शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

भाजीबाजारात गर्दी कायम; हर्रासी बंद करण्याचा व्यापाऱ्यांचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 12:44 IST

४ एप्रिलपासून हर्राशी बंद करण्याचा निर्णय व्यापारी, आडतदारांनी घेतला. 

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन : जीवनावश्यक वस्तू म्हणून भाजीपाला हर्राशी शिरपूर येथील गुजरी भागात दररोज सुरू आहे. मात्र, या ठिकाणी नागरिकांची गर्दी होत असल्याने शनिवार, ४ एप्रिलपासून हर्राशी बंद करण्याचा निर्णय व्यापारी, आडतदारांनी घेतला. कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संचारबंदी लागू केलेली आहे. जिल्ह्यातील आठवडी बाजारही रद्द केले असून, गर्दी होऊ नये म्हणून भाजीबाजार वेगवेगळ्या ठिकाणी भरविण्यात येत आहे. या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळण्याच्या सूचनाही जिल्हा प्रशासनाने नागरिकांना दिलेल्या आहेत.  या सूचनांची अंमलबजावणी शिरपूर येथे होत नसल्याचे ३ एप्रिल रोजीदेखील भाजीपाला हर्रासी करताना दिसून आले. मालेगाव तालुक्यातील सर्वात मोठी व्यापारपेठ म्हणून शिरपूरची ओळख आहे. जिल्ह्यात भाजीपाला उत्पादनासाठी शिरपूर ओळखले जात असून, येथे दररोज भाजीपाला हर्रासी केली जाते. बुधवारला आठवडी बाजार असतो. जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांच्या निर्देशानुसार आठवडी बाजार पूर्णत: बंद आहे. गुजरी भागात ३० मार्चपर्यंत भाजीपालावर्गीय वस्तूची हर्राशी केली जात होती. मात्र तेथील होणारी गर्दी धोकादायक वाटत असल्याने गावाबाहेरील आसेगाव रोडस्थित आठवडी बाजारच्या जागेत ३१ मार्चपासून हर्राशी सुरू केली. तेथेही व्यापारी व नागरिकांकडून भाजीपाला खरेदीसाठी मोठी गर्दी होऊ लागली. हे लक्षात घेऊन आठवडी बाजारात दोन ठिकाणी ५० फुटाच्या अंतरावर भाजीपाला हर्राशी करण्याच्या सूचना स्थानिक दक्षता समितीने दिल्या. मात्र तरीसुद्धा ३ एप्रिल रोजी भाजीपाला हर्राशी वेळी मोठी गर्दी झाली. येथे सोशल डिस्टन्सिंगचा कोणताही नियम पाळण्यात आला नाही. नागरिकांच्या वाढत्या गर्दीचा धोका लक्षात घेऊन भाजीपाला आडतदार विकास चोपडे, संजय बाविस्कर यांनी भाजीपाला हर्राशी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून सदर निर्णयाची अंमलबजावणी शनिवार, ४ एप्रिलपासून करणार असल्याचे विकास चोपडे यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैन