शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
3
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
4
देशातील मुस्लिमांना दाबले जाते, म्हणून पहलगाम हल्ला झाला; रॉबर्ड वाड्रांचे धक्कादायक वक्तव्य
5
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
6
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
7
Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
9
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
10
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
11
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
12
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
15
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
16
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
17
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
18
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
19
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
20
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!

वाशिम जिल्ह्यातील धरणांची स्थिती गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 13:44 IST

जिल्ह्यातील अडाण प्रकल्प वगळता इतर दोन मध्यम आणि १२३ लघू प्रकल्पांची स्थिती अत्यंत विदारक आहे.

ठळक मुद्दे जिल्ह्यातील निम्म्या धरणांनी तळ गाठायला सुरुवात केली.जिल्ह्यात गत १० वर्षानंतर प्रथमच अत्यंत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.वाशिम जिल्ह्यामधील ३ मध्यम आणि १२३ लघू प्रकल्पांपैकी निम्म्या प्रकल्पांतील मृतसाठ्याचेही बाष्पीभवन .

वाशिम: जिल्ह्यातील अडाण प्रकल्प वगळता इतर दोन मध्यम आणि १२३ लघू प्रकल्पांची स्थिती अत्यंत विदारक आहे. निम्म्याहून अधिक धरणांत मृतसाठाही उरला नसून, जनावरांच्या पिण्यासाठीही पाणी मिळेनासे झाले आहे. केवळ गाळ उरलेले हे प्रकल्प पुन्हा भरण्यासाठी आता पुढील पावसाळ्यात वार्षिक सरासरीपेक्षा खूप अधिक प्रमाणात पाऊस पडण्याचीच गरज आहे. वाशिम जिल्ह्यात गतवर्षीच्या पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या केवळ ८४ टक्के पाऊस पडला. त्यामुुळे धरणांत मुबलक जलसाठा झाला नाही. परिणामी हिवाळ्याच्या मध्यातच जिल्ह्यातील निम्म्या धरणांनी तळ गाठायला सुरुवात केली. त्यामुळे जिल्ह्यात गत १० वर्षानंतर प्रथमच अत्यंत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यातच उन्हाचा पारा ४३ अशांच्या वर गेल्याने वाशिम जिल्ह्यामधील ३ मध्यम आणि १२३ लघू प्रकल्पांपैकी निम्म्या प्रकल्पांतील मृतसाठ्याचेही बाष्पीभवन होऊन आता या धरणांत केवळ ओला गाळच उरला आहे. त्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची समस्याही अभूतपूर्व भीषण झाली आहे. मंगरुळपीर शहराला पाणी पुरवठा करणारे मोतसावंगा धरण, मालेगाव शहराला पाणी पुरवठा करणारे कुरळा धरण, सोनल धरण अशा काही महत्त्वाच्या धरणांसह अनेक लघू प्रकल्पांत गाळच उरला आहे. त्यातच वाशिम तालुक्यातील सुपखेला येथील धरण, तर पूर्ण कोरडेच पडले असून, यातील गाळही सुकला आहे. त्यामुळे परिसरातील जनावरांचे पाण्याअभावी अतोनात हाल होत आहेत.

टॅग्स :washimवाशिमDamधरण