शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

धोक्याची घंटा : वाशिम जिल्हय़ात भुजल पातळीत चिंताजनक घट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 01:14 IST

वाशिम : गतवर्षीचा अपवाद वगळता गेल्या पाच वर्षात जिल्ह्यातील पावसाने सरासरी पातळी न ओलांडल्याने, तसेच सतत सुरू असलेल्या अर्मयाद पाणी उपशामुळे  जिल्ह्यातील भुजल पातळीत चिंताजनक घट झाली आहे. कारंजा, वाशिम, मंगरुळपीर, मानोरा, मालेगाव आणि रिसोड या सहा तालुक्यांच्या भूजल पातळीत लक्षणीय घटली आहे.

ठळक मुद्देपाच वर्षांत सरासरी १.७६ मीटरने खालावली पाणीपातळी

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गतवर्षीचा अपवाद वगळता गेल्या पाच वर्षात जिल्ह्यातील पावसाने सरासरी पातळी न ओलांडल्याने, तसेच सतत सुरू असलेल्या अर्मयाद पाणी उपशामुळे  जिल्ह्यातील भुजल पातळीत चिंताजनक घट झाली आहे. कारंजा, वाशिम, मंगरुळपीर, मानोरा, मालेगाव आणि रिसोड या सहा तालुक्यांच्या भूजल पातळीत लक्षणीय घटली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या पाहणीत जिल्ह्यातील भूजल पातळीत मागील पाच वर्षांत सरासरी १.७६ मीटरने अर्थात पाच फुटाहून अधिक घटली आहे. अनिबर्ंध पाणी उपशामुळे भूजल पातळी घटत असल्याचे मत तज्ज्ञांचे आहे.जिल्ह्यात सरासरी ७९८.७0 मिलीमिटर पाऊस पडतो. मात्र, गेल्या काही वर्षांपासून यात अनियमितता दिसून येते. त्यामुळे जिल्ह्याची पर्जन्यमानाची सरासरी कमी-अधिक होऊ लागली. मात्र सर्व धरणांमध्ये पाणीसाठा पुरेसा होत असल्याने फारशी पाणी टंचाई जाणवत नाही. वाशिम जिल्ह्याचे भूगर्भीय क्षेत्र मुख्यत: दख्खन बस्तर लाव्हा या प्रकारच्या खडकाचे आहे; पूर्णपणे बेसॉल्टने आच्छादित असलेल्या या जिल्ह्यात काही ठिकाणी विघटित, तर काही ठिकाणी व्हेसिक्युकर झिओलिटिक प्रस्तराची झीज झाली आहे. यामुळे पडलेल्या भेगांमुळे सच्छिद्रता निर्माण होऊन भूजल साठा होण्यास मदत होते; परंतु  पावसाची प्रत्यक्ष सरासरी ही कागदावर मोठी दिसत असली तरी, गेल्या ५ वर्षांत जमिनीत मुरणारा पाऊस फारसा जिल्ह्यात पडलेला नाही. पडणार्‍या पावसाचा कालावधी कमी झाल्याने, तसेच पडलेल्या पावसाचे पाणी वेगाने वाहून जाते. याचा परिणाम भूजल पातळीवर होऊ लागला आहे. जिल्हा भूजल सर्वेक्षण विभागाच्यावतीने जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील मिळून प्रायोगिक तत्वावर ७९  विहिरींचे सर्वेक्षण करण्यात आले. यात २0१३ ते २0१८ ची सरासरी पाणी पातळी आणि जानेवारी २0१८ मध्ये केलेल्या सर्वेक्षणात भूजल पातळी सरासरी १.७६ मीटरने घटल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाच्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. त्यामध्ये कारंजा २.४१, रिसोड १.१८, मंगरुळपीर १.५३, वाशिम १.९३, मालेगाव १.३३ आणि मानोरा २.२३ असे भूजल पातळीचे तालुकानिहाय घटलेले प्रमाण आहे. भूजलपातळी वाढवण्यासाठी ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ अभियानाबरोबरच पाणी उपशावर निबर्ंध घालण्याची आवश्यकता आहे. भूजल पातळी घटल्याचा सर्वाधिक फटका बोअरवेल खोदाईला बसला आहे. यापूर्वी जिल्ह्याच्या कोणत्याही भागात सरासरी १५0 ते २00 फुटांपर्यत बोअरवेल खोदाई केली जात होती, पण गेल्या दोन वर्षांपासून ही खोदाई ३00 फुटांपयर्ंत पोहोचली आहे.

कारंजातील स्थिती सर्वात गंभीर!शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानासह कारंजा तालुक्यात पाणी फाऊंडेशनच्यावतीने गतवर्षी अर्थात २0१७ मध्ये लोकसहभाग आणि श्रमदानातून जलसंधारणाची मोठय़ा प्रमाणात कामे करण्यात आली आहेत. तथापि, याच तालुक्यातील भूजल पातळी ही जिल्ह्यात सर्वाधिक प्रमाणात घटली असल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाच्या पाहणीत स्पष्ट झाले आहे. प्रत्यक्ष जानेवारी २0१८ मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार या तालुक्यातील भूजल पातळी मागील पाच वर्षांत सरासरी २.४१ मीटरने घटली आहे. त्यामुळे या तालुक्यात झालेली जलसंधारणाची कामे उपयुक्त आहेत की नाही, ही बाब विचार करण्यास भाग पाडणारी आहे.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी