शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

उंद्री प्रकल्पात बुडून शेतक-याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 20:29 IST

पथकाला १ तासाच्या अथक परिश्रमानंतर शेतक-याचा मृतदेह शोधण्यात यश आले.

कामरगाव (वाशिम) : कारंजा तालुक्यातील बांबर्डा शिवाराला लागून असलेल्या उंद्री प्रकल्पात सिंचनाचे पाईप काढण्यासाठी बांबर्डा कानकिरड गेलेल्या शेतक-याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना ५ जून रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. अनंत रामदास भेंडे असे मृतक शेतक-याचे नाव आहे. 

बांबर्डा कानकिरड येथील शेतकरी अनंत भेंडे हे उंद्री प्रकल्पात सिंचनाचे पाईप काढण्याकरीता गेले असता ते पाण्यात बुडाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शनी नागरिकांनी बांबर्डा येथील गावकºयांना दिली. घटनेची माहिती मिळताच कारंजा ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार धनंजय जगदाडे व धनज पोलिस स्टेशनचे ठाणेदार शिषिर मानकर यांनी तात्काळ आपल्या ताफ्यासह घटनास्थळ गाठले. सर्वधर्मआपतकालीन संस्था कारंजाच्या स्वयंसेवकांनी प्राथमिक शोध मोहीम राबविली. मात्र पाण्याची खोली अधिक असल्याने आपतकालीन पथकाला यश आले नाही. अखेर प्रशासनाने  पिंजर येथील संत गाडगेबाबा बचाव पथकास पाचारण केले.

या  पथकाला १ तासाच्या अथक परिश्रमानंतर शेतक-याचा मृतदेह शोधण्यात यश आले. बचाव पथकात दिपक सदाफळे, आशिक गुघडे, ऋषिकेश तायडे, मयुर जवके, ओम साबळे, ऋतिक सदाफळे, अंकुश सदाफळे, गोविंदा ढोके,यांचा समावेश होता. तर सर्वधर्मआपतकालीन पथकाचे शाम सवाई, ज्ञानेश्वर निंगोट, सतोंष घुले व भावेश गाडगे यांनी शोधमोहीमेत सहभाग नोंदविला. घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. मंडळ अधिकारी नायब तहसिलदार विनोद हरणे, आशा अदबाने, तलाठी घाटे, ग्रामसेवक दिलीप सकपाळ यांची यावेळी उपस्थिती होती. मृतक अनंत भेंडे हे बांबर्डा येथील सरपंच कांचन भेंडे यांचे पती आहेत. त्यांच्या मनमिळाउु स्वभावामुळे संपूर्ण तालुक्यात त्यांची वेगळी ओळख होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन बहिनी असा बराच मोठा आप्त परिवार आहे.

टॅग्स :washimवाशिम