शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

मानोरा  तालुक्यातील पाळोदी, ढोणी, उज्वलनगर गावांत भीषण पाणी टंचाई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 13:55 IST

मानोरा  : तालुक्यातील पाळोदी, ढोणी, उज्वलनगर व परिसरताील गावांना भिषण पाणी टंचाईने ग्रासले आहे. पाण्यासाठी महिला पुरुष रात्रीचा दिवस करीत आहे.

ठळक मुद्देपाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाकडे पाठविलेले टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठीचे प्रस्ताव महिन्यापासुन धुळखात आहे. गावे टेकडीवर असल्यामुळे या गावांना पाणी पुरवठा होत नाही ही योजना केवळ शोभेची वस्तु बनली आहे. पाणी प्रश्न सोडविण्यासाठी पं.स.सदस्या रेखा पडवाळ जि.प.सदस्य सचिन रोकडे हे आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.

मानोरा  : तालुक्यातील पाळोदी, ढोणी, उज्वलनगर व परिसरताील गावांना भिषण पाणी टंचाईने ग्रासले आहे. पाण्यासाठी महिला पुरुष रात्रीचा दिवस करीत आहे. विहीरी कोरड्या  पडल्या, पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाकडे पाठविलेले टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठीचे प्रस्ताव महिन्यापासुन धुळखात आहे. पाणी प्रश्न सोडविण्यासाठी पं.स.सदस्या रेखा पडवाळ जि.प.सदस्य सचिन रोकडे हे आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.

पाळोदी, ढोणी, उज्वलनगर  व्यतिरिक्त इतरही गावांना पाणी समस्येने ग्रासले आहे. गावातील विहीरींनी तळ गाठला आहे. उन्हाळ्यापुर्वी हिवाळ्याच कोरड्या पडल्या आहे. त्यामुळे घोटभर पाण्यासाठी महिलांना रात्रीचा दिवस करावा लागत आहे. गावाची तहान भागविण्यासाठी अठ्ठाविस गावे पाणी पुरवठा योजनाचे पाणी देण्यात आले. परंतु गावे टेकडीवर असल्यामुळे या गावांना पाणी पुरवठा होत नाही ही योजना केवळ शोभेची वस्तु बनली आहे. जलमय संकल्नेतुन या गावाची वाटर न्युट्रल म्हणुन नोंद आहे.परंतु याबाबत शासनाची कमालीची  दिशाभुल झाली आहे. ढोणी या गावात जलयुक्त शिवार योजने अंतर्गत एकही काम झाले नाही तरी सुध्दा वाटर न्युट्रल म्हणुन ढोणी, गावाची नोंद आहे.सदर गावाची तहान भागविण्यासाठी एमआरईजीएस मधुन  सार्वजनिक विहीरी उज्वलनगर , ढोणी येथे केल्या आहेत. परंतु विहीरींना गाावला विहीरीवरुन पाणी पुरवठा  करण्यासाठी आदिवासी उपाय योजने अंतर्गत प्रस्ताव पाठवले आहे. राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत  प्रस्तावीत आहे. तिन्ही गावे कायम टंचाईग्रस्त असल्यामुळे  किमान २० वर्षापासून  या गावानां टँकरने पाणी पुरवठा होत आहे. या गावी सुध्दा प्रस्तावित टँकरने पाणी पुरवठा  प्रस्तावीत आहे. या गावाचा पाणी प्रश्न कायम स्वरुपी सोडविण्याकरिता लोकप्रतिनिधी लक्ष देण्याची मागणी नागरिकांच्यावतीने होत आहे. 

टंचाईग्रसत गावे वाटर न्युट्रलमध्ये कसे - सचिन रोकडे

पाळोदी, ढोणी, उजवलनगर यासह परिसरातील गावांना भिषण पाणी टंचाईने ग्रासले आहे. तरी सुध्दा शासनाची दिशाभुल करुन वाटर न्युट्रल म्हणुन या गावाची नोंद आहे. गेल्या २० वर्षापासुन टँकरने पाणी पुरवठा होत असल्यामुळे ही गावे वाटर न्युट्रल कशी असा प्रश्न सचिन रोकडे यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी