शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
4
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
5
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
6
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
7
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
8
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
9
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
10
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
11
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
12
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
13
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
14
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
15
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
16
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
17
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
18
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
19
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
20
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त

वाशिम जिल्ह्यातील धरणांची स्थिती गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 13:44 IST

जिल्ह्यातील अडाण प्रकल्प वगळता इतर दोन मध्यम आणि १२३ लघू प्रकल्पांची स्थिती अत्यंत विदारक आहे.

ठळक मुद्दे जिल्ह्यातील निम्म्या धरणांनी तळ गाठायला सुरुवात केली.जिल्ह्यात गत १० वर्षानंतर प्रथमच अत्यंत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.वाशिम जिल्ह्यामधील ३ मध्यम आणि १२३ लघू प्रकल्पांपैकी निम्म्या प्रकल्पांतील मृतसाठ्याचेही बाष्पीभवन .

वाशिम: जिल्ह्यातील अडाण प्रकल्प वगळता इतर दोन मध्यम आणि १२३ लघू प्रकल्पांची स्थिती अत्यंत विदारक आहे. निम्म्याहून अधिक धरणांत मृतसाठाही उरला नसून, जनावरांच्या पिण्यासाठीही पाणी मिळेनासे झाले आहे. केवळ गाळ उरलेले हे प्रकल्प पुन्हा भरण्यासाठी आता पुढील पावसाळ्यात वार्षिक सरासरीपेक्षा खूप अधिक प्रमाणात पाऊस पडण्याचीच गरज आहे. वाशिम जिल्ह्यात गतवर्षीच्या पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या केवळ ८४ टक्के पाऊस पडला. त्यामुुळे धरणांत मुबलक जलसाठा झाला नाही. परिणामी हिवाळ्याच्या मध्यातच जिल्ह्यातील निम्म्या धरणांनी तळ गाठायला सुरुवात केली. त्यामुळे जिल्ह्यात गत १० वर्षानंतर प्रथमच अत्यंत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यातच उन्हाचा पारा ४३ अशांच्या वर गेल्याने वाशिम जिल्ह्यामधील ३ मध्यम आणि १२३ लघू प्रकल्पांपैकी निम्म्या प्रकल्पांतील मृतसाठ्याचेही बाष्पीभवन होऊन आता या धरणांत केवळ ओला गाळच उरला आहे. त्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची समस्याही अभूतपूर्व भीषण झाली आहे. मंगरुळपीर शहराला पाणी पुरवठा करणारे मोतसावंगा धरण, मालेगाव शहराला पाणी पुरवठा करणारे कुरळा धरण, सोनल धरण अशा काही महत्त्वाच्या धरणांसह अनेक लघू प्रकल्पांत गाळच उरला आहे. त्यातच वाशिम तालुक्यातील सुपखेला येथील धरण, तर पूर्ण कोरडेच पडले असून, यातील गाळही सुकला आहे. त्यामुळे परिसरातील जनावरांचे पाण्याअभावी अतोनात हाल होत आहेत.

टॅग्स :washimवाशिमDamधरण