शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

कर्जमुक्त शेतकर्‍यांना मिळणार रब्बी पीक कर्ज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 00:54 IST

वाशिम: राज्य शासनाने घोषित केलेल्या कर्जमाफी योजनेतून कर्ज माफ झालेल्या शेतकर्‍यांना चालू रब्बी हंगामात पीक कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. तर दुसरीकडे आचारसंहितेमुळे चावडी वाचन न झालेल्या गावांमध्ये दुसर्‍या टप्प्यात चावडी वाचन केले जात आहे. चावडी वाचनानंतर या गावातील शेतकर्‍यांची यादी अद्ययावत केली जाणार आहे.

ठळक मुद्देपहिल्या टप्प्यात मध्यवर्ती बँकेचा समावेश दुसर्‍या टप्प्यात चावडी वाचन 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: राज्य शासनाने घोषित केलेल्या कर्जमाफी योजनेतून कर्ज माफ झालेल्या शेतकर्‍यांना चालू रब्बी हंगामात पीक कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. तर दुसरीकडे आचारसंहितेमुळे चावडी वाचन न झालेल्या गावांमध्ये दुसर्‍या टप्प्यात चावडी वाचन केले जात आहे. चावडी वाचनानंतर या गावातील शेतकर्‍यांची यादी अद्ययावत केली जाणार आहे.यावर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कर्जमाफीच्या मुद्यावरून राज्यभरातील विविध संघटना तसेच शेतकर्‍यांनी आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने सुकाणू समिती व शेतकरी संघटनांच्या नेत्यांशी चर्चा करीत कर्जमाफी जाहीर  केली. दीड लाख रुपयांची र्मयादा घालून कर्जमाफी योजनेची प्रक्रिया राबविण्यात आली. वाशिम जिल्हय़ात एकूण २ लाख ६0 हजार शेतकर्‍यांनी कर्जमाफीसंदर्भात ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख २७ हजार शेतकर्‍यांनी अंतिम मुदतीपर्यंत ऑनलाइन अर्ज भरले आहेत; पात्र शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी तसेच यादी अचूक करण्याच्या दृष्टिकोनातून पहिल्या टप्प्यात गावस्तरावर चावडी वाचन घेण्यात आले. चावडी वाचनातून अचूक ठरणार्‍या अर्जांची पडताळणी व किरकोळ दुरुस्त्या केल्यानंतर कर्जमाफी योजनेत पात्र शेतकर्‍यांचा समावेश केला जात आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पात्र शेतकरी घेतले असून, अचूक अर्ज असलेल्या शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ दिला जात आहे. १८ ऑक्टोबर रोजी कर्जमाफीस पात्र शेतकर्‍यांपैकी प्रातिनिधिक स्वरूपात ३३ शेतकर्‍यांचा पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते कर्जमाफी प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.  ३0 ऑक्टोबरपर्यंत जवळपास ५0 हजार शेतकर्‍यांना कर्जमाफी प्रमाणपत्र देण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे जवळपास ७९ हजार १३८ लाभार्थी असून, अचूक अर्ज असणार्‍या शेतकर्‍यांच्या बँक खात्यांची पडताळणी सुरू केली आहे. कर्जमाफीचा लाभ मिळल्यानंतर या शेतकर्‍यांना रब्बी हंगामात पीककर्ज उपलब्ध करून दिले जाईल. रब्बी हंगामात पीक कर्जाची उचल करणार्‍या शेतकर्‍यांची संख्या खरिपाच्या तुलनेत अत्यल्प असते. तथापि, रब्बी हंगामात पीक कर्जाची मागणी नोंदविल्यानंतर कर्जमुक्त झालेल्या शेतकर्‍यांना विहित अटी व शर्तीच्या अधीन राहून संबंधित बँकेतून पीक कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. दुसरीकडे राष्ट्रीयीकृत, खासगी, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या पात्र शेतकर्‍यांच्या बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक व अर्जांची पडताळणी दुसर्‍या टप्प्यात केली जाणार आहे. साधारणत: १५ नोव्हेंबरपर्यंत पात्र ठरलेल्या सर्व शेतकर्‍यांना कर्जमुक्ती प्रमाणपत्र दिले जाईल, अशी शक्यता जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी ‘लोकमत’शी बोलताना वर्तविली. 

चावडी वाचन .पहिल्या टप्प्यात निवडणूक आचारसंहिता नसलेल्या गावांत चावडी वाचन घेण्यात आले. आदर्श आचारसंहिता संपुष्टात आल्याने उर्वरित २७३ गावांत चावडी वाचन सुरू करण्यात आले आहे. लवकरच चावडी वाचनातून अद्ययावत यादी तयार केली जाणार आहे. त्यानंतर कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे.

कर्ज माफ झालेल्या शेतकर्‍यांना निश्‍चितच रब्बी हंगामात पीक कर्ज मिळणार आहे. शेतकर्‍यांनी संबंधित बँकेत तशी मागणी नोंदविल्यास कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. मध्यवर्ती बँकेच्या ५0 हजार शेतकर्‍यांना ३0 ऑक्टोबरपर्यंत कर्जमाफीचे प्रमाणपत्र देण्याचे नियोजन आहे.- रमेश कटके,जिल्हा उपनिबंधक, वाशिम 

टॅग्स :Farmerशेतकरी