शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

धोक्याची घंटा : वाशिम जिल्हय़ात भुजल पातळीत चिंताजनक घट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 01:14 IST

वाशिम : गतवर्षीचा अपवाद वगळता गेल्या पाच वर्षात जिल्ह्यातील पावसाने सरासरी पातळी न ओलांडल्याने, तसेच सतत सुरू असलेल्या अर्मयाद पाणी उपशामुळे  जिल्ह्यातील भुजल पातळीत चिंताजनक घट झाली आहे. कारंजा, वाशिम, मंगरुळपीर, मानोरा, मालेगाव आणि रिसोड या सहा तालुक्यांच्या भूजल पातळीत लक्षणीय घटली आहे.

ठळक मुद्देपाच वर्षांत सरासरी १.७६ मीटरने खालावली पाणीपातळी

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गतवर्षीचा अपवाद वगळता गेल्या पाच वर्षात जिल्ह्यातील पावसाने सरासरी पातळी न ओलांडल्याने, तसेच सतत सुरू असलेल्या अर्मयाद पाणी उपशामुळे  जिल्ह्यातील भुजल पातळीत चिंताजनक घट झाली आहे. कारंजा, वाशिम, मंगरुळपीर, मानोरा, मालेगाव आणि रिसोड या सहा तालुक्यांच्या भूजल पातळीत लक्षणीय घटली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या पाहणीत जिल्ह्यातील भूजल पातळीत मागील पाच वर्षांत सरासरी १.७६ मीटरने अर्थात पाच फुटाहून अधिक घटली आहे. अनिबर्ंध पाणी उपशामुळे भूजल पातळी घटत असल्याचे मत तज्ज्ञांचे आहे.जिल्ह्यात सरासरी ७९८.७0 मिलीमिटर पाऊस पडतो. मात्र, गेल्या काही वर्षांपासून यात अनियमितता दिसून येते. त्यामुळे जिल्ह्याची पर्जन्यमानाची सरासरी कमी-अधिक होऊ लागली. मात्र सर्व धरणांमध्ये पाणीसाठा पुरेसा होत असल्याने फारशी पाणी टंचाई जाणवत नाही. वाशिम जिल्ह्याचे भूगर्भीय क्षेत्र मुख्यत: दख्खन बस्तर लाव्हा या प्रकारच्या खडकाचे आहे; पूर्णपणे बेसॉल्टने आच्छादित असलेल्या या जिल्ह्यात काही ठिकाणी विघटित, तर काही ठिकाणी व्हेसिक्युकर झिओलिटिक प्रस्तराची झीज झाली आहे. यामुळे पडलेल्या भेगांमुळे सच्छिद्रता निर्माण होऊन भूजल साठा होण्यास मदत होते; परंतु  पावसाची प्रत्यक्ष सरासरी ही कागदावर मोठी दिसत असली तरी, गेल्या ५ वर्षांत जमिनीत मुरणारा पाऊस फारसा जिल्ह्यात पडलेला नाही. पडणार्‍या पावसाचा कालावधी कमी झाल्याने, तसेच पडलेल्या पावसाचे पाणी वेगाने वाहून जाते. याचा परिणाम भूजल पातळीवर होऊ लागला आहे. जिल्हा भूजल सर्वेक्षण विभागाच्यावतीने जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील मिळून प्रायोगिक तत्वावर ७९  विहिरींचे सर्वेक्षण करण्यात आले. यात २0१३ ते २0१८ ची सरासरी पाणी पातळी आणि जानेवारी २0१८ मध्ये केलेल्या सर्वेक्षणात भूजल पातळी सरासरी १.७६ मीटरने घटल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाच्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. त्यामध्ये कारंजा २.४१, रिसोड १.१८, मंगरुळपीर १.५३, वाशिम १.९३, मालेगाव १.३३ आणि मानोरा २.२३ असे भूजल पातळीचे तालुकानिहाय घटलेले प्रमाण आहे. भूजलपातळी वाढवण्यासाठी ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ अभियानाबरोबरच पाणी उपशावर निबर्ंध घालण्याची आवश्यकता आहे. भूजल पातळी घटल्याचा सर्वाधिक फटका बोअरवेल खोदाईला बसला आहे. यापूर्वी जिल्ह्याच्या कोणत्याही भागात सरासरी १५0 ते २00 फुटांपर्यत बोअरवेल खोदाई केली जात होती, पण गेल्या दोन वर्षांपासून ही खोदाई ३00 फुटांपयर्ंत पोहोचली आहे.

कारंजातील स्थिती सर्वात गंभीर!शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानासह कारंजा तालुक्यात पाणी फाऊंडेशनच्यावतीने गतवर्षी अर्थात २0१७ मध्ये लोकसहभाग आणि श्रमदानातून जलसंधारणाची मोठय़ा प्रमाणात कामे करण्यात आली आहेत. तथापि, याच तालुक्यातील भूजल पातळी ही जिल्ह्यात सर्वाधिक प्रमाणात घटली असल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाच्या पाहणीत स्पष्ट झाले आहे. प्रत्यक्ष जानेवारी २0१८ मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार या तालुक्यातील भूजल पातळी मागील पाच वर्षांत सरासरी २.४१ मीटरने घटली आहे. त्यामुळे या तालुक्यात झालेली जलसंधारणाची कामे उपयुक्त आहेत की नाही, ही बाब विचार करण्यास भाग पाडणारी आहे.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी