शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मानोरा  तालुक्यातील पाळोदी, ढोणी, उज्वलनगर गावांत भीषण पाणी टंचाई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 13:55 IST

मानोरा  : तालुक्यातील पाळोदी, ढोणी, उज्वलनगर व परिसरताील गावांना भिषण पाणी टंचाईने ग्रासले आहे. पाण्यासाठी महिला पुरुष रात्रीचा दिवस करीत आहे.

ठळक मुद्देपाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाकडे पाठविलेले टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठीचे प्रस्ताव महिन्यापासुन धुळखात आहे. गावे टेकडीवर असल्यामुळे या गावांना पाणी पुरवठा होत नाही ही योजना केवळ शोभेची वस्तु बनली आहे. पाणी प्रश्न सोडविण्यासाठी पं.स.सदस्या रेखा पडवाळ जि.प.सदस्य सचिन रोकडे हे आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.

मानोरा  : तालुक्यातील पाळोदी, ढोणी, उज्वलनगर व परिसरताील गावांना भिषण पाणी टंचाईने ग्रासले आहे. पाण्यासाठी महिला पुरुष रात्रीचा दिवस करीत आहे. विहीरी कोरड्या  पडल्या, पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाकडे पाठविलेले टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठीचे प्रस्ताव महिन्यापासुन धुळखात आहे. पाणी प्रश्न सोडविण्यासाठी पं.स.सदस्या रेखा पडवाळ जि.प.सदस्य सचिन रोकडे हे आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.

पाळोदी, ढोणी, उज्वलनगर  व्यतिरिक्त इतरही गावांना पाणी समस्येने ग्रासले आहे. गावातील विहीरींनी तळ गाठला आहे. उन्हाळ्यापुर्वी हिवाळ्याच कोरड्या पडल्या आहे. त्यामुळे घोटभर पाण्यासाठी महिलांना रात्रीचा दिवस करावा लागत आहे. गावाची तहान भागविण्यासाठी अठ्ठाविस गावे पाणी पुरवठा योजनाचे पाणी देण्यात आले. परंतु गावे टेकडीवर असल्यामुळे या गावांना पाणी पुरवठा होत नाही ही योजना केवळ शोभेची वस्तु बनली आहे. जलमय संकल्नेतुन या गावाची वाटर न्युट्रल म्हणुन नोंद आहे.परंतु याबाबत शासनाची कमालीची  दिशाभुल झाली आहे. ढोणी या गावात जलयुक्त शिवार योजने अंतर्गत एकही काम झाले नाही तरी सुध्दा वाटर न्युट्रल म्हणुन ढोणी, गावाची नोंद आहे.सदर गावाची तहान भागविण्यासाठी एमआरईजीएस मधुन  सार्वजनिक विहीरी उज्वलनगर , ढोणी येथे केल्या आहेत. परंतु विहीरींना गाावला विहीरीवरुन पाणी पुरवठा  करण्यासाठी आदिवासी उपाय योजने अंतर्गत प्रस्ताव पाठवले आहे. राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत  प्रस्तावीत आहे. तिन्ही गावे कायम टंचाईग्रस्त असल्यामुळे  किमान २० वर्षापासून  या गावानां टँकरने पाणी पुरवठा होत आहे. या गावी सुध्दा प्रस्तावित टँकरने पाणी पुरवठा  प्रस्तावीत आहे. या गावाचा पाणी प्रश्न कायम स्वरुपी सोडविण्याकरिता लोकप्रतिनिधी लक्ष देण्याची मागणी नागरिकांच्यावतीने होत आहे. 

टंचाईग्रसत गावे वाटर न्युट्रलमध्ये कसे - सचिन रोकडे

पाळोदी, ढोणी, उजवलनगर यासह परिसरातील गावांना भिषण पाणी टंचाईने ग्रासले आहे. तरी सुध्दा शासनाची दिशाभुल करुन वाटर न्युट्रल म्हणुन या गावाची नोंद आहे. गेल्या २० वर्षापासुन टँकरने पाणी पुरवठा होत असल्यामुळे ही गावे वाटर न्युट्रल कशी असा प्रश्न सचिन रोकडे यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी