शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

मानोरा  तालुक्यातील पाळोदी, ढोणी, उज्वलनगर गावांत भीषण पाणी टंचाई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 13:55 IST

मानोरा  : तालुक्यातील पाळोदी, ढोणी, उज्वलनगर व परिसरताील गावांना भिषण पाणी टंचाईने ग्रासले आहे. पाण्यासाठी महिला पुरुष रात्रीचा दिवस करीत आहे.

ठळक मुद्देपाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाकडे पाठविलेले टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठीचे प्रस्ताव महिन्यापासुन धुळखात आहे. गावे टेकडीवर असल्यामुळे या गावांना पाणी पुरवठा होत नाही ही योजना केवळ शोभेची वस्तु बनली आहे. पाणी प्रश्न सोडविण्यासाठी पं.स.सदस्या रेखा पडवाळ जि.प.सदस्य सचिन रोकडे हे आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.

मानोरा  : तालुक्यातील पाळोदी, ढोणी, उज्वलनगर व परिसरताील गावांना भिषण पाणी टंचाईने ग्रासले आहे. पाण्यासाठी महिला पुरुष रात्रीचा दिवस करीत आहे. विहीरी कोरड्या  पडल्या, पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाकडे पाठविलेले टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठीचे प्रस्ताव महिन्यापासुन धुळखात आहे. पाणी प्रश्न सोडविण्यासाठी पं.स.सदस्या रेखा पडवाळ जि.प.सदस्य सचिन रोकडे हे आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.

पाळोदी, ढोणी, उज्वलनगर  व्यतिरिक्त इतरही गावांना पाणी समस्येने ग्रासले आहे. गावातील विहीरींनी तळ गाठला आहे. उन्हाळ्यापुर्वी हिवाळ्याच कोरड्या पडल्या आहे. त्यामुळे घोटभर पाण्यासाठी महिलांना रात्रीचा दिवस करावा लागत आहे. गावाची तहान भागविण्यासाठी अठ्ठाविस गावे पाणी पुरवठा योजनाचे पाणी देण्यात आले. परंतु गावे टेकडीवर असल्यामुळे या गावांना पाणी पुरवठा होत नाही ही योजना केवळ शोभेची वस्तु बनली आहे. जलमय संकल्नेतुन या गावाची वाटर न्युट्रल म्हणुन नोंद आहे.परंतु याबाबत शासनाची कमालीची  दिशाभुल झाली आहे. ढोणी या गावात जलयुक्त शिवार योजने अंतर्गत एकही काम झाले नाही तरी सुध्दा वाटर न्युट्रल म्हणुन ढोणी, गावाची नोंद आहे.सदर गावाची तहान भागविण्यासाठी एमआरईजीएस मधुन  सार्वजनिक विहीरी उज्वलनगर , ढोणी येथे केल्या आहेत. परंतु विहीरींना गाावला विहीरीवरुन पाणी पुरवठा  करण्यासाठी आदिवासी उपाय योजने अंतर्गत प्रस्ताव पाठवले आहे. राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत  प्रस्तावीत आहे. तिन्ही गावे कायम टंचाईग्रस्त असल्यामुळे  किमान २० वर्षापासून  या गावानां टँकरने पाणी पुरवठा होत आहे. या गावी सुध्दा प्रस्तावित टँकरने पाणी पुरवठा  प्रस्तावीत आहे. या गावाचा पाणी प्रश्न कायम स्वरुपी सोडविण्याकरिता लोकप्रतिनिधी लक्ष देण्याची मागणी नागरिकांच्यावतीने होत आहे. 

टंचाईग्रसत गावे वाटर न्युट्रलमध्ये कसे - सचिन रोकडे

पाळोदी, ढोणी, उजवलनगर यासह परिसरातील गावांना भिषण पाणी टंचाईने ग्रासले आहे. तरी सुध्दा शासनाची दिशाभुल करुन वाटर न्युट्रल म्हणुन या गावाची नोंद आहे. गेल्या २० वर्षापासुन टँकरने पाणी पुरवठा होत असल्यामुळे ही गावे वाटर न्युट्रल कशी असा प्रश्न सचिन रोकडे यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी