शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

पालकाच्या वृक्ष संवर्धनातून कन्या होणार लखपती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 17:49 IST

मालेगाव: पर्यावरणाच्या संवर्धनासाठी मालेगाव तालुक्यातील बोरगाव ग्रामपंचायतने अतिशय आदर्श आणि स्तुत्य अशी कन्या वनसमृद्धी योजना यंदाच्या वर्षापासून राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

- अमोल कल्याणकरमालेगाव: पर्यावरणाच्या संवर्धनासाठी मालेगाव तालुक्यातील बोरगाव ग्रामपंचायतने अतिशय आदर्श आणि स्तुत्य अशी कन्या वनसमृद्धी योजना यंदाच्या वर्षापासून राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत कन्यारत्न असलेल्या पालकांनी १० वृक्षांची लागवड करून ते १९ वर्षे जगविल्यास त्यांच्या कन्येला १९ व्या वाढदिवशी एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत यंदा १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ दरम्यान जन्मलेल्या ४ कन्यांच्या पालकांची निवड होईल. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी विविध ग्रामपंचायती आपल्या क्षेत्रात वृक्ष लागवड आणि संवर्धनासाठी विविध उपक्रम राबवित आहेत. यात मालेगाव तालुक्यातील बोरगाव ग्रामपंचायतने यंदाच्या वर्षापासून कन्या वनसमृद्धी योजना राबविण्याचे ठरविले आहे. ग्रामसेवक एम. पी. वानखडे यांच्या संकल्पनेतून ही योजना राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत  गावात वृक्षांची संख्या वाढवून पर्यावरण संवर्धन करण्यात येणार आहे. यात  १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ या कालावधित कन्यारत्नाला जन्म दिलेल्या पालकांना १० वृक्ष लावून ते १९ वर्षे जगविण्यासाठी प्रोत्साहीत केले जाणार आहे. यात ५ फळझाडे आणि ५ पर्यावरण संतुलनीय झाडांचा समावेश राहणार आहे. या योजनेसाठी मुलीच्या जन्म प्रमाणपत्रासह, अल्प, अत्यल्प शेतीचा नमुना ८ अ, भुमीहीनांसाठी वृक्ष लागवडीस उपलब्ध जागेचे हमीपत्र आदि कागदपत्रे लाभार्थींकडून घेण्यात येणार आहेत. या योजनेतील लाभार्थींना ठरलेल्या रकमेचा धनादेश देण्यासाठी मालमत्ता उपकरातील ७० हजार रुपये, तसेच सरपंच वसंता लांडकर यांचे १२ हलार रुपये, उपसरपंच सदाशिव कालापाड, सदस्य बाबाराव लांडकर, सुरेंद्र गुडदे, सविता लांडकर, कडू लगड, ज्योती कव्हर, गिता शिंदे, कल्पना गुडदे यांच्याकडून प्रत्येकी २४०० रुपये मिळून एकूण १ लाख १ हजार २०० रुपये १९ वर्षांसाठी मुदतठेव म्हणून बँकेत जमा करण्यात येतील. ही रक्कम १९ वर्षांत चार लाखांच्यावर जाणार असून, याच रकमेतून वृक्ष लागवड करून ते जगविणाºया पालकांच्या कन्येला एक लाखाचा धनादेश देण्यात येईल.  एकाचवेळी दोन समस्यांवर नियंत्रणबोरगाव ग्रामपंचायतच्यावतीने राबविण्यात येणाºया कन्या वनसमृद्धी योजनेंतर्गत ४ पालकांची वृक्षलागवड आणि संवर्धनासाठी निवड करण्यात येणार असून, त्यांच्याकडून ४० झाडे लावून ती १९ वर्षे जगविण्यात येणार आहेत. या योजनेमुळे पर्यावरणाच्या समस्येसह स्त्रीभृण हत्येच्या समस्येवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे. त्यामुळे शासनाच्या वृक्ष लागवड योजनेसह बेटी बचाओ, बेटी पढाओ या अभियानालाही हातभार लागणार आहे. अशा प्रकारचा उपक्रम राबविणारी बोरगाव ग्रामपंचायत बहुधा राज्यातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे.

टॅग्स :washimवाशिमenvironmentवातावरण