शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

कर्जमाफी योजनेची व्याप्ती वाढली ;  शेडनेट, पॉलीहाऊसच्या थकबाकीदार शेतकऱ्यांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 14:45 IST

वाशिम : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गंत आता ईमुपालन, शेडनेट व पॉलीहाऊस अशा मध्यम मुदतीचे कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे ९ मे रोजी एका शासन आदेशाद्वारे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे.जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता या योजनेच्या पूर्वीच्या निकषाप्रमाणे सरसकट प्रति कुटुंब दीड लाख पर्यंत कर्जमाफी मिळणार आहे.

वाशिम : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गंत आता ईमुपालन, शेडनेट व पॉलीहाऊस अशा मध्यम मुदतीचे कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. यासंदर्भात शासनाने ९ मे रोजी जारी केलेले आदेश जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत, अशी माहिती वाशिमचे जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत १२ मार्च २०१८ रोजी विधानभवनावर लाँग मार्च काढण्यात आला होता. त्यावेळी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी सन २००१ ते सन २००९ पर्यंत थकीत असलेल्या, परंतू सन २००८ ते २००९ च्या कर्जमाफी योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकरी खातेदारांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ देण्यात येईल तसेच इमूपालन, शेडनेट, पॉलीहाऊस याबाबत थकीत असलेल्या कर्जाचासुद्धा समावेश करण्यात येईल, अशी घोषणा केली होती. त्या अनुषंगाने ९ मे रोजी एका शासन आदेशाद्वारे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. त्यानुसार १ एप्रिल २००१ ते ३१ मार्च २००९ पर्यंत उचल केलेल्या पीक, मध्यम मुदत कर्जाची ३० जून २०१६ रोजी थकीत झालेल्या रकमेतून परतफेड केलेली रक्कम वगळून, ३१ जुलै २०१७ पर्यंत मुद्दल व व्याजासह परतफेड न झालेल्या थकबाकीदार शेतकºयांना अल्प, अत्यल्प भूधारक याप्रकारे जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता या योजनेच्या पूर्वीच्या निकषाप्रमाणे सरसकट दीड लाखपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे. १ एप्रिल २००१ ते ३१ मार्च २०१६ पर्यंत इमूपालन, शेडनेट व पॉलीहाऊस यासाठी मध्यम मुदत कर्ज घेतलेल्या व अशा कर्जापैकी ३० जून २०१६ रोजी थकित झालेल्या रकमेतून परतफेड केलेली रक्कम वगळून ३१ जुलै २०१७ पर्यंतची मुद्दल व व्याजासह परतफेड न झालेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांचे अल्प, अत्यल्प भूधारक याप्रकारे जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता या योजनेच्या पूर्वीच्या निकषाप्रमाणे सरसकट प्रति कुटुंब दीड लाख पर्यंत कर्जमाफी मिळणार आहे. यासंदर्भात शासनाचे आदेश जिल्हाधिकारी, सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक, जिल्हा कोषागार अधिकाºयांना प्राप्त झाले आहेत. 

 छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची व्याप्ती वाढविण्यात आल्यासंदर्भात शासनाचे आदेश प्राप्त झाले आहेत. शासन आदेशानुसार व वरिष्ठांच्या सुचनेनुसार या निर्णयाची वाशिम जिल्ह्यात अंमलबजावणी केली जाईल.- रमेश कटके, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, वाशिम.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी