शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

पालकाच्या वृक्ष संवर्धनातून कन्या होणार लखपती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 17:49 IST

मालेगाव: पर्यावरणाच्या संवर्धनासाठी मालेगाव तालुक्यातील बोरगाव ग्रामपंचायतने अतिशय आदर्श आणि स्तुत्य अशी कन्या वनसमृद्धी योजना यंदाच्या वर्षापासून राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

- अमोल कल्याणकरमालेगाव: पर्यावरणाच्या संवर्धनासाठी मालेगाव तालुक्यातील बोरगाव ग्रामपंचायतने अतिशय आदर्श आणि स्तुत्य अशी कन्या वनसमृद्धी योजना यंदाच्या वर्षापासून राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत कन्यारत्न असलेल्या पालकांनी १० वृक्षांची लागवड करून ते १९ वर्षे जगविल्यास त्यांच्या कन्येला १९ व्या वाढदिवशी एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत यंदा १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ दरम्यान जन्मलेल्या ४ कन्यांच्या पालकांची निवड होईल. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी विविध ग्रामपंचायती आपल्या क्षेत्रात वृक्ष लागवड आणि संवर्धनासाठी विविध उपक्रम राबवित आहेत. यात मालेगाव तालुक्यातील बोरगाव ग्रामपंचायतने यंदाच्या वर्षापासून कन्या वनसमृद्धी योजना राबविण्याचे ठरविले आहे. ग्रामसेवक एम. पी. वानखडे यांच्या संकल्पनेतून ही योजना राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत  गावात वृक्षांची संख्या वाढवून पर्यावरण संवर्धन करण्यात येणार आहे. यात  १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ या कालावधित कन्यारत्नाला जन्म दिलेल्या पालकांना १० वृक्ष लावून ते १९ वर्षे जगविण्यासाठी प्रोत्साहीत केले जाणार आहे. यात ५ फळझाडे आणि ५ पर्यावरण संतुलनीय झाडांचा समावेश राहणार आहे. या योजनेसाठी मुलीच्या जन्म प्रमाणपत्रासह, अल्प, अत्यल्प शेतीचा नमुना ८ अ, भुमीहीनांसाठी वृक्ष लागवडीस उपलब्ध जागेचे हमीपत्र आदि कागदपत्रे लाभार्थींकडून घेण्यात येणार आहेत. या योजनेतील लाभार्थींना ठरलेल्या रकमेचा धनादेश देण्यासाठी मालमत्ता उपकरातील ७० हजार रुपये, तसेच सरपंच वसंता लांडकर यांचे १२ हलार रुपये, उपसरपंच सदाशिव कालापाड, सदस्य बाबाराव लांडकर, सुरेंद्र गुडदे, सविता लांडकर, कडू लगड, ज्योती कव्हर, गिता शिंदे, कल्पना गुडदे यांच्याकडून प्रत्येकी २४०० रुपये मिळून एकूण १ लाख १ हजार २०० रुपये १९ वर्षांसाठी मुदतठेव म्हणून बँकेत जमा करण्यात येतील. ही रक्कम १९ वर्षांत चार लाखांच्यावर जाणार असून, याच रकमेतून वृक्ष लागवड करून ते जगविणाºया पालकांच्या कन्येला एक लाखाचा धनादेश देण्यात येईल.  एकाचवेळी दोन समस्यांवर नियंत्रणबोरगाव ग्रामपंचायतच्यावतीने राबविण्यात येणाºया कन्या वनसमृद्धी योजनेंतर्गत ४ पालकांची वृक्षलागवड आणि संवर्धनासाठी निवड करण्यात येणार असून, त्यांच्याकडून ४० झाडे लावून ती १९ वर्षे जगविण्यात येणार आहेत. या योजनेमुळे पर्यावरणाच्या समस्येसह स्त्रीभृण हत्येच्या समस्येवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे. त्यामुळे शासनाच्या वृक्ष लागवड योजनेसह बेटी बचाओ, बेटी पढाओ या अभियानालाही हातभार लागणार आहे. अशा प्रकारचा उपक्रम राबविणारी बोरगाव ग्रामपंचायत बहुधा राज्यातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे.

टॅग्स :washimवाशिमenvironmentवातावरण