शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
7
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
8
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
9
ज्योतिषानं सांगितलेली २ भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
10
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
11
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
12
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
13
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
14
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
15
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
16
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
17
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
18
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
19
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
20
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती

भाजीबाजारात गर्दी कायम; हर्रासी बंद करण्याचा व्यापाऱ्यांचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 12:44 IST

४ एप्रिलपासून हर्राशी बंद करण्याचा निर्णय व्यापारी, आडतदारांनी घेतला. 

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन : जीवनावश्यक वस्तू म्हणून भाजीपाला हर्राशी शिरपूर येथील गुजरी भागात दररोज सुरू आहे. मात्र, या ठिकाणी नागरिकांची गर्दी होत असल्याने शनिवार, ४ एप्रिलपासून हर्राशी बंद करण्याचा निर्णय व्यापारी, आडतदारांनी घेतला. कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संचारबंदी लागू केलेली आहे. जिल्ह्यातील आठवडी बाजारही रद्द केले असून, गर्दी होऊ नये म्हणून भाजीबाजार वेगवेगळ्या ठिकाणी भरविण्यात येत आहे. या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळण्याच्या सूचनाही जिल्हा प्रशासनाने नागरिकांना दिलेल्या आहेत.  या सूचनांची अंमलबजावणी शिरपूर येथे होत नसल्याचे ३ एप्रिल रोजीदेखील भाजीपाला हर्रासी करताना दिसून आले. मालेगाव तालुक्यातील सर्वात मोठी व्यापारपेठ म्हणून शिरपूरची ओळख आहे. जिल्ह्यात भाजीपाला उत्पादनासाठी शिरपूर ओळखले जात असून, येथे दररोज भाजीपाला हर्रासी केली जाते. बुधवारला आठवडी बाजार असतो. जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांच्या निर्देशानुसार आठवडी बाजार पूर्णत: बंद आहे. गुजरी भागात ३० मार्चपर्यंत भाजीपालावर्गीय वस्तूची हर्राशी केली जात होती. मात्र तेथील होणारी गर्दी धोकादायक वाटत असल्याने गावाबाहेरील आसेगाव रोडस्थित आठवडी बाजारच्या जागेत ३१ मार्चपासून हर्राशी सुरू केली. तेथेही व्यापारी व नागरिकांकडून भाजीपाला खरेदीसाठी मोठी गर्दी होऊ लागली. हे लक्षात घेऊन आठवडी बाजारात दोन ठिकाणी ५० फुटाच्या अंतरावर भाजीपाला हर्राशी करण्याच्या सूचना स्थानिक दक्षता समितीने दिल्या. मात्र तरीसुद्धा ३ एप्रिल रोजी भाजीपाला हर्राशी वेळी मोठी गर्दी झाली. येथे सोशल डिस्टन्सिंगचा कोणताही नियम पाळण्यात आला नाही. नागरिकांच्या वाढत्या गर्दीचा धोका लक्षात घेऊन भाजीपाला आडतदार विकास चोपडे, संजय बाविस्कर यांनी भाजीपाला हर्राशी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून सदर निर्णयाची अंमलबजावणी शनिवार, ४ एप्रिलपासून करणार असल्याचे विकास चोपडे यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैन