर, कपाशी यासह खरिपातील सर्व पिके चांगलीच बहरली आहेत. गतवर्षी बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारींचा पाऊस पडला होता. जवळपास ३२०० तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्या होत्या. यंदा मात्र तक्रारींची संख्या लक्षणीय घटली असून, आतापर्यंत केवळ १९ शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले. त्यातही १४ शेतकऱ्यांनी तक्रारी मागे घेतल्या तर उर्वरित ५ तक्रारींमध्ये तथ्य आढळून आले नसल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी सांगितले. 

महाबीज बियाण्याबाबत एकही तक्रार नाही !गेल्या वर्षी महाबीजचे बियाणे उगवले नसल्यासंदर्भात तक्रारींचा पाऊस होता. यंदा महाबीज बियाणे उगवले नसल्याबाबत आतापर्यंत एकही तक्रार महाबीजकडे प्राप्त झाली नाही, असे महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक डॉ. प्रशांत घावडे यांनी स्पष्ट केले.

यावर्षी घरगुती बियाणे वापरासंदर्भात शेतकऱ्यांमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती केली तसेच बियाणे उगवण क्षमता तपासणीचे प्रात्यक्षिकही दिले. यावर्षी बियाणे उगवले नसल्याच्या १९ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यापैकी १४ शेतकऱ्यांनी तक्रारी मागे घेतल्या तर पाच तक्रारीत तथ्य आढळून आले नाही.-  शंकर तोटावारजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम 

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीMahabeejमहाबीज