शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

९१ हजार शेतकऱ्यांना पीककर्ज; नवीन खातेदार केवळ ३७६५

By दिनेश पठाडे | Updated: June 21, 2023 17:39 IST

नुतनीकरण केल्यामुळेच वाढला पीककर्ज वाटपाचा टक्का

वाशिम : मागील चार वर्षांच्या तुलनेत यंदा सुरुवातीच्या काही दिवसांतच विक्रमी कर्जवाटप झाले आहे. यापूर्वी पीककर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी कर्जाचे नुतनीकरण केल्यामुळेच कर्जाची टक्केवारी वाढली असल्याचे दिसून येते. २१ जूनपर्यंत ९१ हजार २५९ हजार शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप झाले असून त्यापैकी ८७ हजार ४९४ शेतकऱ्यांनी कर्जाचे नुतनीकरण केले आहे. तर केवळ ३ हजार ७६५ नवीन खातेदार शेतकऱ्यांना खरीप हंगामात पीककर्ज मिळाले आहे.

खरीप हंगाम २०२३-२४ साठी जिल्ह्याला १ हजार ४०४ कोटी ८४ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. ज्याचा लाभ १ लाख २१ हजार ९८८ शेतकऱ्यांना होणे अपेक्षित आहे. जिल्ह्यात १ एप्रिलपासून कर्जवाटपास सुरुवात झाली असून २१ जूनपर्यंत ७४.८१ टक्के शेतकऱ्यांना कर्जवाटप केले. रकमेनुसार ६३.६३ टक्के कर्जवाटप झाले आहे. यंदा सार्वजनिक, खासगी क्षेत्रासह मध्यवर्ती आणि विदर्भ बँकेने कर्जवाटपात सातत्य राखल्याने टक्केवारी वाढली आहे. शिवाय अधिकाधिक शेतकऱ्यांना पेरणीपूर्वीच कर्ज मिळत असल्याने पेरणीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना तयारी करणे शक्य होत आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड करण्यास प्राधान्य दिले. कर्जाची रक्कम भरल्यानंतर बँकांनी काही प्रमाणात वाढीव कर्ज देऊन पीककर्जाचे नुतनीकरण केले. त्यामुळे कर्जवाटपाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. नवीन खातेदार शेतकऱ्यांची संख्या अपेक्षित नसल्याची स्थिती आहे.नवीन खातेदारांना ४५.६९ कोटी वाटपजिल्ह्यात आतापर्यंत ३७६५ नवीन खातेदार शेतकऱ्यांना ४५ कोटी ६९ लाख ४६ हजार रुपयांचे कर्जवाटप केले आहे. नवीन खातेदारांना कर्जवाटप करण्यात खासगी क्षेत्रातील बँका आघाडीवर आहेत. दरम्यान, नुतनीकरण केलेल्या ८७ हजार ४९४ शेतकऱ्यांना ८४८ कोटी २४ लाख ३३ हजार रुपयांचे कर्जवाटप केले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी